चाळीसगाव : प्रतिनिधी राज्यातील ग्रामसेवक संघटनांच्या बाबतीत नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महायुती सरकारने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यास मान्यता दिली आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची जोखीम व जबाबदारी सारखी आहे, हे पद एकच करावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला राज्याचे महायुतीचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी समजून घेतले व ऐतिहासिक निर्णय घेतला. याबाबत ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री.संजीव निकम यांच्यासोबत सोबत टेबल टू टेबल व फाईल टू फाईल पाठपुरावा केला. त्यामुळे 22 हजार ग्रामसेवक संवर्गाला सोन्याचा दिवस आला असून राज्यातील 32 जिल्हयात याचा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. आज चाळीसगाव येथे आलो असता तालुक्यातील सर्व ग्रामसेवक बंधू भगिनींच्या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी विद्यार्थ्यांसाठी संगणकशास्त्र विभागातर्फे “इंटरनेट ऑफ थिंग्स व करिअर संधी” या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले. इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) या विषयावरील सेमिनार मध्ये दैनंदिन जीवनात जसे स्मार्टवॉच, अँड्रॉइड मोबाईल, होम अप्लायन्स, स्मार्ट सिटी बद्दल उपयुक्तता कशी आहे, याविषयी संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. प्रियंका बऱ्हाटे यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितले. सदर सेमिनार श्री. राजेश ठाकरे, (संचालक, इलेक्ट्रोसॉफ्ट सिस्टीम, जळगाव) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी Internet of Things हा प्रकार काय आहे, या क्षेत्रात नोकरी व व्यवसायात असलेल्या उपलब्ध संधी या बद्दल माहिती दिली. तसेच…
नाशिक : वृत्तसंस्था उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सव गुरुवारी (दि. 3) पासून सुरू होत आहे. यात्रोत्सव काळात खासगी वाहनांना गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली असून गडावर जाण्यासाठी नांदुरीपासून ८० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी अनुकेश नरेश उपस्थितीत होते. बैठकीत विविध विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. उत्सव काळात दहा ते बारा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील…
जळगाव : प्रतिनिधी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेसंदर्भात आज गुरुवारी दि. २६ रोजी अंगणवाडी सेविका यांची महानगरपालिका येथे आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. लाडकी बहीण योजनेमुळे महिला सक्षम होत असून त्यामुळे परिवार सक्षम पर्यायाने समाज व देश सक्षम होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज न केलेल्या बहिणींनी देखील तत्काळ अंगणवाडी सेविकांकडे जाऊन अर्ज भरावा. म्हणजॆ त्यांना लाभ मिळेल, असे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले. महानगरपालिका येथे दुसऱ्या मजल्यावर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेसंदर्भात आज गुरुवारी दि. २६ रोजी बैठक उत्साहात पार पडली. यावेळी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड, गणेश चाटे, सहायक आयुक्त अश्विनी…
पारोळा : प्रतिनिधी एनईएस बॉईज् हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम बालुप्रसाद मिसर (वय ५५) यांनी शिपायाकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. ही मागणी दि. १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आली होती. त्यानंतर दि. २६ रोजी प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौतम बालूप्रसाद मिसर यांचे भाऊ यांची संस्थेचे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी ते उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. येथील शिपायांना बोलावुन नोकरी टिकवण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्या आधारावर तक्रारदाराने धुळे लाचलुचपत विभागाकडे दि. ९ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर दि.१० फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला. लाचेची ही रक्कम इतरांकडे…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दापोरा येथील २५ वर्षीय तरुणीचा रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दापोरा ते शिरसोलीदरम्यान दहा पुलाजवळ घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. सुवर्णा पंडित पाटील (वय २५, रा. दापोरा, ता. जळगाव), असे मयत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळची दापोऱ्यातील रहिवासी सुवर्णा ही सध्या शिरसोली येथील बहिणीकडे राहत होती. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ती शेतात जात होती. त्यावेळी दहा पुलाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेगाडीचा धक्का लागून तिचा जागीच मृत्यू झाला. तालुका पोलिस स्टेशनचे हवालदार अनिल फेगडे, अनिल मोरे, धनंजय पाटील यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात…
रावेर : प्रतिनिधी खानापूर-चोरवड सीमेवर बोकाळलेला जुगार व सट्ट्याचा बाजार भुसावळ येथील सहायक पोलिस अधीक्षक नीलोत्पल सिंह यांनी जानेवारी २०१८ मध्ये उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर सहा वर्षांनी फैजपूर सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी खानापूर येथील या सट्टा पिढीवर स्वतः धाड टाकून ११ आरोपींना ताब्यात घेत व आठ मोटारसायकलींसह ११ मोबाइल व ५ हजार २०० ची रोकड तथा सट्टयाचे साहित्य असा ३ लाख ९९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. तालुक्यातील चोरवड व खानापूर सीमावर्ती भागात तत्कालीन अधिकारी निलोत्पल सिंह यांनी अवैध धंदे ‘निल’ केल्यानंतर सतत तीन वर्षे अवैध धंदे सुरू करण्यासाठी कुणाचीही हिंमत…
रावेर : प्रतिनिधी भुसावळ येथून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे अवैध विक्रीसाठी घेऊन आलेल्या आरोपीस पाल रस्त्यावरील कुसुंबा ते लालमाती दरम्यानच्या बल्लारशहा बाबा दर्याजवळ पोलिसांनी पकडले. ही कारवाई २५ रोजी रावेर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल अनीस अब्दुल मज्जीद (वय ४६, रा. वडीखानका, मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यास अटक केली आहे. रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना याबाबतची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने रावेर पोलिस स्टेशनचे फौजदार तुषार पाटील तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. विष्णू बिन्हाडे,…
धुळे : वृत्तसंस्था शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारातील वनजमिनीवरील एका क्षेत्रात तूर व कापूस पिकाच्या आडोशात लावलेली गांजाची रोपे सांगवी पोलिसांच्या पथकाने जप्त केली. या मुद्देमालाची किंमत ३४ लाख ८० हजार एवढी आहे. या प्रकरणी ७ जणांविरोधात एनडीपीएसअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयितांपैकी ४ जणांना जेरबंद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील वनपट्टयात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती केली जाते. यावर्षीदेखील या परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजाची बेकायदेशीरपणे लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्या ठिकाणी त्यांना…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात महिलांच्या खुनाच्या दोन घटना घडल्या. पहिली घटना साकेगाव (ता. व भुसावळ) येथे, तर दुसरी घटना गोरगावले (ता. चोपडा) येथे घडली. सोनाली महेंद्र कोळी (वय २६, रा. साकेगाव) आणि बायशीबाई मोहन पावरा (४२, रा. गोरगावले) अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत. सागर रमेश कोळी (२८, रा. व साकेगाव) आणि अनिल वीरजी पावरा (३५, रा. गोरगावले) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साकेगाव येथे सोनाली कोळी ही महिला परिवारासह वास्तव्याला होती. बुधवारी, २५ सप्टेबर रोजी रात्री २ ११:३० च्या सुमारास महिलेचे गावातील सागर कोळी यांच्याशी भांडण झाले. या भांडणातून सागर याने चाकूने सोनाली हिच्या पोट…

