मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले. यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत. आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला असतांना नुकतेच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक मोठा वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले कि, मनोज जरांगे पाटील हे आता राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात. जरांगे यांच्या मागण्याचा महाराष्ट्र सरकार गंभीर विचार करत आहे. येत्या 10 दिवसात या विषयावर तोडगा निघून तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्याचं मी स्वागत केलं आहे. पण काही चिल्लर लोक खडखड करत आहे. मी आजही आपल्या शब्दावर…
जालना : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना नियमित सुरु असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून मुंबईच्या दिशेने राँग साईड येणाऱ्या कारने दुसऱ्या एका कारला भरधाव वेगात धडक दिली. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून 7 जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मृताची ओळख पटली नाही. जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ हा अपघात घडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील एर्टिका गाडी ही नागपूरवरुन मुंबईच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लाखो भाविक अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन करण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी करीत असतात, याच भाविकांसाठी खुशखबर आहे. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन शनिवारपासून दि.२९ जून सुरू झाले आहे. बालटाल आणि पहलगाम कॅम्पमधून यात्रेकरूंचा पहिला जत्था पहाटे अमरनाथ गुहेकडे रवाना झाला आहे. एकूण 4,603 यात्रेकरू आज शिवलिंगाच्या दर्शनासाठी चढणार आहेत. अनंतनागमधील पारंपारिक नुनवान-पहलगाम मार्गे आणि गंदरबलमधील बालटाल मार्गाने २९ जून रोजी सुरू झालेली अमरनाथ यात्रा ५२ दिवस चालणार आहे. 19 ऑगस्ट रोजी संपणार आहे. यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी 3.50 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. 26 जूनपासून ऑफलाइन नोंदणी सुरू…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला शहर पोलिसांनी कारवाई करत बुधवारी २६ जून रोजी रात्री ९ वाजता गेंदालाल मिल भागातील भिमा कोरेगाव चौकातून अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुवारी २७ जून रोजी पहाटे ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (वय-२१), रा. गेंदालाल मिल, जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार असलेला गुन्हेगार महेश लिंगायत हा गेंदालाल मिल परिसरातील भिमा कोरेगाव चौकात येवून हातात कोयता घेवून फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…
जळगाव : प्रतिनिधी १६ लाख रुपयांची सुपारी घेवून सुरत येथे दोन जणांचा गळा कापून खून करत फरार असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातून अटक केली आहे. अफजल अब्दुल शेख (३८, रा. उमरपाडा, सुरत) व प्रज्ञेश दिलीप गामीत (२६, रा. तरकुवा डुंगरी फलिया, वापी, गुजरात) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांनी खुनाची कबुली दिली असून एकावर खुनाचे पाच तर दुसऱ्यावर १५ वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील दुहेरी खून प्रकरणात अटक केलेल्या अफजल अब्दुल शेख व प्रज्ञेश दिलीप गामीत या दोघांनी कबुली देताना सांगितले की, सुरतचे खुर्शीद अली सय्यद यांनी १६ लाख रुपयांची सुपारी दिल्याने…
जळगाव : प्रतिनिधी मंदिराच्या परिसरात धूम्रपानाला विरोध करण्याच्या कारणावरून सुऱ्याने वार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेस्थानकाजवळील हनुमान मंदिराजवळ दि.२६ जून रोजी ज्ञानेश्वर सोनवणे हे बसलेले होते. त्यावेळी काहीजण धूम्रपान करीत होते. त्यास विरोध केल्याने अक्षय मुकेश अटवाल (२२, रा. शनिपेठ), मयूर धर्मदास सारवान (१९) व अन्य एका जणाने ज्ञानेश्वर यांना मारहाण करण्यासह सुऱ्याने वार केला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री तिघांना शनी पेठ परिसरातून अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ रवींद्र पाटील करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी राहत्या घरामध्ये गळफास घेतलेले वैद्यकीय प्रतिनिधी दिनेश धर्मा ठाकूर (४७, रा. गौरव पार्क, खोटे नगर) यांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी (२८ जून) रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) असलेले दिनेश ठाकूर हे पत्नी व दोन मुलांसह खोटे नगर परिसरात राहत होते. गुरुवारी (२७ जून) त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार त्यांची पत्नी व मुलगा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना खासगी केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव रोडवरील धरणगाव महाविद्यालयासमोरील प्रवासी शेडमध्ये शुक्रवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास धरणगाव महाविद्यालयासमोर असलेल्या प्रवासी निवारा शेडमध्ये काही विद्यार्थ्यांना हा अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. विद्यार्थ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. दरम्यान, मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मयत व्यक्ती याठिकाणी कसा आला आणि त्याचा मृत्यू कशामुळे झाला, याचा अद्यापही उलगडा झालेला नाही.
मेष राशी संक्रमण तुमच्यासाठी शुभ, आनंददायी आणि लाभदायक असेल. कामात अडथळे येतील. समन्वय निर्माण करण्याची गरज असेल. राग टाळा. सर्व लोकांशी सुसंवादी वर्तन ठेवा. कल्पकतेने काम करणे फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्रात अधिक लक्ष द्यावे लागेल. तुमचे वर्तन सकारात्मक ठेवा. कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात. विद्यार्थी अभ्यासात व्यस्त राहतील. वृषभ राशी ग्रहांचे संक्रमण तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेले असेल. काम पूर्ण होईपर्यंत कोणालाच सांगू नका. अन्यथा काम बिघडू शकते. तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी अधिक मेहनत केल्यास परिस्थिती सुधारेल. खाजगी व्यवसाय करणाऱ्यांना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. शेअर्स, लॉटरी इत्यादींमध्ये गुंतलेल्या लोकांना विचारपूर्वक पुढे जावे लागेल. विद्यार्थी शैक्षणिक…

