Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी उसनवारी दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून व काहीतरी जादूटोणा केल्याच्या संशयावरून भडगाव पेठ येथील ७८ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना वरखेड (ता. भडगाव) येथे घटना घडली. संशयित आरोपीला पाच तासांतच जळगावच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, सूपडू नाना पाटील (७८) हे परिसरात भगत म्हणून ओळखले जात. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी लोकांचे येणे-जाणे होते. पेठ भागातील हितेश ऊर्फ कुणाल चुडामण मराठे (२४) हासुद्धा नेहमी येत असे. त्याच्यासोबत सर्वांची ओळख होती. कुणाल यास सुपडू यांनी मार्च महिन्यात उसनवारीने एक महिन्याच्या बोलीवर १ लाख रुपये दिले होते.…

Read More

मेष : तणाव दूर घालविण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. तुमचे प्रियजन आनंदी झाले असतील तर त्यांच्यासोबत संध्याकाळी मौजमजा करण्याचे बेत ठरवा. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. तुम्ही विनयशीलपणे आणि मदतीच्या भूमिकेतून वागलात तर तुमच्या भागीदाराकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. वृषभ : आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. आजुबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. जर तुम्ही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्यासाठी घेतलेला निर्णय कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणारा नाही, असं म्हटले आहे. काही दिवसापूर्वी राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव केले होते. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर नाही असं न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी सुनावणी घेतली होती. 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुनावणीनंतर न्यायाधीशांनी आपला…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी मतदार संघाच्या वाढत्या तपामानाप्रमाने रावेर लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापत आहे. राजकारणात नवखे असलेल्या श्रीराम पाटलांनी मुरब्बी खडसे कुटुंबीयांची प्रचारात चांगलीच दम शाक होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून ज्यांना खडसे अगदी खालच्या स्तरावर येऊन बोलत होते त्याच देवेंद्र फडविसांची तातडीची सभा खडसेंना तारण्यासाठी भुसावळ मध्ये घेण्यात आली. एकूणच सभा मोठी दिसावी यासाठी शहरातील मोठे मैदान घेण्याऐवजी एका लहान चौकात सभेचे आयोजन करण्यात आले. त्यातही देवेंद्रजी येईस्तोवर लोकांची जुळवाजुळव करणे सुरू होते. तब्बल वीस हजार लोक येणार अशा वल्गना केल्या गेल्या परंतु प्रत्यक्षात मात्र दीड ते दोन हजार लोक आले असे दिसून येते. असो पण देवेंद्र आले ते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वसंतवाडी येथे दिनांक ७मे रोजी हळदीच्या कार्यक्रम आयोजित केला होता हळदीच्या कार्यक्रम संपल्यावर गुलाब पवार वय वर्षे ३२ या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुलाब पवार यांच्या पुतणीचा विवाह आज होणार होता या विवाह सोहळ्यात काल संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमात गुलाब पवार हे नाचले आनंद व्यक्त केला मात्र काही वेळेनंतर चौकातुन घरी जात असताना चौकात काहीतरी गोंधळ झाल्याने गुलाब पवार हा घराकडुन परत चौकात आला व त्याठिकाणी येतांच त्याचा तोल जाऊन तो कोसळत असल्याचे येथील चौकात उभे असलेल्या तरुणांनी त्याला हलगत वरती धरलं व त्याला घरी घेऊन गेले काही वेळेनंतर मरण पावल्याचे लक्षात आले त्यानंतर शवच्छेदनसाठी जळगाव जिल्हा…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीने अमळनेर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भालेराव नगरात घडली. या तरुणीच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. निकिता रवींद्र पाटील (वय १९) असे मयत तरुणीचे नाव असून ती मुख्य बाजार पेठेतील साने गुरुजी संकुलात प्रसिद्ध असलेल्या रामभाऊ चहावाले (लिबर्टी टी) चे संचालक रवींद्र रामकृष्ण पाटील यांची कन्या होती. भालेराव नगरात त्यांचे घर असून सोमवारी दुपारी साडेबारा वाजता ती व तिची आई घरात दोघेच असताना निकिताने तिच्या रूममध्ये छताच्या पंख्याला गळफास घेतल्याने तिची प्राणज्योत मालवली. अर्ध्या तासाने ही घटना तिच्या…

Read More

जळगावः प्रतिनिधी मित्रांनो पुढची पिढी तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला मतदानाचा अधिकार असतांना तुम्ही आमच्या भविष्याचा विचार का केला नाही. या साठी तुम्ही आता पासून सावध व्हा. मोदी सरकारची हुकमशाही राजवट संपुष्टात आणण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन करीत १३ मे रोजी मोदी सरकारचे तीन तेरा वाजवून ४ जून हा निष्ठावंताचा विजयाचा दिवस रहिल यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पवार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केले. पुढे बोलतांना त्यांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदींवर देखील टीकास्त्र…

Read More

चोपडा : प्रतिनिधी चोपडा-यावल रस्त्यावरील काबरा पेट्रोलपंपाच्या जवळपास यावलकडून येणाऱ्या कारने चोपडा येथून अडावदकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. रतन ऊर्फ नितीन रमेश पाटील (३८) व चेतन निंबा पाटील (२५, दोन्ही रा. पारगाव) अशी मयत तरुणांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, मंगळवारी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास चोपडा-यावल रस्त्यावर भरधाव कारने (एमएच ०४ जेएम ३३८८) दुचाकीवरील (एमएच १९ एएम ५४८१) दोघांना धडक दिली. अपघातात पारगाव येथील रतन पाटील व चेतन पाटील हे दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. दोघांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना अधिक उपचारासाठी जळगावला पाठवण्यात आले. जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड गावातून बचतगटाची वसूल केलेली दोन लाख ३२ हजाराची रक्कम घेऊन बँकेचे वसुली अधिकारी चालले असता चोरट्यांनी लुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. वराड गावातून बचतगटाची रक्कम वसूल करून वसुली अधिकारी पवन राजू मारग (बारव पिंपळगाव ह.मु देवकर नगर, जळगाव) हे जळगावकडे निघाले होते. गावाबाहेरील शाळेजवळ तीन चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी धक्का देऊन त्यांना खाली पाडले. दगडांनी मारून गाडीला लावलेली बॅग हिसकावून चोरट्यांनी पलायन केले. या बॅगेत बचत गटाचे २ लाख ३२ हजार रुपये होते. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी धाव घेऊन शोध घेतला. मात्र ते सापडले नाही. मारग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात, आईसह दोन मुलं ठार झाले; तर, मयत महिलेचा १२ वर्षीय भाचा गंभीर जखमी आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. घटनास्थळी जमावाने वाहनांवर दगडफेक केली. यावेळी घटनेत एक पोलिसाला किरकोळ दुखापत झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, वत्सला उर्फ राणी सरदार चव्हाण (वय ३०), मुलगा सोमेश (वय २) व सोहम (वय ७, सर्व रा. शिरसोली, ता. जळगाव) अशी मयतांची नावे आहेत. वच्छला चव्हाण या रामदेववाडी येथे आशा वर्कर म्हणून नियुक्तीला होत्या. यात त्यांचा भाचा लक्ष्मण भास्कर राठोड (वय…

Read More