Author: editor desk

मेष आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुम्ही रिलॅक्स व्हाल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे, लवकरच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन स्थान प्राप्त करणार आहात. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस विशेष फायदेशीर राहील. आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत नातेवाईकांच्या घरी जाऊ शकता. आज नोकरीच्या ठिकाणी मोठी ऑफर मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासमवेत सहलीला जाण्याची योजना आखाल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कॉलेजमध्ये नवीन प्रोजेक्ट्सवर काम करणारे विद्यार्थी लवकरच आपली तयारी पूर्ण करतील. तुम्हाला शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज कोणतेही काम करताना वडिलांचा आशीर्वाद जरूर घ्या. हे तुम्हाला तुमच्या कामात मदत…

Read More

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्याची निवडणूक रंगात आलेली आहे. बजरंग सोनावणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार दोन दिवस इथे थांबणार आहेत. कालच्याच पत्रकार परिषदेत शरद पवारांना पक्षाच्या वतीने आम्ही विचारलं की, आपण एका बाजूला म्हणत आहेत की, भाजपला हरवलं पाहिजेत, सत्तेपासून खाली खेचलं पाहिजेत. उद्या आपण तेच वाक्य वापरणार याची मला खात्री आहे. पण राजनाथ सिंह यांना आपण फोन का केला होता याचे उत्तर तुम्ही अजून दिलेले नाही असा सवाल आंबेडकर यांनी विचारला. राज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला असून आता राजकीय वातावरण देखील तापले असून विविध पक्षांच्या प्रचारसभानांही वेग आला असून याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल शहरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. पदयात्रे दरम्यान, स्मिताताईंचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी “अबकी बार मोदी सरकार “ या घोषणांनी शहरातील प्रत्येक भाग दणाणून सोडला. स्मिताताईंनी पदयात्रेत सामील नागरिकांशी संवाद साधत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आवाहन केले . यावेळी माजी खासदार ए.टी. नाना पाटील, अमोलदादा चिमणराव पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, मच्छिन्द्र बापू पाटील, रमेशभाऊ परदेशी, वासुदेव पाटील, उज्वलाताई पाटील, रवीभाऊ जाधव, राजाभाऊ पाटील, परेश पाटील, सुनील पाटील, अतुल पवार, सचिन पानपाटील,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात सर्वत्र सामूहिक रित्या अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. या वर्षी १० मे रोजी अक्षय तृतीया असून या दिवशी शुभ मुहूर्त समजले जाते त्या दृष्टीने या दिवशी बालविवाह होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणा सतर्क राहून असे होणारे बालविवाह थांबविण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले . बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ संपूर्ण राज्यात लागू केला आहे. त्याचप्रमाणे त्या बाबतचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २०२२ देखील लागू आहे. या नियमानुसार ग्रामसेवक यांना ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक आधिकारी तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी येथील बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुक्ताईनगर येथून दुचाकी चोरट्यास ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीच्या पाच दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत. सविस्तर वृत्त असे कि, येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भरत शालिग्राम बोंडे यांची दुचाकी ४ मे रोजी घरासमोरून चोरीस गेली होती. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पो.हे.कॉ. विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, पोलीस नायक सोपान पाटील, राहुल वानखेडे, सचिन चौधरी, जावेद…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील नाहाटा चौफुली परिसरात हातात सुरा घेवून दहशत माजवणाऱ्या एकावर भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी ६ मे रोजी रात्री ११.३० वाजता कारवाई केली. याप्रकरणी ७ मे रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नाहाटा चौक परिसरात संशयित आरोपी आनंद विजय सारवान (वय २०, रा. अकलुद, ता. यावल) हा हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. बाजारपेठ पोलीसांनी ६ मे रोजी रात्री ११.३० वाजता कारवाई करत संशयित आनंद विजय सारवान याच्याकडून सुरा हस्तगत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ऊरुस व संदल कार्यक्रमात झालेल्या वादातून बुधवारी पहाटे साडेतीन वाजता गेंदालाल मिल परिसरात सुमारास बाबूराव उर्फ भिकन शेख (रा. गेंदालाल मिल) याने हवेत दोन राऊंड फायर केले. या घटनेमुळे शहरात खळबळ माजून गेली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासात नशिराबाद येथून गोळीबार करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याचयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गेंदालाल मील परिसरात अली सैय्यद रज्जाक हे भंगार विक्रेता वास्तव्यास आहे. दि. ५ मे रोजी गेंदालाल मिलपरिसरात बाबा मौला अली मौला यांचा ऊरुस व संदलचा कार्यक्रम पार पडला होता. त्या कार्यक्रमात बॅनरवर अली सय्यद रज्जाक यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्त्याच्या परिस्थिीतीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात तेजनारायण सिंग व आरिफ अन्सारी हे दोघे जखमी झाले. ही घटना दि. ७ रोजी दुपारी नशिराबादजवळील महामार्गावरील उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नांदेड येथील बाफना बिज जवळ तेजनारायण सिंग हे वास्तव्यास असून ते चालक म्हणून नोकरी करतात. दि. ७ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ते आरिफ अन्सारी यांच्यासोबत (एमएच २०, जीबी ०५८१) क्रमांकाच्या वाहनाने जळगावकडून भुसावळकडे जात होते. यावेळी नशिराबाद उड्डाणपुलावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने समोर चालणाऱ्या वाहनाला धडक दिली. या…

Read More

चोपडा : प्रतिनिधी शहरातील धरणगाव नाका येथे मंगळवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास चार अज्ञातांनी आमच्याकडे रागात का बघतो, असे म्हणत चेतन सुभाष कानडे या तरुणावर गुप्ती आणि चाकूने वार केले. घटनेनंतर हल्ला करणारे चारही तरुण चारचाकी वाहनातून अडावदच्या दिशेने पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सविस्तर वृत्त असे कि, सचिन सुधाकर सोनवणे, चेतन सुभाष कानडे, कमलाकर पाटील हे तिघेही धरणगाव नाक्यावर उभे असताना रात्री साधारण १०:३० वाजेदरम्यान समोर चार व्यक्ती आपसात भांडत होते. त्यातील एकजण दुसऱ्याला चाकूने मारण्याची भाषा करीत होता.त्याचवेळी तुम्ही आमच्याकडे का पाहता, असे म्हणत चारही शिवीगाळ करत जवळ आले. त्यातील एकाने कारमधून (जीजे ०५-आरक्यू २८१५) चाकू काढला आणि चेतन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा येथील एक कुटुंब ४ मे रोजी उन्हाळ्याचे दिवस असल्याने गच्चीवर झोपले असताना, रात्री चोरट्यांनी घरफोडून १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मंगळवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नामदेव पंडित पाटील (६४) हे रायपूर येथील मराठी शाळेत सुरक्षारक्षकाचे काम करतात. ते शनिवारी ४ मे रोजी कुटुंबासोबत गच्चीवर झोपले होते. ५ मे रोजी सकाळी उठल्यानंतर घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडल्याचे त्यांना दिसले. घरात पाहणी केली असता, कपाट देखील फोडले होते. चोरट्यांनी घरातून ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, ३३ हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या, ३६ हजार रुपये…

Read More