Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी भाजपाला महाराष्ट्राविषयी इतका द्वेष आहे की, त्यांनी महाराष्ट्रातील उद्योग, सेक्टर गुजरातला नेले. आपल्या जळगावमधील पाडळसे धरणाचे पाणी देखील त्यांनी गुजरातला, सुरतला घेऊन गेले. आणि हे पाणी जर का परत जळगावला आणायचं असेल तर आपल्याला यांना यंदा तडीपार करावेच लागेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील-पवार यांच्या प्रचारार्थ रविवार, दि.५ रोजी जळगाव शहरातील जुने जळगाव प्रचार रॅली काढण्यात आली. त्यानंतर जोशी पेठेतील बागवान गल्ली येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, ॲड. ललिता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील वडजी गावाजवळ भीषण अपघात जखमी झालेल्या खुबचंद सागरमल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ललिता सतीश साळुंखे (वय ४८, रा. इंद्रप्रस्थ नगर, दूध फेडरेशन रोड) यांचा रविवार दि. ५ मे रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मयत झालेल्या ललिता साळुंखे यांचे पती सतीश साळुंखे हे वर्षभरापूर्वी खुबचंद सागरमल याच शाळेतून सेवानिवृत्त झाले. तर मुलगा बंगळुरू व मुलगी पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ललिता साळुंखे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दि. १ मे रोजी मुलगी संजना हिच्यासह भडगाव येथे कारने जात होते. त्या वेळी वडजी गावाजवळ रस्त्यात अचानक कुत्रा…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी शहरातील म्हसावद रस्त्यावर श्रीकृपा जिनिंगजवळ चारचाकी गाडी, ट्रक, अॅपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील (मूळगाव सामनेर, ह. मु, ठाकरे कॉलनी, पाचोरा) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलहून म्हसावदकडे जाणाऱ्या ट्रकला (आरजे १०/ जीबी ८५२८) दुचाकी ओव्हरटेक करत होती. त्याचवेळा समोरून येणाऱ्या रिक्षाला (एमएच १९ व्ही १२६७) इरटीका (एमएच १८ बीसी१४०८) ओव्हरटेक करत होती. ही ओव्हरटेक करणारी दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात वाहनांची धडक होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील हा युवक जागीच ठार झाला. यावेळी गणेश पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वळण घेण्यासाठी थांबलेल्या दोन कारला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे दोन्ही कारचे नुकसान झाले असून एक कार तर चक्काचूर झाली आहे. सुदैवाने यातील डॉक्टर बालंबाल बचावले. हा अपघात शुक्रवार, ३ मे रोजी रात्री इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुलीदरम्यान झाला. ४ मे रोजी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मेहरूण परिसरात शस्त्रक्रिया असल्याने स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे हे कारने (क्र. एमएच १९, सीएफ ५७४४) तेथे जात होते. त्यावेळी इच्छादेवी चौकाच्या पुढे असलेल्या वळणावर त्यांच्यापुढे वळण घेण्यासाठी एक कार उभी असल्याने डॉ. नारखेडे हेदेखील त्यामागे थांबले. वळण घेण्यासाठी दोन्ही कारने इंडिकेटर दिलेले असतानाही मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. एमएच…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. गुटखाबंदी असतानाही शहरात गुटखा विक्री केली जात आहे. बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी गुप्त माहितीवरून जामनेर रस्त्यावर गुटखा असलेली अॅपेरिक्षा पकडली. यातून ७० हजारांचा गुटखा जप्त केला आहे. सट्टा बाजारात आयपीएलवर लाखोंची उलाढाल होत आहे, यावरही पोलिसांची करडी नजर आहे. बाजारपेठ पोलिसांनी गुप्त माहितीवरून ७० हजारांचा गुटखा आणि दीड लाख रुपये किमतीची अॅपेरिक्षा, असा सुमारे दोन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात सर्रासपणे बन्हाणपूर भागातून गुटख्याची वाहतूक होत आहे. पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. गुटखा माफियांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने शहरात बिनदिक्कतपणे पानटपरी, किराणा दुकानांवर सर्रासपणे गुटखा उपलब्ध होत आहे. पोलिस…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रोहिणी या गावात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निघृण खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. भारताबाई कैलास गायकवाड (३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती कैलास एकनाथ गायकवाड (३८, रा. ओझर, ता. चाळीसगाव) याला शनिवारी रात्रीच अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास हा पत्नी भारताबाई हिच्यावर संशय घेऊन वाद घालत होता, तसेच मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. या प्रकारास कंटाळून ती मुलगी योगिता हिच्यासोबत माहेरी रोहिणी येथे निघून आली होती. त्यानंतर, दोन-तीन दिवसांपूर्वी भारताबाई हिच्या वडिलांनी जावई कैलास याला घरी बोलावून घेतले. त्यावेळी परिवारातील सर्वांनी त्याची…

Read More

मेष आजचा दिवस आनंदाचा जाईल. आज नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या आजूबाजूचे काही लोक तुमचे विरोधक देखील होऊ शकतात ज्यांच्यापासून तुम्हाला दूर राहावे लागेल. आज तुम्ही योजनेनुसार काम करावे. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन उपकरणे समाविष्ट केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या प्रगतीच्या मार्गात काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील. वृषभ आज आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. आज तुमच्या पैशांचा योग्य वापर करा. तुमच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे बजेट बनवा, तरच तुम्ही भविष्यासाठी काही पैसे वाचवण्याचा विचार करू शकता. तुमचा जोडीदार आज तुम्हाला आनंदी राहण्याची कारणे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज बारामती मतदार संघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार असून आज सायंकाळी पाच वाजता बारातमीमधील प्रचार थांबणार आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभांचा धुरळा बारामती लोकसभा मतदार संघामध्ये पाहायला मिळणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे या हायहोल्टेज लढतीकडे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सांगता ही मिशन हायस्कूल मैदानावरील सभेने व्हायची. मात्र यंदा पहिल्यांदाच ही जागा अजित पवार यांनी मिळवली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांची सांगता सभा या ठिकाणी होईल. सकाळी नऊ वाजता भोरमधील राजा रघुनाथराव…

Read More

यावल : प्रतिनिधी किनगाव येथील एका किराणा दुकानातून शुक्रवारी अडीच लाख रुपयांचा गुटखा सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग आणि त्यांच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, किनगाव, ता. यावल येथील अनिल किराणा दुकानात गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने किनगाव येथे छापा टाकून हा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिस नाईक अल्ताफ अली हसन अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किराणा दुकानदार जगन्नाथ पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये व पोलिस करीत आहे.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात राहणाऱ्या दोन भावांना खंडणीची मागणी करत लोखंडी विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. या प्रकरणी रात्री उशिराने शहर पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रूपेश रवींद्र कानोजे (वय ३२) आणि त्यांचा भाऊ सूरज कानोजे (रा. ओंकारेश्वर मंदिर) कडे त्याच परिसरात राहणारे पवन कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल यांनी कानोजे यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्याला विरोध केला असता दोघांनी रूपेश यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी लांबवली. तर विळ्याने दोघांवर…

Read More