धरणगाव : प्रतिनिधी श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला असून नव्या मालाला ७१५३ रुपये एवढा भाव मिळाला आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह गावातील विविध मान्यवरांनी भेट दिली. काटा पूजन श्रीजी जिनिंगचे संचालक नयनकुमार गुजराथी, जीवनसिंह बयस, सुरेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रा. आर. एन. महाजन, गुलाबराव वाघ, डी.आर.पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भानुदास विसावे, मुर्तजा बोहरी यांनी भेट दिली. नीलेश चौधरी, शिल्पेश सराफ, निखिल बयस, सागर कर्वा, मुकेश बयस, गजानन साठे, किरण अग्निहोत्री, चेतन कोठारी, दीपक पाटील आदी उपस्थित होते.
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटपाचा प्रश्न सुटत नसताना नुकतेच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा महायुतीमध्ये वाद निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. आ.गायकवाड म्हणाले कि, येत्या विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वामध्ये लढल्या जातील. शिवसेना 120 जागा लढवणार आहे. आमचे टार्गेट हे 100 जागा जिंकण्याचे आहे, असे म्हटल्याने आता नेमके महायुतीत जागा वाटप कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, आमच्या महायुतीतील नेत्यांना, कार्यकर्त्यांना बुद्धी यावी, जेणे करून ते चुकीचे वक्तव्य करणार नाहीत, अशी प्रार्थना करेल. आपण सगळे एक आहोत, आणि एक…
जळगाव : प्रतिनिधी गाय ही आमची माय आहे. गायीच्या दूधात भेसळ करणारी आमची औलाद नाही. मात्र चाळीसगावात ज्यांनी कत्तलखाने उभारण्यासाठी परवानग्या आणल्या त्या उन्मेश पाटलांनी दूध संघावर बोलू नये असा पलटवार जिल्हा दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी आज केला. दरम्यान जिल्ह्यातील दूध उत्पादकांना ७० पैसे बोनस देण्याची घोषणाही त्यांनी केली. जळगाव-भुसावळ महामार्गावरील एका हॉटेलात गुरूवारी जिल्हा दूध उत्पादक संघाची वार्षिक सभा चेअरमन आ. मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला मंत्री गिरीश महाजन, संचालक संजय पवार, प्रमोद पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सभेत पुढे बोलतांना चेअरमन मंगेश चव्हाण यांनी दूध संघाचा आढावा सादर केला. ते म्हणाले की,…
धरणगाव : प्रतिनिधी निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडा विद्यालयात धरणगाव तालुकास्तरीय शासकीय खो-खो क्रीडा स्पर्धा 2024-2025 चे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब श्री पी.सी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री के एस पाटील सर सोबत तालुका क्रीडासमन्वयक श्री.एस एल सूर्यवंशी सर उपस्थित होते याप्रसंगी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करतांना विद्यालयाचे प्राचार्य श्री के एस पाटील सर तसेच खेळाडूंना शपथ देतांना ज्येष्ठ शिक्षक श्री जे. जी पाटील सर उपस्थित होते तसेच पंच म्हणून श्री डी बी मनोरे सर, श्री व्ही बी पाटील सर यांनी काम पाहिले तसेच स्पर्धेसाठी तालुक्यातील सर्व शाळांचे संघ व संघ व्यवस्थापक उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन…
धरणगाव : प्रतिनिधी येथील जळगाव रस्त्यावरील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी खेड्यापाड्यातून व बाहेरगावाहून येत असतात, सदरील महाविद्यालयासमोर बस थांबा असल्यावर सुद्धा तेथे कोणत्याही डेपोची बस थांबत नाही त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींचे खूप हाल होत होते, या अनुषंगाने भारती विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी धरणगाव बस डेपोचे मॅनेजर यांच्याकडे निवेदन दिले व तसेच धरणगाव पोलीस स्टेशनचे पि आय साहेब श्री पवन देसले साहेब यांच्या कडे सुद्धा बस थांबावी म्हणून निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी युवा सेनेचे जितेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश विसावे ,उपाध्यक्ष नयन वाघरे, सोनू पारधी, ओम मुरावकर,…
जळगाव ; प्रतिनिधी नऊ गंभीर गुन्हे दाखल असलेला वाळूमाफिया ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी (वय ३६, रा. कोळन्हावी ता. यावल) याच्यावर एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले असून त्याला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत राहणारा रेकॉर्डवरील वाळू माफिया गुन्हेगार ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी यांच्यावर पोलीस ठाण्यात वाळू तस्करीसह विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आतापर्यंत वेगवेगळे ९ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्ञानेश्वर तायडे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक…
जळगाव : प्रतिनिधी विषारी औषध प्राशन केलेल्या साजन भगवान गायकवाड (३१, रा. आसोदा, ता. जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आसोदा येथील साजन गायकवाड यांनी २८ ऑगस्ट रोजी विषारी औषध सेवन केले होते. नातेवाइकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी (५ सप्टेंबर) त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी खासगी रुग्णालयामध्ये कामावर गेलेल्या अनिता रमेश दप्तरी (७३, रा. गुरुकृपा कॉलनी) या परिचारिकेच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन लाख ७० हजार रुपये किमतीचे सोने- चांदीचे दागिने, देवी-देवतांच्या मूर्ती व पूजा साहित्य चोरून नेले. स्वयंपाकाच्या ओट्याखाली भांडे ठेवलेल्या गोणीत एका कापडामध्ये दागिने गुंडाळून ठेवलेले असतानादेखील चोरट्यांनी ते चोरून नेले. ही घटना गुरुवारी भोईटेनगरात उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, भोईटे नगरातील गुरुकृपा कॉलनीमध्ये राहणाऱ्या अनिता दप्तरी या एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून कामाला आहेत. बुधवारी (४ सप्टेंबर) संध्याकाळी त्या मंदिरात हरिपाठासाठी गेल्या व तेथून त्या रुग्णालयात कामाला गेल्या. मध्यरात्री चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाकाच्या…
अमळनेर : प्रतिनिधी आदल्या दिवशी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने हटकल्याचा राग आल्याने तिघांनी दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याने एक जखमी झाला. एक बचावला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आरपीएफ पोलिस अधिकारी कुलभूषणसिंह चौहान यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ रोजी रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा चालकाला रेल्वे अभियंत्याचा वाहनाचा धक्का लागल्याचा आरोप करत रिक्षाचालक कार्यालयात गेला. त्यावेळी अभियंत्याने सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याला बोलावले हरेंद्र कुमार हा कर्मचारी पोहोचला. त्याने रिक्षा चालकाचा समाजवले. त्याचा राग आल्याने तीन जणांनी जीआरपी कार्यालयासमोरच दि. ६ रोजी दुपारी ३:३० वाजता हरेंद्र कुमारवर चाकुने हल्ला केला. त्यात हरेंद्र कुमारजखमी झाला. तसेच अर्जुन सिंग या अन्य आरपीएफ कर्मचाऱ्यावरही…
भुसावळ : प्रतिनिधी तलुक्यतील सुनसगाव बेलव्हाळ येथे बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा श्रावण पाचपांडे (रा. बेलव्हाळ) यांनी निमगाव रस्त्यावर असलेल्या गुरांच्या वाड्यात बैलजोडी व गाय बांधली होती. रात्रीच्या सुमारास कोणत्या तरी हिंस्र प्राण्याने गायीवर हल्ला करून गायीला ठार मारले. सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर, पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांना माहिती देण्यात आली. जितेंद्र काटे यांनी तलाठी व कुऱ्हा पानाचे वनविभाग कार्यालयात माहिती कळवली. काही वेळानंतर वनविभागाचे विलास काळे व नरेंद्र काळे घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. मयत गायीचे शवविच्छेदन कुन्हा पानाचे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येवले यांनी केले. याच ठिकाणी दोन-तीन…

