मेष राशी आज जवळच्या व्यक्तीसोबत सुरू असलेला वाद मिटवल्याने नात्यात पुन्हा गोडवा येईल. अनावश्यक प्रवासाशी संबंधित कोणतीही योजना बनवू नका. आज तुम्ही कामात खूप व्यस्त असाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहू शकते. ॲलर्जी आणि रक्ताशी संबंधित काही समस्यांचे संकेत आहेत. व्यवसायात हुशारीने खरेदी-विक्री करा, अन्यथा नुकसान होऊ शकतं. वृषभ राशी आज तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रणही मिळू शकते. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. कलात्मक आणि ग्लॅमर क्रियाकलापांशी संबंधित लोकांना यश मिळेल. घराची व्यवस्था ठीक राहील. आरोग्याच्या दृष्टीने थोडा त्रास होऊ शकतो. मिथुन राशी आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. तुम्ही तुमच्यात नवीन ऊर्जा आणि ताजेपणा अनुभवू शकता. एखादी जुनी बाब…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच विविध माध्यमातून चर्चेत येत असतांना नुकतेच बारामतीत गुरुवारी दि.३ आयोजित पत्रकार परिषदेवेळी काही प्रश्नांवरून उपमुख्यमंत्री चांगलेच भडकले. तुम्ही काहीही प्रश्न विचारता. माझ्या योग्यतेचे प्रश्न विचारा. मी तुम्हाला उत्तरे देईन. मात्र तुम्ही काहीही प्रश्न विचारत राहिला की मग माझी सटकते, असे ते म्हणाले. बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे उद्घाटन लोकसभेपूर्वी अजित पवार यांनी केले. परंतु तेथील घरांचे वाटप अद्याप झालेले नाही. एकालाही घराची चावी मिळाली नसल्याची टीका खा. सुप्रिया सुळे यांनी बारामतीत नुकतीच केली होती. त्यावर पवार यांना विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिले. त्यानंतर उद्घाटनाच्या विषयावर स्पष्टीकरण द्यायलाही ते विसरले…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असून दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या बैठका सुरु आहे. तर त्यांनी आता थेट गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील म्हणाले कि, मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिकांयचे जे तुम्ही गणिते केले ते सर्वच्या सर्व फेल गेले. तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये आलेला हा सर्वांत मोठा पश्चताप असणार आहे. मराठ्यांनी आता शहाणेहोण्याची गरज आहे. आचारसंहितेपूर्वी जर आरक्षण दिले नाही तर तुमची सगळी गणिते बिघडवून टाकेन असा इशारा त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीचा अनुभव घेत विधानसभेची आचारसंहिता लागू देणार…
जळगाव : प्रतिनिधी दि.२ ऑक्टोबर २०२४ गांधी जयंती निम्मित स्वच्छ्ता ही सेवा कार्यक्रम अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या फोटोंचे पूजन करून स्वच्छ्ता उपक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमात युवती मंडळच्या अध्यक्ष वैष्णवी पाटील युवती व विद्यार्थिनीं सहभाग घेतला. यावेळी नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक कल्पना पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद येथील डॉ फ्रानको पिल्लाय आरोग्य सहाय्यक सुधीर चौधरी, सुरेश वाघ पी.बी डाके , आरोग्य सेविका काले सिस्टर , आशा सेविका मीरा बटारे सोनवद गावाचे सरपंच गुलाबराव पाटील उपसरपंच नारायण देवरे आदी उपस्थित होते.
जळगाव : प्रतिनिधी येथील जी.एम. फाउंडेशन, आमदार राजूमामा भोळे, शिवगंध व पेशवा ढोलपथक यांच्यावतीने शहरातील शिवतीर्थ येथे नवरात्रोत्सवाचे दि. ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. उद्या गुरुवार दि. ३ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन शहरात विविध ठिकाणी करण्यात आले आहे. तरुणाईला प्रोत्साहन म्हणून जी.एम.फाउंडेशन, आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने तसेच शिवगंध व पेशवा ढोल पथक यांच्या सहकार्याने शिवतीर्थ मैदानावर नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात मुंबई येथील रीदमॅटिक हिरोज बँड (ऑर्केस्ट्रा), भव्य दिव्य लाईट शो, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, भव्य मंडप याची सुविधा असून महिलांसाठी…
जळगाव : प्रतिनिधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जीपीएस मित्र परिवार व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने चिंचोली येथे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कुसुंबा, चिंचोली, धानवड, उमाळे, रायपूर, कंडारी, वराड, जळके, विटनेर, शिरसोली येथील नागरिक तपासणीसाठी आले होते. यावेळी 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच यातील 95 रुग्णांना गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले. चिंचोली येथील साईबाबा मंदिरात जीपीएस मित्र परिवारातर्फे व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत नेत्र तपासणी व…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बदलापूर चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अत्याचार प्रकरण तापल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार होते. पण या दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. बदलापूर घटनेच्या दीड महिन्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचने दोघांना ताब्यात घेतले. दोघांना पुढील चौकशीसाठी एसआयटी टीमकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. शिवाय आरोपींना अटक करण्यात सुरू असलेल्या दिरांगाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दात ताशेरेही ओढले होते. अखेर या दोन्ही आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका २४ वर्षीय तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत गत ६ महिन्यांपासून भुसावळातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी मध्यरात्री भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील एका भागात राहणारी २४ वर्षीय तरूणीची रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील शुभम कोळी याच्याशी ओळख झाली. त्यानंतर शुभम कोळी याने तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत तिच्यावर गेल्या ६ महिन्यांपासून भुसावळ शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून अत्याचार केला. त्यानंतर या तरुणीसोबत लग्न करण्यास शुभम कोळी याने नकार दिला. या प्रकारानंतर तरूणीने थेट भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार १…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील गरताड येथील केतन समाधान पाटील या १९ वर्षीय युवकास घटस्थापनेची तयारी करताना विजेचा जबर धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना २ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. ही माहिती मिळताच गरताड ग्रामस्थांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. चोपडा येथील फार्मसी महाविद्यालयात शिकत असलेला गरताड येथील १९ वर्षीय केतन समाधान पाटील हा २ रोजी दुर्गा देवीच्या घटस्थापनेची तयारी करत होता. या वेळी त्यास विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. मयत केतन पाटील याला तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मयत…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील मोहराळे येथे माहेरी राहत असलेल्या एका २० वर्षीय विवाहितेने बुधवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. विवाहितेने आत्महत्या का केली. याबाबत अद्याप कळू शकले नाही. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील लोणी पंचक येथील रहिवासी सिमरन आकीब तडवी (२०) ही विवाहित तरुणी आपल्या माहेरी आई- वडिलांकडे गेल्या काही महिन्यांपासून राहत होती. दरम्यान बुधवारी सायंकाळी तिचे आई आणि वडील यावल शहरात आले असता घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात राजू…

