चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील विष्णापूर येथील एका पत्रीशेड असलेल्या घरावर छापा टाकून ११ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. यात एकास अटक करण्यात आली. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. सायसिंग बरकत बारेला (३६, रा. विष्णापूर) असे या अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, विष्णापूर येथील सायसिंग बारेला हा गावातील शिवाजी पाडा परिसरातील एका पत्रीशेडमध्ये अवैध गांजा बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ११ लाख ५०० रुपये किमतीचा गांजा तसेच ६ हजार रुपये किमतीचा वजन काटा व मोटारसायकल जप्त केली आहे. पुढील तपास पोहेकॉ. अनवर तडवी हे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद टोलनाका येथे सीमाशुल्क अधिकारी, पुणे व जळगाव यांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत वाघाची कातडी जप्त करण्यात आली. जळगाव वनविभागाने सहा आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, या आरोपींमध्ये अजवर सुजात भोसले (वय ३५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर, ह. मु. चांगदेव), मोहमंद अतहर खान (५८ रा., भोपाळ), नदीम गयासुद्दीन शेख (२६, रा. अहमदनगर), कंगनाबाई अजवर भोसले (३०, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर), तेवाबाई रहीम पवार (३५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर), रहीम रफिक पवार (४०, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरलेले पाच मोबाइल, दोन दुचाकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या…
मेष व्यवसायात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी अधिक समन्वय राखावा लागेल. व्यवसायाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना व्यवसायात लाभाचे संकेत मिळतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती काहीशी अनुकूल राहील. छोट्या प्रवासाची शक्यता जास्त आहे. कला, अभिनय, संगीत इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे. वृषभ भाऊ-बहिणींचे सहकार्य आणि सहकार्य मिळेल. व्यवसायात केलेली मेहनत फायदेशीर ठरेल. नोकरीत नोकरदार, वाहन इत्यादींचा आनंद वाढेल. काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुम्हाला मिळेल. त्यामुळे समाजात तुमचा प्रभाव वाढेल. इमारत बांधकामाशी संबंधित लोकांना काही अडथळे आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. मार्गात वाहन अचानक बिघडू शकते. राजकारणात विरोधक षडयंत्र…
चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथे प्रांताधिकारी, तहसिल व भूमी अभिलेख आदी महसूल विभागाचे कार्यालय हे चाळीसगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असून बरेच कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो व किरकोळ कामांसाठी देखील या कार्यालयातून त्या कार्यालयात जाण्यासाठी पायपीट करावी लागते. ही कार्यालये शहराच्या रहदारीच्या ठिकाणी असल्याने वाहतुकीची कोंडी होणे यामुळे नागरिकांसह विविध शासकीय विभागांची देखील गैरसोय होत होती. अनेक तालुक्यांना सर्व विभाग एकाच ठिकाणी असणारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असल्याने चाळीसगाव तालुक्यात देखील ती असावी अशी मागणी अनेक दशकांपासून होत होती. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश येऊन…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा सुरु असून त्यांनी आज पुन्हा एकदा सरकारसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील म्हणाले कि, आता आरक्षण मिळवणे किंवा पाडापाडी करणे हेच उद्दिष्ट आहे. मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधारी हे उल्लू बनवत आहेत. आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच मराठ्यांना आरक्षण मिळू नये हा राजकीय लोकांचा डाव आहे. त्यांना मराठे मोठे व्हावेत असं वाटत नाही, असे ते म्हणालेत. यावेळी बोलतांना जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप केले आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा वाद सुरु असतांना आता शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाबाबत सुसंवाद करण्याची माझ्या पक्षाची भूमिका असेल. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलवावे आणि याप्रकरणी तोडगा काढला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारी विरोधकांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले होते. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलतांना शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, ”आरक्षणप्रकरणी मला एक चिंता वाटत आहे. ती म्हणजे दोन…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारांची भाईगिरी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना पोलीस प्रशासन देखील त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी नेहमीच सज्ज असतात. नुकतेच नाशिकमध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर शाही मिरवुक काढणे गुंडाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मिरवणूक काढल्याबद्दल पोलिसांकडून गुंडाला चांगलाच दणका देण्यात आला आहे. मिरवणुकीत चारचाकी गाडी चालवणाऱ्या चालकाला अटक करण्यात आली आहे. शिवाय ती चारचाकी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने शरणपूर भागात बेकायदा मिरवणूक काढणाऱ्या गावगुंडांच्या उन्मादाला नाशिक पोलिसांनी दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद पाटणकर हा एमपीडीए अंतर्गत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जेरबंद होता. त्याची नुकतीच कारागृहातून सुटका करण्यात आली होती. हर्षदची सुटका होताच त्याच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असतांना नुकतेच नवी मुंबईच्या बेलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सेक्टर 19 मधील शाहबाज गाव येथे चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. पहाटे 4.30 सुमारास ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने इमारत कोसळण्याआधी रहिवाशांनी रस्त्यावर धाव घेतली होती. त्यामुळे मोठी जीविहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडण्याआठी काही लोकांनी इमारतीतल रहिवाशांना सावध करत बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती आहे. इमारत कोसळल्याचीमाहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दोघे अडकले…
जळगाव : प्रतिनिधी देशी दारुच्या दुकानाची खिडकी तोडून चोरट्यांनी देशी दारुच्या तब्बल ७६८ बाटल्यांसह इतर साहित्य मिळून ६३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. ही चोरी २३ जुलै ते २४ जुलै दरम्यान तालुक्यातील नांद्रा येथे झाली. या प्रकरणी २५ जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नांद्रा येथे मनीष लालचंद झवर (५३, रा. नवीपेठ, जळगाव) यांचे देशी दारूचे दुकान आहे. २३ जुलै रोजी रात्री त्यांनी दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देशी दारू दुकानाची लोखंडी ग्रीलची खिडकी तोडून दुकानात प्रवेश केला. तेथून चोरट्यांनी ५३ हजार ७६० रुपये किमतीच्या देशी दारुच्या…
जळगाव : प्रतिनिधी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील निंबादेवी धरण शुक्रवारी ओव्हरफ्लो झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागासाठी शेतकऱ्यांना एक वरदान ठरले आहे. २००५ साली हे धरण पूर्णत्वास आले आहे. धरणामुळे येथील निसर्ग सौदर्य खुलले आहे. येथील पर्यटकांचे आकर्षण लक्षात घेता निंबा देवी धरण हे पर्यटन स्थळ घोषित करण्याची मागणी या परिसरातून होत आहे. यामुळे या परिसरातील लहान उद्योगांना चालना मिळू शकते. यावल तालुक्याच्या पश्चिम भाग हा आधी ड्रायझोन व डार्क झोन म्हणून घोषित होता. परंतु, आता आता या धरणामुळे चुंचाळे, सावखेडा सिम, नायगाव, दहिगाव, बोराळे, नावरे, गिरडगाव, वाघोदा, शिरसाड, साकळी, वढोदे या गावांमधील शेत शिवारात विहिरींना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत…

