जळगाव : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील-पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि.५ रोजी आसोदा, भादली आणि ममुराबाद येथे प्रचार रॅली काढण्यात आल्या. या रॅलींमध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत, जिल्ह्याच्या विकासासाठी आमचे मत ‘मशाल’लाच राहील, अशा विश्वास दिला. करणदादा पाटील यांचे गाव-गावात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी औक्षण करून आशीर्वाद दिले. रॅलीदरम्यान, करणदादा पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संभाजी पाटील यांच्या घरी भेट दिली. आसोदाचे सरपंच सागर कोळी यांच्या घरी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून तर डॉ. रमाकांत कदम यांच्या घरी डोक्याला फेटा बांधून, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रॅलीत…
Author: editor desk
मेष : आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि चुकीची आहे. वृषभ : आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण…
कर्नाटक : वृत्तसंस्था कर्नाटकातील जिल्ह्य़ातील दांडेली तालुक्यात एका 32 वर्षीय महिलेने तिच्या पतीसोबत झालेल्या भांडणानंतर आपल्या 6 वर्षाच्या दिव्यांग मुलाला मगरीने बाधित नदीत फेकून दिले होते. एका दिवसानंतर मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. ते म्हणाले की, या जोडप्यामध्ये त्यांच्या मोठ्या मुलाच्या अपंगत्वावरून अनेकदा भांडण होत असे, जो जन्मापासून मूक होता. दोघांनाही एक लहान मुलगा असून त्याचे वय 2 वर्षे आहे. लोकांच्या घरी मदत म्हणून काम करणारी सावित्री, तिचा 36 वर्षीय पती रवी कुमार यांच्याशी त्यांचा मोठा मुलगा विनोद याच्या मूकपणामुळे आणि ऐकू न येण्यावरून नेहमीच भांडत असे. सावित्रीने पोलिसांना सांगितले की तीचा नवरा नेहमीच तिची…
जळगाव : प्रतिनिधी अंगणात उभ्या केलेल्या एका ईलेक्ट्रीक दुचाकीसह दोन दुचाकींना आग लागून त्या जळून खाक झाल्या. ही घटना रविवार मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव म्हसावद येथील योगेश रमेशचंद अग्रवाल (वय ४९) यांचा हलवाईचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांची (एमएच १९, डीझेड, ३६४६) इलेक्ट्रीक बाईक व दुसरी (एमएच १९, डीयू ९८३४) क्रमांकाची दुचाकी अंगणात उभी केली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक त्यांच्या दुचाकींनी आग लागून दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. मध्यरात्री दोन वाजता एका जणाने अग्रवाल यांना आवाज देऊन दुचाकी जळत असल्याची माहिती दिली. त्या वेळी…
रावेर : प्रतिनिधी पिकवलेल्या केळीला भाव न मिळाल्याने कर्जाच्या चिंतेत असलेल्या हर्षल रविंद्र नेहेते (वय ३८, रा. निंभोरा, ता. रावेर) या तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील निंभोरा येथील तरुण शेतकरी हर्षल नेहेते यांनी उत्पादन चांगले व्हावे व त्याचा मोबदला चांगला मिळावा. यासाठी शेतात केळीची लागवड केली होती. परंतु केळीला भाव न मिळाल्यामुळे तसेच त्यासाठी लागलेला खर्च देखील न निघाल्याने ते निराश होते. तसेच आर्थीक विवंचनेत असलेल्या नेहते यांना डोक्यावरील कर्जाची…
पाचोरा : प्रतिनिधी बँकेतील बचत खात्यात ठेवलेल्या चार लाखांची ऑनलाइन चोरी झाल्याची तक्रार दुसखेडा (ता. पाचोरा) येथील शेतकऱ्याने सायबर क्राइम शाखेकडे दाखल केली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, अनिल तुकाराम महाजन (दुसखेडा, ता. पाचोरा) यांचे दोन बँकांमध्ये असलेल्या बचत खात्यातील रकमेची दि. ३ मे व ४ मे रोजी ऑनलाइन चोरी झाल्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याबाबत सोमवारी त्यांनी तक्रार दाखल केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, महाजन यांचे एका बँकेच्या बचत खात्यात २ मेपर्यंत २ लाख ८० हजार एवढी रक्कम होती, तर दुसऱ्या बँकेत २ लाखापेक्षा जास्त रक्कम होती. दि. ४ मे रोजी अनिल महाजन यांच्या बँकेशी जोडलेल्या मोबाइलवर…
जळगाव : प्रतिनिधी गुटखा, पानमसाला विक्रीस बंदी असतानाही किराणा दुकानात त्याची विक्री केली जात असताना एमआयडीसी पोलिसांनी तेथून तब्बल एक हजार ३० पानमसाला, तंबाखूचे पाऊच जप्त केले. यासोबतच तंबाखूचे १५ डबे असा एकूण एक लाख ३० हजार ९८५ रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आला. ही कारवाई रविवार, ५ मे रोजी संतोषी माता चौक परिसरात असलेल्या श्री स्वामी कृपा प्रोव्हिजनवर करण्यात आली. या प्रकरणी दुकान मालक दीपक रमेशचंद गंगराळे (४०, रा. रामेश्वर कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मेहरुण परिसरातील संतोषी माता चौकाजवळ असलेल्या दुकानात प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे…
जळगाव : प्रतिनिधी आधीच विवाहित आणि माता असलेल्या महिलांचे अविवाहित तरुणांशी विवाह लावून लाखो रुपयांत फसवणूक करणारी पाच महिलांची टोळी सोमवारी कासोदा पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यात मोना दादाराव शेंडे (२५), सरस्वती सोनू मगराज (२८, दोन्ही रा. रायपूर, छत्तीसगड), अश्विनी अरुण थोरात (२६, रा. पांढुर्णा, मध्य – प्रदेश), सरलाबाई अनिल पाटील (६०) आणि उषाबाई गोपाल विसपुते (५०, दोन्ही रा. नांदेड, ता. धरणगाव) यांचा – समावेश आहे. पाचही महिलांना दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गरजू उपवर तरुणांना हेरून त्यांना मध्यस्थांमार्फत मुली दाखवून लग्नासाठी २ ते ५ लाख रुपये उकळण्याचे त्यांचे उद्योग होते. विशेष म्हणजे, यातील तीन…
मेष कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ घालवणे या आठवड्यात तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरेल. तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. तुम्ही त्यांना कोणत्याही समस्येतून बाहेर काढण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे कुटुंबात तुमचा आदर वाढेल. या आठवड्यात, नोकरी व्यवसायाशी संबंधित या राशीचे लोक कामाच्या ठिकाणी त्यांच्या कौशल्यांचा पूर्णपणे वापर करू शकणार नाहीत. यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यात अडचणी येऊ शकतात. वृषभ जपून, विचारपूर्वक वागा. या आठवड्यात, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील विविध क्षेत्रात येणारे सर्व अडथळे विसरून सतत पुढे जावे लागेल. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये प्रचंड यश मिळू शकेल. आपले अपयश विसरून आपले ध्येय साध्य करण्यासाठी योग्य योजना बनवण्याचा प्रयत्न करा. मिथुन आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी…
रावेर : प्रतिनिधी रावेर रेल्वे स्टेशनवर दानपूर-पुणे, महानगरी एक्स्प्रेससह गोवा एक्स्प्रेसला थांबा मिळावा अशी मागणी वर्षानुवर्षापासून रावेर तालुक्यातील प्रवाशांची आहे. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी फारसे लक्ष न दिल्याने प्रवाशांच्या जिव्हळ्याचा हा विषय दहा वर्षातही सुटू शकलेला नाही. कोणताही निधी खर्ची पडत नसतानाही हा प्रश्न लोकप्रतिनिधींना सोडवता आला नाही. वर्षानुवर्षापासूनची रावेर मतदार संघातील रावेर, निंभोरा, सावदा, बोदवड, मलकापूर येथील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन प्रवाशी गाड्यांचा थांब्यांचा प्रश्न भावी काळात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले रावेर लोकसभा मतदार संघात रावेर तालुका हा केळी उत्पादनात अग्रेसर तालुका आहे. यामुळे केळीच्या व्यापारानिमित्ताने येथे परप्रांतातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची…

