धरणगाव : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून प्रचाराचा झंझावात सुरु झाला असून घर तेथे ‘धनुष्यबाण’ पोहचविण्याचे काम सुरु असून “कहो दिलसे, गुलाबराव पाटील फिरसे” हा नारा गावा – गावांमधील प्रचार रॅलीमध्ये गाजत आहे. युवक , जेष्ठ नागरिक , दिव्यांग बांधव हे स्वयंस्फुर्तीने गुलाबराव पाटील यांना रॅलीमध्ये भेटत असून भक्कम विजयाची हमी देत आहे. “घरोघरी धनुष्यबाण” हे मिशन पोहचविण्याचे काम महायुतीचे कार्यकर्ते करीत असून गुलाबराव पाटील जनतेशी थेट संपर्क साधत असल्यामुळे त्यांना दिव्यांगांसह जेष्ठांचे आशीर्वाद व दुवा मिळतांना दिसत आहे. दिवाळीत धूम – धडाका ‘धनुष्यबाणाचा’ प्रचार जोरात धरणगाव तालुक्यातील वराड बु.,वराड खु., हिंगोणे बु., हिंगोणे खु., कल्याणे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी कुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलेले असताना त्र्यंबक नगरात दीपक सखाराम खांडेलकर यांच्याकडे तब्बल वीस लाख रुपयांची धाडसी घरफोडीची घटना बुधवारी (दि. ३०) सायंकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार दीपक खांडेलकर त्र्यंबक नगरातील साखरवाडी भागात वास्तव्याला आहेत. २२ ऑक्टोबर रोजी ते कुटुंबासह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलेले होते. बुधवारी दुपारी ते घरी पोहोचले असता घराचा दरवाजा व कडी कोयंडा तुटलेला होता. कपाटात ठेवलेल्या पाटल्या, कंगन, नेकलेस, टॉप, तीन अंगठ्या साखळी, ब्रेसलेट आदी २५ तोळ्याचे सोन्याचे दागिने व तीस हजार रुपयांची रोकड गायब झाल्याचे लक्षात आले. खांडेलकर यांनी लागलीच रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. अपर पोलिस अधीक्षक अशोक नकाते उपअधीक्षक…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील द्वारका नगरात भरदुपारी संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. वर्षा अक्षय गुंजाळ (२४) असे मयताचे नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी आणि महिलेचा पती अक्षय गुंजाळ याला मनमाड येथून ताब्यात घेतले. त्याला भुसावळ न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त शहरात लगबग सुरू असताना व सर्व दिवाळीची तयारी करत असताना शहरातील द्वारका नगर सात नंबर पोलिस चौकीच्या मागे येथे खुनाची घटना घडली. २४ वर्षीय विवाहिता वर्षा अक्षय गुंजाळ रा. उल्हासनगर, ह. मु. द्वारका नगर, भुसावळ हिचा पतीसोबत वाद झाला. त्यानंतर अक्षय याने वर्षा हिला लोखंडी रॉडने मारहाण…
पारोळा : प्रतिनिधी वायरमन विकास रमेश पाटील (३२) हे रविवारी सायंकाळी पाचोरा-भडगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथून काम आटोपून पाचोरा येथील घर काही अंतरावर असताना निर्मल सीड्सजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा एक पाय तुटून अपघातस्थळपासून २० फूट दूर फेकला गेला होता. डोक्यास व शरीरास गंभीर दुखापत झाल्याने ते गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
चोपडा : प्रतिनिधी भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दि. ३० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील देवगाव-देवळी गावाच्या खडकी नाल्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील खाचणे येथील भानुदास पुंडलिक पाटील (वय ६४) खासगी कामानिमित्त दुचाकीने (एम. एच. १९ एजे ४३९७) अमळनेरकडे येत असताना देवगाव देवळी फाट्याजवळ चोपड्याहून बदलापूरकडे जाणाऱ्या एस. टी. बसने (एम. एच. २० बीएल २५३८) दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. अपघातात भानुदास पाटील रस्त्यावर दूरवर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयताच्या चुलत भावाच्या फिर्यादीवरून बसचालक शेख…
यावल : प्रतिनिधी यावल भुसावळ रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर रोजी एका दाम्पत्याच्या दुचाकीचे टायर फुटून अपघात घडला होता. यात पती जागीच ठार झाला होता तर पत्नी गंभीर जखमी झाली होती. गंभीर जखमी असलेल्या हेमलता जगदीश अत्तरदे यांचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मंगळवारी शिरसाड गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, यावल भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर पेट्रोल पंपाच्या समोर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता भुसावळकडून यावलकडे दुचाकी क्रमांक एम. एच.१९, एन. २४३३ द्वारे जगदीश वासुदेव अत्तरदे (वय ५३) व त्यांची पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे (वय ४५) हे पती-पत्नी येत होते. दरम्यान, पेट्रोल पंपाच्या जवळ त्यांच्या दुचाकीचे पुढील टायर…
मेष राशी आज मनोरंजक आणि नियोजित गोष्टींमध्ये व्यस्त राहणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरेल. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये मधुर अनुभवांची आदान-प्रदान होईल. त्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. आज तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या टीमसोबतींसोबत मिळून जे काही काम कराल ते यशस्वी होईल. तुमच्यापेक्षा अनुभवी आणि हुशार लोकांकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही खूप आनंदी राहाल. तुमचे पैशांच्या बाबतीत जे काही वाद होते ते आज सुटतील. आज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ आहे. वृषभ राशी आज तुमचे काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज आहे. नवीन कामाची सुरुवात टाळा. घरी आणि कामाच्या ठिकाणी जीभेवर नियंत्रण ठेवा. संध्याकाळी जोडीदाराबरोबर शॉपिंगला जाऊ शकता. आज भाग्य 89%…
मुंबई : वृत्तसंस्था शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्यानंतर गेल्या 36 तासांपासून ते अज्ञातवासात गेले होते. यानंतर आता वनगांचा कुटुंबयाशी संपर्क झाला . मध्यरात्री तीन वाजता श्रीनिवास वनगा हे घरी येऊन पुन्हा नातेवाईकांकडे गेले. श्रीनिवास वनगा हे तिकीट नाकारल्यामुळे डिप्रेशनमध्ये घर सोडून गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून आरामाची गरज असल्याने वनगा पुन्हा नातेवाईकांकडे गेले. श्रीनिवास वनगा यांची वर्षा बंगल्यावर जाण्याची इच्छा नसल्याचे पत्नीने स्पष्ट केले आहे गेल्या 36 तासांपासून बेपत्ता असलेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचा शोध लागला आहे. महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून या काळात समाजमाध्यमांवर कुठलीही पोस्ट करतांना अथवा प्रतिक्रिया देतांना तसेच पक्षाचा अथवा उमेदवारांचा प्रचार करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियावर आचारसंहिता काळात आक्षेपार्ह पोस्ट करणार्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार असून अशी पोस्ट करणार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सोशल मिडियावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या काळात फेसबुक, व्हॉट्सप, ट्विटर, गुगल, शेअरचॅट, टिकटॉक, बिग टीव्ही यासारख्या माध्यमातून खोटी माहिती देणे, अफवा पसरवणे, सोशल मीडियावर…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभेसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केले असून आज जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी भाजपचे माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी देखील उमेदवारी दाखल केल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी भाजपचे माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी दि.२९ रोजी दुपारी तहसील कार्यालयात आपली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली होती. मयूर कापसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे त्यामुळे जळगाव शहर भाजपला दुसरा धक्का बसला आहे.

