मालवण : वृत्तसंस्था पुणे, हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. एका युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दि.२२ सकाळी ११. २० च्या सुमारास तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रकिनाऱ्यावर घडली. रोहित बाळासाहेब कोळी (वय २१), शुभम सुनील सोनवणे (वय २२) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (वय २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), ओंकार अशोक भोसले (वय २४) यांच्यावर उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त असे कि, पुण्यातील युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते.…
Author: editor desk
भडगाव : प्रतिनिधी भडगाव पोलिसांनी दुचाकी चोरट्यांवर आता मोठी कारवाई करीत दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई १७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली. सत्यपाल दत्तात्रय निकम (रा. वडजी, ता. भडगाव) असे अटक केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी शेख मुनाफ शेख युसुफ (वय ३५, व्यवसाय – महा. बॅटरी दुकान, रा. हकीम नगर, भडगाव) यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान, भडगाव शहरातील बाळद रोड परिसरातून त्यांच्या दुकानासमोर उभी असलेली १०,००० रुपये किमतीची लाल रंगाची बजाज सी.टी. १०० मोटारसायकल (क्र. एमएच १९ एए १०९६) अज्ञात चोरट्याने…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आल्यानंतर अनेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील पुणे येथील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबतीत ते काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. त्याला कारणही तसेच आहे. रवींद्र धंगेकर यांनी व्हाट्सअपला स्टेटस ठेवत सगळ्यांच्या नजरा खिळवल्या आहेत. गळ्यात भगवा परिधान करून धंगेकर यांनी ‘शहा का रुतबा’ हे गाणे त्याला लावले आहे. त्यामुळे आता धंगेकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यामध्ये भारतीय…
जालना : वृत्तसंस्था राज्यातील जालना येथे मजुराच्या पत्र्याच्या शेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मध्यरात्री साडेतीन वाजता दुर्दैवी घटना घडली. महिला आणि १३ वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आले, पण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील पासोडी – चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम करणारे मजूर होते.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कि, जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील ही दुर्दैवी घटना घडली. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना…
अहिल्यानगर : वृत्तसंस्था ‘आरोप झाल्यावर मंत्र्यांनी एक क्षणही पदावर राहणे योग्य नाही. हा त्यांचा दोष आहे. मंत्र्यांचे आचरण, विचार शुद्ध असायला हवेत. जीवन निष्कलंक हवे. अपमान सहन करण्याची शक्ती असेल तरच जनता तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे अनुकरण करील,’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. अशा व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान देण्यापूर्वीच विचार होणे आवश्यक होते, अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या प्रमुखांचे कानही टोचले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तसेच न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अण्णांनी ही प्रतिक्रिया दिली. पण त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. हजारे म्हणाले, राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी जनतेसमोर आदर्श…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गोंदेगाव ते रोटवद दरम्यान रस्त्याच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २० फेब्रुवारीला रात्री साडेदहा वाजता घडली. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा बळी गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील रोटवद येथील देवकाबाई शिवाजी मराठे (वय ५५) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी शिवाजी मराठे हे आपली आई देवकाबाई मराठे यांच्यासोबत २० फेब्रुवारी रोजी नातेवाईकांकडे चिंचपुरा गावाला गेले होते. तेथील काम आटोपून घरी परतत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात देवकाबाई मराठे यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कॉन्ट्रॅक्टरने रस्त्यावर…
जळगाव : प्रतिनिधी वजन कमी करण्याचे प्रॉडक्ट घेतले अन् तिथेच उद्योजकाला जाळ्यात अडकवून फ्रेंचाइजीच्या नावाने ३९ लाख ५० हजार रुपयात गंडविण्यात आले. अशोक गिरधर बियाणी (६८, रा. गणपतीनगर) असे उद्योजकाचे नाव आहे. दीपेश कमलेश रूपानी (रा. श्रीराम कॉलनी) व आकाश सूरजमल सिध्दू उर्फ आकाश वर्मा (रा. अमरावती) या दोघांविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अशोक बियाणी यांचा मुलगा निकुंज बियाणी याला दीपेश रूपानी याने हर्बोलाईफचे वजन कमी करण्याचे उत्पादन – विकत दिले होते. नंतर फ्रेंचाइजी घेण्याचा सल्ला देत गुंतवणूक करण्यास सांगितले. रूपानी व कंपनीचे व्यवस्थापक आकाश वर्मा या दोघांनी योजना सांगून फसवणूक केली. सायबर…
जळगाव : प्रतिनिधी खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातून जामीनावर सुटताच भावासोबत घरी शाहू नगराकडून जात असताना प्रतीक हरिदास निंबाळकर उर्फ पपई (२८, रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर मारेकरी तिथून लगेच पसार झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता शाहू नगरात घडली. भूषण भरत सोनवणे (वय २५. रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्या खुनाच्या गुन्ह्यात प्रतिक चार वर्षापासून कारागृहात होता. या खुनाचा बदला म्हणून प्रतिकच्या खुनाचा प्रयत्न झाला. सविस्तर वृत्त असे कि, ८ नोव्हेंबर २०२० रोजी भूषण भरत सोनवणे उर्फ अठ्ठा याचा खून झाला होता. या गुन्ह्यात प्रतिकला अटक झाली होती. २१ रोजी सायंकाळी कारागृहातून सुटका झाली. प्रतिक याला ९…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील परसाडे येथील शेतकऱ्याच्या खळ्याला गुरुवारी अचानक आग लागली. यातएका बैलाचा होरपळून मृत्यू झाला, तर दुसरा बैल भाजल्याने गंभीर जखमी झाला आहे. खळ्यातील शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे कि, परसाडे येथील शेतकरी प्रभाकर शंकर पाटील यांचे गावालगत खळे आहे. या खळ्यात गुरुवारी अचानक आग लागली. आग लागल्याचे निर्दशनास येताच नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावल नगरपालिकेचा अग्निशमनबंबही दाखल झाला. फायरमॅन कल्पेश बारी, कैलास काटकर, शिवाजी पवार यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. आग लागताच नागरिकही मदतीला सरसावले. मात्र आगीचे रौद्ररूप धारण…
जळगाव : प्रतिनिधी रेल्वेत चढताना तोल जाऊन पडल्याने जळगावातील पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरातील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पुणे येथे मंगळवारी सायंकाळी घडली. चेतन (जय) दिनेश पाटील (२०) असे या मृत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, तो गेल्या काही दिवसांपूर्वीच पुणे येथील एका कंपनीत नोकरीला लागला होता. मंगलवारी सायंकाली तो रेल्वेत चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्यातच त्याचा अंत झाला. रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडील मोबाइलवरील क्रमांकावरून चेतन याच्या मामाला या घटनेची माहिती दिली. यानंतर चेतन याच्या परिवाराला अपघाताची माहिती देण्यात आली. त्याचा मृतदेह बुधवारी दुपारी जळगावात आणण्यात आला. त्यावेळी आई, वडील आणि नातेवाइकांनी एकच आक्रोश…

