Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी क्रिकेट खेळत असतांना झालेल्या वादातून मुशरफ खान सईद खान (वय १७, रा. मास्टर कॉलनी) याला काका पुतण्याने बेदम मारहाण केली. ही घटना दि. १ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मास्टर कॉलनीत मुशरफ खान सईद खान (वय १७) हा मुलगा वास्तव्यास आहे. दि. १ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता काही मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. त्यावेळी त्याचा तौफीक खान याच्यासोबत वाद झाला. त्यामुळे तौफीकचे वडील तौसिफ खान व जावेद खान सर्व रा. मास्टर कॉलनी, जळगाव या तिघांनी मुशरफ खान सईद खान या मुलाला बेदम…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील रसलपूर येथील दोन गटांमध्ये २० ते २५ वर्षांपासून सुरू असलेल्या जुन्या वादाचा सोमवारी पुन्हा भडका उडाला. यावेळी दोघांना जबर मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एका गटातर्फे मोटारसायकलला कट मारल्यानंतर रसलपूर ग्रामपंचायतसमोरील रस्त्यावर पुन्हा मोटारसायकल अडवून दमबाजी करीत दोन्ही चुलतभावांना मोटारसायकलच्या खाली ओढून दहाजणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर दुसऱ्या चुलतभावाला लोखंडी पाइपने पायावर व कानावर मारहाण करून गंभीर जखमी करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना १ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. परवेझ खान अय्युब खान याने मोटारसायकलचा जबर कट मारल्याने शरीफ खान हा जखमी झाला, पायाला दुखापत झाल्याने शरीफ खान याने त्याचा चुलत भाऊ…

Read More

मेष राशी विवाहासाठी पात्र लोकांना आज चांगली बातमी मिळेल. दूरच्या देशातून आलेल्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कार्यक्षेत्रात प्रिय व्यक्तीबद्दल विशेष आकर्षणाची भावना निर्माण होईल. कुटुंबात काही शुभकार्यक्रम घडतील. घरगुती जीवनात पती-पत्नीमध्ये आनंद आणि सौहार्द राहील. वृषभ राशी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल. प्रेमप्रकरणातील अंतर कमी होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. उपासनेची आवड निर्माण होईल. तुला छान झोप येईल. गाणी आणि संगीत मनोरंजनाचा आनंद मिळेल. शुभवार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधांमध्ये पैसे आणि भेटवस्तू मिळतील. मिथुन राशी कुटुंबातील सदस्यांच्या वागण्याने तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. प्रेमप्रकरणात जास्त भावनिकता हानिकारक ठरेल. मुलांच्या आनंदात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना जोरदार सुरु असल्याने प्रत्येक शहरातील महिलांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली असतांना आता पुन्हा एकदा निर्णय बदलला आहे. ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने’त नाव नोंदणी करण्यासाठी राज्यातील सेतू केंद्र चालकांना ५० रूपये राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे त्यांनी लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३) विधान परिषदेत बोलताना दिला. या योजनेसाठी लाभार्थ्यांचे रेशन कार्ड असेल, तर त्यांना डोमिसाईलची गरज नाही. योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल,…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जी.पी.एस.मित्र परिवारातर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जात असतात, नुकतेच दि.२ जुलै रोजी सकाळी पाळधी येथील दोन्ही बायपास येथे गोकुलनाथ या जातीचे रुक्ष लावण्यात आले हे वृक्ष साधारण 12 फूट उंचीची असून त्याची देखभाल सुद्धा मित्र परिवार तर्फे करण्यात येणार आहे. या वृक्ष रोपण साठी साई मंदिर संस्थानचे सुनील झंवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या प्रसंगी जि प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सह GPS मित्र परिवार चे सर्व सदस्य उपस्थित होते,,सदर उपक्रमाचे सर्वदुर कौतुक होत आहे

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दुचाकीच्या चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना नुकतेच नशिराबाद पोलिसांनी चोरीच्या सात दुचाकींसह अट्टल चोरट्याला अटक केली आहे. शाहबाज शेख अब्दुल रहेमान (24, नशिराबाद) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने नशिराबाद, जळगावच्या रामानंद, शनीपेठ तसेच जिल्ह्यातील अन्य तीन ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. नशिराबाद येथील प्रणव पाटील यांची दुचाकी चोरीला गेल्यानंतर तपासादरम्यान संशयीताची माहिती मिळताच त्यास अटक करण्यात आली. यांनी केली कारवाई ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युनूस शेख, हवालदार शिवदास चौधरी, हवालदार राजेंद्र ठाकरे, कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, कॉन्स्टेबल पंकज सोनवणे, कॉन्स्टेबर सागर बीडे, कॉन्स्टेबल प्रवीण लोहार, चालक…

Read More

मुंबई : प्रतिनिधी एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी आ.एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषद सभागृहात केली. यावेळी ते म्हणाले एप्रिल २०२४ मध्ये मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर व इतर तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळामुळे हजारो हेक्टरवरील केळी, गहू, मका, कांदा, ज्वारी व इतर पिके भुईसपाट होऊन शेतकरी बांधवांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊन शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसुल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले आहेत का व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक भागात गुन्हेगारी घटना घडत असून याचे कारण नेहमीच प्रेम प्रकरण येत असते अशीच एक थरारक घटना बिहार राज्यातील पाटणा जिल्ह्यात घडली आहे. लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचे डॉक्टर महिलेने गुप्तांग कापून टॉयलेटमध्ये फेकल्याची भयंकर घटना बिहारच्या सारण जिल्ह्यात घडली आहे. जखमी प्रियकरावर पाटणा स्थित रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी महिला डॉक्टर माधोरा येथे नर्सिमंग होम चालवते. तर पीडित तरुण त्या प्रभागाचा नगरसेवक आहे. दोघांत गत 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी नोंदणीकृत विवाह करण्याचा प्रयत्न केला होता. पण ऐनवेळी तरुण लग्नाला आलाच नाही. यामुळे संतापलेल्या महिलेने तरुणाला घरी बोलावून धारदार चाकूने त्याचे गुप्तांग कापले.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था दि.१ जुलै रोजी राज्यातील दूध दर प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली होती. यात जळगाव जिल्हा सहकारी दूध संघांचा प्रतिनिधी तसेच दूध दर समिती सदस्य आमदार मंगेश चव्हाण यांनी गायीच्या दुधाला किमान ३० रुपये दर द्यावा तसेच ५ रुपये प्रति लिटर अनुदान तात्काळ लागू करावे तसेच दुध भुकटी निर्यातीला अनुदान द्यावे आदी दूध उत्पादकांच्या संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या. आमदार मंगेश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळाले असून आज विधानसभेमध्ये राज्याचे दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व शासकीय व खाजगी दूध संघांना गायीच्या दुधाला किमान ३०…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२२ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास फुलरई गावात हा प्रकार घडला. अपघातानंतर रुग्णालयातील परिस्थिती भयावह बनली. मृतदेह आणि जखमींना बस-टेम्पोमध्ये भरून सिकंदरौ सीएचसी, एटा जिल्हा रुग्णालय आणि अलीगढ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. सिकंदरौ सीएचसीच्या बाहेर जमिनीवर 95 मृतदेह पडले होते. रात्रभर पोस्टमॉर्टेम झाले. 27 मृतदेह एटा जिल्हा रुग्णालयात पोहोचले. एकूण 122 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बाबा भूमिगत झाले असून रात्रभर पोलिसांनी छापा टाकला. पोलिस मैनपुरीतील बाबाच्या आश्रमात पोहोचले. पण बाबा तिथे सापडले नाहीत. 22 आयोजकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे, मात्र त्यात बाबाचे नाव…

Read More