Author: editor desk

चोपडा : प्रतिनिधी इंधनाचे भाव सतत वाढतच आहेत. शेतीमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ म्हणणारे आज त्या विषयावर बोलत नाहीत. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते; परंतु केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी चोपडा, मुक्ताईनगर आणि भुसावळ येथे आयोजित सभेत केली. पवार म्हणाले की, हमीभाव मिळावा म्हणून दिल्लीत वर्षभर शेतकरी आंदोलन चालले; तिथे जायला सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही. उलट शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या गेल्या शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांची अशी अवस्था ही देशासाठी चांगली बाब नाही. महागाईचे मुद्दे सोडून भाजप समाजात तेढ निर्माण करीत…

Read More

मेष आज तुमचा दिवस व्यस्त असेल. तुमचा बॉस तुम्हाला काही नवीन जबाबदारी सोपवू शकतो, जी तुम्ही मेहनतीने पूर्ण कराल. तुमच्या कामाबद्दल तुमची प्रशंसा होईल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. कला-साहित्य क्षेत्रात कल राहील. या राशीचे लोक जे क्रीडा जगताशी संबंधित आहेत ते आज त्यांच्या सरावात व्यस्त असतील. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत पालकांचे सहकार्य मिळेल. तुमचा एखादा मित्र तुमच्या घरी पार्टीसाठी येऊ शकतो. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. समाजहितासाठी केलेल्या कामाचे कौतुक होईल. आज तुम्ही तुमचे मत तुमच्या वरिष्ठांसमोर…

Read More

 जळगाव : विजय पाटील रावेर लोकसभा मतदार संघातील मुक्ताईनगरची जबाबदारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्याकडे देण्यात आली आहे. आज मुक्ताईनगरमध्ये शरद पवारांची जाहीर सभा असून मुक्ताईनगर येथील नियोजित सभास्थनाचे छायाचित्र काही तरी वेगळाच संदेश देत आहेत. इथे लावलेल्या एकही बॅनरवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे नाव व छायाचित्र नाही. वहिनी रक्षा खडसे यांना भा.ज. पा. चे तिकीट जाहीर झाल्यावर व वडील एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तोंडी राजीनामा दिल्यानंतर आपण पवार साहेबांसोबतच राहू अशी भूमिका रोहिणी ताईंनी घेत लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा प्रचार जोमाने करू असे वक्तव्य केले होते. आणि तसा त्यांनी…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष ठाकरे गटाने जोरदार प्रचार करीत असतांना आता याच ठाकरे गटाला नाशिक मतदार संघात मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बडा नेता आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत महायुतीमधील पेच सुटत नव्हता. एकीकडे अखेर महायुतीचा उमेदवार जाहीर झाला. त्यानंतर आता पुन्हा महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असल्याचं चित्र आहे. ठाकरे गटाचे नाराज नेते विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विजय करंजकर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी डावलून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानं करंजकर यांनी बंडाचा झेंडा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून यात ठाकरे गट देखील मागे नाही. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. सुषमा अंधारे यांना सभेसाठी घ्यायला आलेले हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाले. या घटनेमध्ये पायटल आणि त्याचा असिस्टंट सुखरुप आहेत. अपघाताच्या वेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये हेलिकॉफ्टरचे मोठे नुकसान झाले आहे. सुषमा अंधारे गुरूवारी महाड येथे सभेसाठी आल्या होत्या. याठिकाणची सभा आटपून त्या आज बारामतीमध्ये होणाऱ्या महिला मेळाव्यासाठी निघाल्या होत्या. हेलिकॉप्टरने त्या मेळाव्यासाठी जाणार होत्या. सुषमा अंधारे आणि त्यांचा भाऊ या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु असतांना राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सराफाकडे खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अविनाथ जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशोबासाठी सराफाने बोलावले असतना, अविनाश जाधव यांनी तिथे सराफाच्या मुलाला मारहाण केली. तसेच जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला बोलावून प्रेम केले नाही तर भावाला काहीही करून टाकू, अशी धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात ही अल्पवयीन मुलगी दि. २९ रोजी सायंकाळी बसलेली असताना आरोपी आणि दोन अल्पवयीन मुले या गल्लीतून गेली. त्यावेळी आरोपीने तिला बोलावले. आणि तिचा विनयभंग केला. त्याचा जाब मुलीच्या वडिलांनी विचारला. त्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांशी वाद घातला. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख करीत आहेत.

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील वढोदा येथील एका घरात झालेल्या दोन लाख रुपयांहून अधिकच्या घरफोडी प्रकरणी दोन परप्रांतीय संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, वढोदा येथे राहणारे प्रदीप दिनकर सपकाळे यांच्या घरात ८ ते २९ एप्रिल रोजीच्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास सपकाळे कुटुंब हे घराच्या छतावर झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून एक लाख पन्नास हजार रुपये व दागिन्यांसह मोबाइल असा एकूण दोन लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. शोधकामी यावलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर खान पठाण व स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकों किरण धनगर यांच्यासह…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील खंडाळा गावाजवळील पुलावर जुन्या वादातून दोघांना ४ जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना २९ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी ३० एप्रिल रोजी पहाटे ५ भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रितेश राजेंद्र महाजन (वय २१, रा. खंडाळा, ता. भुसावळ) यास जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे पवन राजू कोळी, सुशील अनिल कोळी, गणेश सुरेश कोळी आणि सुनील दीपचंद कोळी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. याचवेळी रितेशच्या मावसभावालाही बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी रितेश महाजन याने भुसावळ तालुका पोलिसांत तक्रार दिल्यावरून गुन्हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी एरियातील डी-सेक्टरमधील मोरया केमिकल कंपनीला १७ एप्रिल रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत ५ जणांचा मृत्यू तर २२ जखमी होते. आता मृतांचा आकडा अजून वाढला असून एका जखमी तरुणाचा ऐन कामगारदिनीच, बुधवारी उपचारादरम्यान शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चंद्रकांत लक्ष्मण पाटील (वय २७, रा. किरवाडा, पो. साकळी बोराडे, जि. धुळे) असे मृत कामगाराचे नाव आहे. मोरया कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेत चंद्रकांत हा ७० टक्के भाजला गेला होता. गेल्या १५ दिवसांपासून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी ११:४२ वाजता त्याचा मृत्यू झाला. मयत कामगाराच्या पश्चात आई,…

Read More