मेष राशी आज मनासारख्या गोष्टी घडतील. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. अविवाहितांना आज खूश खबरी मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात वादळ येतील. त्यामुळे चिंता वाढेल. तुमच्या रागावर आणि जीभेवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही कायदेशीर गोष्टीत विचारपूर्वकच निर्णय घ्या. तरुणांनी करिअरवर अधिक फोकस द्यावा. आज उत्पन्न सामान्यच राहील. ऑफिसात वरिष्ठांशी समन्वय साधून काम करा. वृषभ राशी मालमत्ता किंवा इतर अडकलेल्या कामावर आज मार्ग निघेल. आज तुम्ही अनेक प्रकारच्या कामात व्यस्त असाल. जवळच्या व्यक्तीच्या आगमानामुळे दिवस आनंदात जाईल. कधी कधी तुम्ही चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊन चुकीचा निर्णय घेता. त्यामुळे तुम्हाला पश्चात्ताप होतो. धंदा व्यवसायात सहकाऱ्यासोबत चांगले संबंध ठेवा. कामगारांचं मनोबल वाढवा. असं…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु असतांना या निवडणूका नेमक्या कधी होणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात असतानाच, दोन महिन्यांनंतर; नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यामुळे आता त्या दृष्टीने राजकारणाची चक्रे फिरायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर यांच्यासोबतच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होतील, असे वाटत होते. मात्र या राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना, सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राच्या निवडणुका उशिराने होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. साहजिकच आता राज्यातील विधानसभा निवडणुका कधी होणार याविषयी उलटसुलट तर्क लढवले जात आहेत. या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचा…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या महिन्यात राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहिण योजना राबविली असून त्यानंतर या योजनेवर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते आता कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले असून कॉंग्रेस देखील कामाला लागले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि, राज्यामध्ये काँग्रेस सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी महालक्ष्मी योजना महिलांसाठी आणू. यात तर महिन्याला महिलांना तीन हजार रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला त्यात हजार रुपयांची वाढ करू, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेचे स्वागतच केले आहे. मात्र ती योजना कायम राहावी, भगिनींची…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात आत्महत्याच्या घटना घडत असतांना नुकतेच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एका आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी मारत आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या दोन्ही मायलेकींचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ही घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. आई आणि बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच अंत्यविधीसाठी निघालेल्या भावाचाही अपघात झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील गल्ले बोरगावमध्ये एक धक्कादायक…
मुंबई : वृत्तसंस्था देशासह राज्यात उद्या होणाऱ्या गणेश चतुर्थीची जोरदार तयारी सुरु असतांना या दिवशी देशभरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी दिवसभरात 3 शुभ मुहूर्त असतील. सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. गणेश पुराणानुसार, गणपतीचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्राचा मध्याह्न काळ म्हणजेच दिवसाच्या उत्तरार्धात झाला होता. हा शुभ काळ सकाळी 11.20 पासून सुरू होत आहे. यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी सुमुख नावाचा शुभ योग तयार होत आहे. हे देखील गणपतीचे एक नाव आहे. पारिजात, बुधादित्य आणि सर्वार्थसिद्धी योग तयार होत आहेत. या संयोगाने गणपती स्थापनेचे शुभ परिणाम आणखी वाढतील असे ज्योतिषी मानतात. शास्त्रानुसार गणेशाची अनेक रूपे आहेत, परंतु…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शरद पवार गटाचे नेते आ.जितेंद्र आव्हाड अडचणीत आले असून त्यांचावर सरकारची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल केली आहे. संभाजीनगर वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३५३(२) अंतर्गत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चुकीची माहिती प्रसारित करून सरकारची बदनामी केल्याचा आव्हाड यांच्यावर आरोप आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता. जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद झाला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या योजनांचे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या महिन्यात महायुती सरकारने ‘लाडकी बहिण’ योजना सुरु केली होती. त्यानंतर महायुती सरकारमध्ये सुरु असलेले वाद चव्हाट्यावर येत असतांना नुकतेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एकमेकांविरोधात तक्रार करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहीण योजनेचे श्रेय एकटेच घेत आहेत, असा आरोप इतर पक्षातील मंत्र्यांनी केला आहे. त्यावर आपण लवकरच या योजनेच्या अनुषंगाने एसओपी आणू, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना शांत केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून या योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या जनसमान…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील आडगावजवळील श्रीक्षेत्र मनुदेवी रस्त्यावर दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून २१ वर्षीय तरुणावर तिघांनी चाकूने हल्ला केला होता. या गुन्ह्यातील तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीस त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्यावर भुसावळ येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरावरून शनिवारी दर्शन घेऊन प्रशांत किशोर धनगर (वय २१, रा. चहार्डी, ता. चोपडा) हा तरुण घरी जात होता. दरम्यान शनी मंदिराजवळील फॉरेस्टच्या गार्डनसमोर दुचाकीचा धक्का लागला म्हणून चेतन संभाजी सोनवणे वय २०, रा. खेडी, ता. जळगाव), खुशाल शत्रुघ्न…
मेष राशी दिवसाची सुरुवात सुखद होईल. पण हृदयातून निर्णय घेण्यापेक्षा डोक्याने निर्णय घेतल्यास अनेक कामे मार्गी लागतील. प्रचंड व्यस्तता असूनही तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढाल. कोणतंही चांगलं काम मनाने करा. अडलेलं काम मार्गी लागेल. सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांनी वादापासून दूर राहावं. वैवाहिक संबंधात मधूरता राहील. आरोग्य उत्तम राहील. त्यामुळे कोणतीही चिंता बाळगू नका. पैशाची उधळपट्टी करू नका. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग आहे. गावाला जाण्याचा योग येईल. वृषभ राशी तुमच्या इच्छेनुसार वेळ घालवा. त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. नवीन ऊर्जा मिळेल. तुम्हाला आनंद वाटेल. तुमचे कार्य मार्गी लावा. भविष्याबाबत चिंतीत राहाल. तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. काही लोक तुमच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न…
मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या राज्यातील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दरम्यान राहुल गांधींच्या हस्ते पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. यानंतर सांगलीत जाहीर सभेला संबोधित करताना, “…काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या डीएनएमध्ये आहे”, असे स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, पूर्वी राजकारण व्हायचे, पण आज वैचारिक लढा सुरू आहे. भारताला सामाजिक प्रगती हवी आहे. पण त्याचा फायद काही निवडक लोकांनाच मिळत आहे. देशातील २०, २५ उद्योगपतीचे १६ लाख कोटी रूपये कर्ज सरकारने माफ केले. उद्योगपतींचे कर्ज माफ झाले, शेतकऱ्यांचेही झाले पाहिजे, अशी घणाघाती टीका राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर केली. काँग्रेसच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे ७० कोटी कर्ज माफ…

