Author: editor desk

जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पाळधी-नाचणखेडा दरम्यान असलेल्या वाघूर नदीत पोहायला गेला असताना बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला. मृत तरुणाचे नाव सचिन प्रकाश बोरोले (२२, नाचणखेडा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाचणखेडा पुलाजवळील नदीपात्रामध्ये बांध बांधलेला आहे, त्याठिकाणी हे काही तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यातील तीनजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले; परंतु रात्रीच्या वेळी या भागात जोरदार पाऊस झाल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढलेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे तिघेजण बुडू लागले. मात्र त्यातील दोनजणांना वाचविण्यात यश आले. सचिन बोरोले हा बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नदीपात्राच्या बंधाऱ्याजवळ पाण्यावर तरंगताना आढळून आला. माहिती कळताच घटनास्थळी पो.नि. सचिन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कामावरुन घरी परतत असताना रस्ता ओलांडणाऱ्या सदू ओंकार चव्हाण (६५, मूळ रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा, ह. मु, नेहरुनगर) या सुरक्षा रक्षकास भरधाव बसने धडक दिल्यामुळे ते जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी रात्री सुमारास शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लॉन समोर झाला. पोलिसांनी बस व चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील सदू चव्हाण हे मेहरूण तलाव परिसरात एका अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. शनिवारी रात्री ते कामावरुन घरी जात असताना पाचोऱ्याकडे जाणाऱ्या बसने (एमएच २०, बीएल ११९७) त्यांना धडक दिली. यात सदू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाहून धडक देणारी बससह चालकाला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुंबई येथे सहकुटुंब उपचारासाठी गेलेल्या दिलीपकुमार रामदास साळुंखे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ५४ हजार ५०० रुपयांसह मोबाइल व चांदीचे दागिने असा एकूण ९४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (२७ सप्टेंबर) रात्री मोहननगरात घडली. रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साळुंखे हे दि. २१ सप्टेंबर रोजी सहकुटुंब मुंबई येथे रुग्णालयात गेले आहेत. त्यामुळे बंद असलेल्या त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात असलेले रोख ५४ हजार ५०० रुपयांसह २० हजार रुपये किमतीचा मोबाइल, ३०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या गणपती मूर्ती असा एकूण ९४ हजार ५००…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव बुद्धक गावात निलीमा कोळी (वय २८) या महिलेने आपल्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार घडली, तेव्हा या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव बुद्रुक ता. यावल येथील रहिवासी नीलिमा संजय कोळी (वय २८) ही विवाहिता शनिवारी आपल्या घरी होती. दरम्यान, तिने आपल्या घरातील स्वयंपाक घरात दोर बांधून गळफास घेतला हा प्रकार तिचे पती संजय भागवत कोळी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी धाव घेतली आणि विळ्याने दोर कापला. दोर कापल्यानंतर महिला जमिनीवर कोसळली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. तेव्हा तातडीने त्याला तेथून यावल ग्रामीण…

Read More

मेष राशी चांगली बातमी मिळेल. काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुम्हाला स्वादिष्ट भोजन मिळेल. तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागेल. कामाच्या ठिकाणी अधीनस्थांशी जवळीक वाढेल. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय योजना गुप्तपणे अंमलात आणाल. जवळच्या मित्राकडून चांगली बातमी मिळेल. वृषभ राशी दिवसाची सुरुवात अनावश्यक धावपळीने होऊ शकते. सुरक्षेत गुंतलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. तुम्हाला कोणत्याही विशेष मोहिमेत यश मिळेल. कार्यक्षेत्रात येणारे अडथळे विचाराने सोडवण्यात यशस्वी व्हाल. मिथुन राशी राजकारणातील भाषणाचे चौफेर कौतुक होईल. गायनाची आवड वाढेल. विश्वासार्ह व्यक्तीकडून मोठा विश्वासघात होऊ शकतो. व्यवसायात यश मिळेल. नोकरीतील तुमच्या वक्तृत्वाने तुमचे वरिष्ठ खूप प्रभावित होतील. प्रवासात नवीन मित्र बनतील. न्याय व्यवस्थेत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विविध राजकीय पक्षांसह निवडणुकीशी संबंधित सर्वच भागिदारांशी झालेल्या चर्चेचा संक्षिप्त तपशील सांगितला. तसेच निवडणुकीची प्रक्रिया विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी पार पाडण्याचे संकेतही दिले. त्यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक गुरुवारी सायंकाळी राज्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात या पथकाने शुक्रवारी विविध राजकीय…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव तालुक्यातील महावितरणच्या चाळीसगाव विभागाअंतर्गत येणाऱ्या ६ गावांना नवीन उपकेंद्रे तसेच तीन गावांच्या उपकेंद्राची क्षमता वाढविली जाणार आहे. यामुळे गावांकरिता येणाऱ्या २०३० पर्यंत ची गावांना लागणारी वीज व त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर विद्युत उपकरणे संच मांयुणी साठी ए.आय.आय.बी (आर.डी ५५) (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक) या योजनेअंतर्गत चाळीसगाव विभागीय कार्यातमयासाठी एकूण ७० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये नवीन ६ उपकेंद्राची निर्मिती होणार असून या उपकेंद्राची एकूण क्षमता (५५MVA) असणार आहे. त्यात तरवाडे गाव(१x५ MVA) बिलाखेड (१x५ MVA),टाकळी प्र.चा (१x५ MVA), डेराबर्डी (२x५ MVA), खडकी (४x१० MVA)चाळीसगाव(CTMS) (१x१० MVA) प्रमाणे क्षमता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्यातर्फे “झेंडूचं फुल” हि अस्सल लेवा गणबोली भाषेतील, हसता हसता गंभीर भाष्य करणारी नाट्यकलाकृती सलग दोन दिवस छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दाखविण्यात आली. दोन्ही दिवस प्रचंड प्रतिसादासह जळगावकरांनी उपस्थिती दिली. स्नेहयात्री प्रतिष्ठान निर्मित “झेंडूचं फुल” हे नाटक वीरेंद्र पाटील यांनी लेखन व दिग्दर्शन करून तयार केले आहे. त्याला राज्यशासनासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यात ७ कलाकारांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचे चित्रण दाखवून किती हाल अपेष्टा सहन करून तो स्वतःच्या परिवारासह समाज व देशासाठी योगदान देत असतो हे प्रभावीपणे सादर केले आहे. नाटकाच्या सुरुवातीला कलाकारांसह तंत्रज्ञांचा सन्मान खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे यांच्यासह माजी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील यशानंतर आज विजयी उमेदवारांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या विजयाचा जोरदार जल्लोष केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी सिनेटची निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ होती असा दावा केला. तसेच विधानसभा निवडणुकीतही असाच विजयाचा गुलाल उधळण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. सिनेटच्या निवडणुकीत आमचे 10 पैकी 10 उमेदवार विजय झाली. विजय काय असतो हे आम्ही दाखवून दिले. असाच विजय आम्हाला विधानसभा निवडणुकीत मिळवायचा असून, ही त्याची केवळ सुरुवात आहे, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी…

Read More

जळगाव :प्रतिनिधी सेवानिवृत्त टेलिफोन ऑपरेटर एकनाथ रामदास पाटील (वय 75, रा. साळवा, ता. धरणगाव, ह. मु. जळगाव) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकनाथ पाटील हे आजारी होते. आज त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सामाजिक कार्यकर्ते अमित पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगी, मुलगा,सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि. 28 रोजी दुपारी 3 वाजता राहते घर महाबळ कॉलनी च्या खाली संभाजीनगर चौक (डॉ. राहुल पाटील यांच्या घरासमोर) येथून निघणार असून नेरी नाका समशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत…

Read More