जळगाव : प्रतिनिधी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने जामनेर तालुक्यातील रांजणी येथील तक्रारदार महिलेसह इतर महिला थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहचल्या. यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले असून कारवाई करावी, अन्यथा आंदोलनास बसण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात संगीता दिलीप मगरे (मु. पो. राजणी, ता. जामनेर) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी राजणी गावात कार्यकर्ते बैंड लावून नाचत होते. त्यावेळी एक जणाने गाणे बंद करा, असे म्हणत वाद घालत मारहाण केली. या संदर्भात संगीता मगरे यांनी फत्तेपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र कारवाई होत नसल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे…
Author: editor desk
मेष राशी कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त राहिल्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. परिस्थितीनुसार वागावे. तयारीसह पुढे जा. सल्ले आणि सूचनांकडे लक्ष द्या. धोरणात्मक नियमांकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. वृषभ राशी कामाच्या ठिकाणी अशी काही घटना घडू शकते ज्यामुळे वर्चस्व वाढेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा. यशाची टक्केवारी जास्त असेल. विरोधक शांत राहतील. ध्येय स्पष्ट ठेवा. करिअर आणि व्यवसायासाठी समर्पित व्हा. मिथुन राशी कामात अशांततेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. संयमाने पुढे जात राहा. दक्षता आणि सातत्य ठेवा. सेवा व्यवसायाच्या क्षेत्रात प्रभावशाली राहील. कामात सावध राहाल. मेहनती राहतील. शिस्त वाढेल. व्यावसायिकतेने काम…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचा सरकार स्थापन करण्याचा तिढा अजून सुटला नसून भाजपने सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरचा मुहूर्त काढला आहे. पण महायुतीला या सरकारचे नेतृत्व कोण करणार? याविषयीची उत्कंठा अद्याप संपली नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज तातडीने दिल्लीला जाणार आहेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे भाजप एकनाथ शिंदेंच्या नाराजीकडे कानाडोळा करून महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली. त्यानंतर 23 तारखेला निकाल लागला. त्यात सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा दारुण पराभव…
नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. लोकसंख्या घटणे ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) 2.1 च्या खाली जाते, तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घालायला हवीत, हे महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते. नागपुरातील कठाळे परिवाराच्या सामाजिक कार्याला 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त कठाळे कुल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी लोकसंख्याबाबत चिंता व्यक्त केली. लोकसंख्येतील घट ही चिंतेची बाब आहे. आधुनिक…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यासह जालन्याच्या वातावरणात दोन दिवसांपासूनकमालीचा बदल झाला असून या आठवड्यात ३, ४ आणि ७ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. हा पाऊस रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो, तर द्राक्षबागांसाठी मात्र नुकसानकारक ठरणार आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हिवाळ्यातील थंडीला सुरुवातझाली. सुरुवातीपासूनच हवेतीलगारवा वाढत किमान तापमानातहळूहळू घट झाली. नोव्हेंबरमहिन्याच्या तुलनेत तापमानाचा पारापाच ते सात अंशाने घसरला.नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमान कमालीचे घटल्याचेपाहायला मिळाले. शिवाय माेठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाल्याने त्याचाही परिणाम दिसून आला.यामुळे जिल्ह्यातील जमिनीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. परतीच्या पावसाने मागीलआठवड्यात ब्रेक लावल्यानंतरथंडीला सुरुवात झाली. नोव्हेंबरमहिन्यात थंडी कमालीची वाढली.पुढील कालावधीत कमालीचा चढउतार नोव्हेंबर महिन्यात पाहायला मिळाला,…
पाचोरा : प्रतिनिधी बॅनर फाडून दुकानदारावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना पाचोरा शहरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ रोजी मध्यरात्री २च्या सुमारास शहरातील भुयारी मार्गालगत असलेल्या दुकानाजवळील बॅनर फाडले. त्याबाबत दुकानदार भावेश संजय पडोळ याच्याशी सूरज राजू पवार (३०, पाचोरा) व कुणाल मोरे (२९, मिलिंदनगर, पाचोरा) यांनी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच धारदार शस्त्राने पाठीवर, कानाजवळ मारहाण करीत गंभीर जखमी केले. यावरून जखमी भावेश पडोळ यांचे वडील संजय पडोळ यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अमळनेर : प्रतिनिधी शेताच्या वादावरून पोलिसाला सख्खा भाऊ आणि पुतण्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता जानवे येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदास अर्जुन पाटील (५२, जानवे) (मुंबई पोलिस) हे ३० रोजी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत रोटा मारण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले असता त्यांचा भाऊ ट्रॅक्टर पुढे येऊन शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच त्याने हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने गुरुदास यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. पुतण्या कल्पेश चंद्रकांत पाटील यानेदेखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी भांडण आवरले. तेव्हा चंद्रकांत पाटील याने ठार मारण्याची धमकी दिली. दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यावर गुरुदास यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चंद्रकांत पाटील व कल्पेश यांच्याविरुद्ध…
जळगाव : प्रातिनिधी एका खासगी बँकेतील धनादेश पेटीतून (चेक ड्रॉप बॉक्स) धनादेश चोरून, त्यावर रासायनिक प्रक्रियाद्वारे स्वतःचे नाव टाकून ते धनादेश राज्यातील इतर बैंक खात्यामधून वटवून २ लाख ५८ हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे विसनजी नगरातील बैंक ऑफ बडोदा येथे ग्राहकांच्या सुविधेसाठी धनादेश पेटी (चेक ड्रॉप बॉक्स) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेकडून दिवसातून तीन वेळा या पेटीत असलेले धनादेश काढून त्यावर पुढील कार्यवाही केली जाते. ४ ते ७ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या बँकेत काही ग्राहकांनी लेखी तक्रार देत त्यांच्या खात्यात त्यांनी २२ व २३…
भडगाव : प्रतिनिधी गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवसांत सात वाहने जप्त करण्यात आली आहेत. पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली २५ रोजी मध्यरात्री वाळूचे ३ डंपर व १ ट्रॅक्टर जप्त करून तहसील – कार्यालयात जमा केले आहेत. तसेच २९ रोजी टोणगाव येथील घोडदे परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडले. ३० रोजी रात्री १:३० वाजता पिंपळगाव बुद्रुक गिरणा नदीच्या पात्रातून वाळू वाहून नेत असलेले १ डंपर पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहे.
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील मुक्ताईनगर -बऱ्हाणपूर रस्त्यावरील पूर्णाड फाट्याजवळ मुक्ताईनगर पोलिस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांच्या संयुक्त कारवाईत सुमारे दोन कोटी रुपयांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलिसात पो. हे. कॉ. रवींद्र अभिमान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून साकारउल्ला अब्दुल अजीज (३०, रा. इमाम नगर, हरयाणा) व कैफ फारुख खान (१९, रा, ढळायत राजस्थान), तारीफ लूकमान खान (२३, रा. इमाम नगर, हरयाणा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी बऱ्हाणपूरकडून मुक्ताईनगरकडे माल ट्रकमधून (एन.एल. ०१/ एजे १७२५) महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक…

