मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात केला जाणार, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. पावसाळी अधिवेशना अगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांच्या आमदारांकडून मागणी केली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता असल्याने राज्यात महायुतीतील आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. यावर काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतल्या बैठकीत याविषयी माहिती दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाअगोदर २७ जून रोजी केला जाईल, अशा चर्चा राजकीय…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात प्रेम प्रकरणातून हाणामारीसह खुनाच्या नेहमीच घटना घडत असतांना नुकतेच वसई शहरातून देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीची तिच्या प्रियकराने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी घडली. हा हल्ला रस्त्याच्या मधोमध झाला, जिथे 29 वर्षीय हल्लेखोराने पीडितेच्या डोक्यावर आणि छातीवर वारंवार वार केले. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर नुकतेच ब्रेकअप झाल्याचे या हल्ल्यामागील कारण होते. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी रस्त्यावर पडून होती. इंटरनेटवर या भयानक घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये आरोपीने हातात पाना धरलेला दिसत आहे. तिच्यावर हल्ला करण्यापूर्वी आणि शस्त्र टाकून देण्याआधी “माझ्यासोबत…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेल्या राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई पद भरती २०२२-२३ प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. १९ जूनपासून ही भरती प्रक्रिया आयुक्तालये आणि जिल्हा पातळीवर सुरू करण्यात येणार आहे. राज्य पोलीस दलात १७ हजार ४७१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली असून यासाठी तब्बल १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आले असल्याची माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस भरती प्रक्रियेत सर्वाधिक नऊ हजार ५९५ पोलीस शिपाई पदे असून यासाठी आठ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले आहेत. त्याखालोखाल राज्य राखीव पोलीस बलात चार हजार ३४९ पोलीस शिपाई पदे…
चाळीसगाव : प्रतिनिधी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन दुचाकी शहर पोलिसांच्या पथकाने जप्त केली आहे. तसेच चोरट्यांनी अटक करण्यात आली. ही कारवाई दि.१७ रोजी करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, नानासाहेब सुदाम आहेर (रा. जळगाव खु॥ ता. नांदगाव जि. नाशिक) यांची ७० हजार रुपये किमतीची दुचाकी घाटरोड, चाळीसगाव येथील विठ्ठल सभा मंगल कार्यालय जवळून दि.१६ रोजी चोरीस गेल्या बाबत फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी तपास पथक स्थापन केले. या पथकाने घाटरोड बायपास परिसरात…
रावेर : प्रतिनिधी घरात परिवार असताना दारू पिण्यासाठी चार-पाच सवंगडी आणून गोंधळ कशाला घालताय? असे हटकल्याचा राग आल्याने काकाने पुतण्यावर चाकूचे चार-पाच वार केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी काकाला अटक करण्यात आली. रावेर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुभाष उर्फ बाळू गोविंदा महाजन (वय ६०, रा. हनुमान व्यायामशाळेजवळ, रावेर) हे त्यांच्या घरी चार पाच मित्रांना आणून दारू पीत होते. घरात परिवार असताना दारूच्या नशेतील त्या चार पाचही जणांचा गोंधळ पाहून शेजार राहणारा पुतण्या रवींद्र प्रल्हाद महाजन (वय ४०) हा काकाला बोलला, ‘तुम्ही…
मेष : मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाहीने गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. कार्य क्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो म्हणून, आज तुम्हाला डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. वृषभ : दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्यामते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील अनेक कॉलनी परिसरात उत्तम प्रकारचे रस्ते, गटारी झाल्या आहे. पण अनेक परिसरात आज देखील रस्ते व गटारी होवू शकलेले नाही त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनपात नेहमीच तक्रारी येत असतात, याचीच दखल घेत मनपाचे माजी महापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे शहरातील आणखी २०० ते ३०० कोटीचा निधी मिळावा यासाठी साकडे घातले आहे. निवेदनात म्हटले आहे कि, जळगांव शहरासाठी भरघोस निधी यापूर्वी देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रत्यनातून मिळाला आहे. यासाठी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी २५ कोटींचा निधी मिळवून दिला. त्यानंतर शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मिळवून दिला. त्यातुन ४२ कोटींचे…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आपल्या रोखठोक भूमिकेने सध्या चर्चेत आहे. त्यातच मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना कलिना भूखंड गैरव्यवहारप्रकरणी पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीला गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावण्याचा इशारा सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा भुजबळ चर्चेत आले आहे. कलिनामधील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. छगन भुजबळ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदी असताना हा गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. या खटल्याची मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या ८ वर पहोचली आहे तर ३० जण जखमी झाल्याचे पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांनी ‘ANI’शी बोलताना सांगितले. सविस्तर वृत्त असे कि, या भीषण रेल्वे अपघातात मालगाडीचा चालक आणि सहाय्यक चालक आणि कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनच्या गार्डचा मृत्यू झाला आहे,” असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. रंगा पाणी आणि निजबारीजवळ झालेल्या अपघातात तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. रेल्वेचे पथकाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तर बंगालच्या…
वरणगावः प्रतिनिधी वरणगाव शिवारातील विट भट्टयीजवळील मोकळ्या जागेत पार्किंगला लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटनान ३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी १५ जून रोजी दुपारी २ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद देविदास शिंदे (वय ३५) रा. वरणगाव ता. भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते चालक असून ओमनी कार क्रमांक (एमएच २१ सी २६१७) चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची कार ही वरणगाव शिवारातील विट भट्टीजवळ पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही कार चोरून नेली. त्यांनी…

