मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी आपल्या आमदारासह भाजपला साथ दिली मात्र निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याने अनेक आमदार नाराज असून ते पुन्हा शरद पवार गटात येत असल्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. अजित पवार गटाच्या 18-19 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मात्र शरद पवार त्यातल्या 10 ते 12 आमदारांनाच घेतील असंही रोहित पवार म्हणाले आहेत. भाजप अजित पवार गटाला फक्त 20 जागा देईल किंवा स्वतंत्र लढण्यासही सांगेल असंही रोहित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, रोहित पवारांच्या दाव्यानंतर आता महाराष्ट्राला विधानसभेपूर्वी पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार की, काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सरस्वतीनगर येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. २७ जून रोजी सकाळी ११:५५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. शनिपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव ललित बऱ्हाटे (वय १७, रा. सरस्वतीनगर, भुसावळ रोड, जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ध्रुवचे वडील ललित बन्हाटे एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून तर आई ज्वेलर्सच्या दुकानात कामाला आहे. तो इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये मु.जे. महाविद्यालयात शिक्षण घेत होता. गुरुवार दि. २७ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ध्रुवचे आई-वडील हे कामाला निघून गेले. तर त्याचा लहान…
जळगाव : प्रतिनिधी तुमच्याविरुद्ध ईडी ऑफिसमध्ये तक्रार झाल्याचे सांगत भुसावळ येथील एका अभियंत्याची अज्ञात सायबर भामट्यांनी १५ लाखांत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुम्हाला केव्हाही अटक होईल, अशी भीती घालून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत गुरुवार, दि.२७ जून रोजी दुपारी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील ५० वर्षीय अभियंत्यास बुधवारी, दि.२६ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फोन आला. बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून तुमचा फोन दोन तासात बंद होईल असे सांगण्यात आले. फिर्यादीने कारण विचारले असता, तुम्ही मोबाईल क्रमांकावरून गैरप्रकार केला असून त्याबाबत मुंबई येथे तक्रारी दाखल झाली आहे, असे…
एरंडोल : प्रतिनिधी शिपायाकडून दहा हजाराची लाच घेताना निपाणे येथील मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्यासाठी निपाणे येथील मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन (४४) यांनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. या कामासाठी कमिशन म्हणून त्यांनी १२,५०० रुपये लाच मागितली होती. तडजोडीनंत दहा हजार लाच देण्याचे ठरले होते दरम्यान, संबंधित शिपायाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार पथकाने २७ रोजी निपाणे येथील शाळेत मुख्याध्यापकाच्या कार्यालयात सापळा रचला होता. यावेळी लाच घेताना महाजन यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पर्यवेक्षक अधिकारी सुहास देशमुख, पोलीस उपअधीक्षकअमोल…
मेष राशी तुमची वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊन आजच भांडवल गुंतवा. कोणाच्याही दबावाखाली येऊ नका. समान नफा मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. व्यवसायात वेळेवर काम करा. चांगले उत्पन्न मिळेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळविण्यातील अडथळे न्यायालयाच्या माध्यमातून दूर होतील. वृषभ राशी आज व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची बचत वाढेल. आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घ्या. घाईघाईने भांडवल गुंतवू नका. अन्यथा नुकसान होऊ शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे मिळतील. संपत्तीशी संबंधित वाद लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करा. जुनी मालमत्ता विकून तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या क्षमतेनुसार काम करा. अन्यथा तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. मिथुन राशी आज व्यवसायात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे राज्याचे दोन दिग्गज नेते उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे आज एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगू लागली आहे. आज विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या भेटीगाठीनंतर भाजप आणि ठाकरे गटात जवळीक वाढल्याची तुफान चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यातील राजकारणात कट्ट्रर विरोध ठरलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकमेकांसमोर आले. दोघेही उद्धव ठाकरे-फडणवीस एकाच लिफ्टमधून सभागृहात गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे- फडणवीस लिफ्टजवळ एकमेकांशी बोलले. याच्यात काय चर्चा झाली याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. मात्र त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क- वितर्कांना…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असतांना नुकतेच आता ओबीसी आंदोलनाला मोठे यश मिळताना दिसून आले आहे. मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला ओबीसी समाजाच्या वतीने विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्वा पार्श्वभूमीवर ओबीसी आंदोलनाला शांत करण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनादरम्यान 29 जून रोजी ओबीसी समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीतील सर्वच पक्षांच्या भूमिकेकडे आता राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे. या सर्वपक्षीय बैठकीसाठी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात हाणामारी व खुनाच्या घटना नियमित घडत असतांना पालघरमधील विरारमधून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यातील विरार येथील यात एका विवाहित महिलेची साडीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. दोघांमधील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येपर्यंत गेल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, धनश्री आंबडस्कर (वय 32 वर्ष) ही महिला रुपेश आंबडस्कर (वय 37 वर्ष ) तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होती. सोमवारी सकाळी तिचा पती रूपेश कामावर…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सार्वजनिक ठिकाणी गांजा सारखे आमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. सात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये सात जणांविरुद्ध जिल्हापेठ, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत असे कि, शहरातील सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे गांजा ओढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने शहरातील मेहरुण तलाव परिसरातील मनपाच्या जलतरण तलावच्या भिंतीच्या आडोशाला, मेहरुणच्या बगिच्याजवळील विहरीजवळ, मेहरुणच्या बगिच्यात, अजय कॉलनीतील एमएसीबी सब स्टेशनच्या मागे, बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस, आंबेडकर बगीच्याच्या भिंतीच्या आडोशाला व शहरातील नवीन बस स्थानकाच्या मागील बाजूस गांजा ओढणाऱ्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून गांजा…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ग्रामसेवक पदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी बुधवारी दि. २६ जून रोजी दुपारी ३ वाजता काढले आहे. यामुळे जळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पाठपुरावा उपसरपंच अनिल आत्माराम पाटील यांनी केला होता. सविस्तर वृत्त असे कि, वावडदा येथील ग्रामसेवक मिलिंद घेणे, ग्रामसभेची नोंद न ठेवणे, मिठाराम बाऊस्कर यांनी पदावर कार्यरत असताना मासिक सभेची यांची कारवाई नोंद प्रोसिडिंग बुकात वेळेवर न पाणीपुरवठा योजनेची व ग्रामनिधीची रक्कम परस्पर खर्च करून अपहार करणे, पंधरावा वित्त आयोग अंतर्गत अपहार करणे, इत्यादीप्रमाणे अनियमतता केल्याचे चौकशीअंती…

