मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसपासून राज्यात दिशा सालियन मृत्यू प्रकरण जोरदार चर्चेत आहे. यात आता दिशाच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आल्यानं राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. आज भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. सतीश सालियन यांच्यावर दबाव होता. घरी पेडणेकर ताई जायच्या. आणि इतर लोक जायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. ते दु;खात होते. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हता. डॉक्टर बदलले गेले. रुग्णवाहिका बदलली. तीथे जो…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कानसवाडा-शेळगावचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (३८) यांच्या खूनप्रकरणी परेश उर्फ सोन्या भरत पाटील (२६) व देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील (२४) या दोघं भावांना अटक करण्यात आली. या दोघांचे वडिल भरत भास्कर पाटील हा पसार आहे. अटकेतील दोघांना २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ग्रामपंचायतच्या कामकाजाच्या जुन्या वादातून माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा २१ मार्च रोजी सकाळी खून केला होता. यातील देवेंद्र पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २१ रोजी अटक केली. दुसरा संशयित परेश पाटील याला नशिराबाद पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील विवरे येथे मेंढ्यांनी भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १८ बीजी ४२१६) उटखेडा ते विवरे दरम्यान सबस्टेशनजवळ उलटला. या अपघातात ट्रकमधील १२५ पैकी २२ मेंढ्या ठार झाल्या. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. अपघातात ट्रकचालक आणि क्लिनर हे जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, ट्रक इंदूरहून मेंढ्या घेऊन हैदराबादकडे जात होता. विवरे ते उटखेडे दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथून वाहन चालवणे जिकरीचे झाले असून, अपघातस्थळी असलेला मोठा खड्डाच अपघातास कारणीभूत ठरला. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. या अपघातात चालक रईस खान (वय ४६), क्लिनर विजय (वय २७) आणि पवन (वय ३०) हे तिघे जखमी झाले…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील कुख्यात गुंड मुकेश भालेराव याची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर, या प्रकरणी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये मयताची पत्नी सुरेखा मुकेश भालेराव हिचाही समावेश आहे. यात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश प्रकाश भालेराव (वय ३१) हा भुसावळ शहरातील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर तब्बल २६ गुन्हे दाखल होते. या गुन्हेगाराचा १३ मार्च रोजी बेपत्ता झाल्यानंतर शोध सुरू होता. या घटनेनंतर मयताचा भाऊ अविनाश भालेराव याने भुसावळ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मनोज राखुंडे, जितू भालेराव, रोहन तायडे, सुरेखा भालेराव हिच्यासह दोन अल्पवयीन तरुणांविरुद्ध…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज वडिलोपार्जित मालमत्ते संबंधित बाबी सोडवल्या जाऊ शकतात, वैयक्तिक कामात व्यस्तता येईल. घरात धार्मिक कार्यक्रमांसह सकारात्मक ऊर्जा प्रबळ राहील. तुमच्या प्रत्येक योजना गुप्त ठेवा. अन्यथा कोणीतरी त्यांचा फायदा घेईल. दुसऱ्याच्या वैयक्तिक बाबींपासून स्वत:ला दूर ठेवा. पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या. कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेऊ नका. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमचा अहंकार सोडून द्यावा लागेल. तरुणांच्या करिअरच्या चिंता दूर होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवास टाळणे हिताचे ठरेल. एखादी समस्या परस्पर समंजसपणा सोडवाल. व्यवसायात राग तुमचा शत्रू बनू शकतो. मिथुन राशी आज तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची आणि विचारांची…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव येथे काल दि.२१ रोजी दीड हजाराची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक करण्यात आले असतांना आज पुन्हा एकदा जळगाव एसीबीने धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावातील ग्राम विकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७ वर्षे) यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. आरोपीने तक्रारदाराकडून गटारी आणि गावहाळ बांधकामाच्या बिलाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावात तक्रारदाराने २ लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते, ज्यासाठी त्यांना २ लाख ६४ हजार रुपयांचे चेक मिळाले. मात्र, ग्राम विकास अधिकाऱ्याने या बिलांच्या प्रक्रियेसाठी १० टक्के लाचेची मागणी (२७ हजार रुपये)…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजीनगर उड्डाण पुलाजवळ रेल्वे स्थानकानजीक दि.२२ मार्च रोजी शनिवारी शहराकडे येणाऱ्या अवजड ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उतारावरून वेगाने मागे गेला. यामुळे मागे असलेल्या तीन रिक्षा आणि तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगरकडून शहरात येण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते आज दि.२२ रोजी दुपारच्या सुमारास एक ट्रक पुलावर चालत असतांना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्या ट्रक रिव्हर्स गेला तर मागे असलेल्या रिक्षा MH-19-V-9202, MH-15-AK-5312, MH-19-V-8971 दुचाकी: बजाज पल्सर (MH-19-EM-4268), टीव्हीएस ज्युपिटर (MH-19-DU-7865), बजाज पल्सर (MH-19-EB-8278), हिरो स्प्लेंडर (MH-19-EK-9814) याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तिन्ही रिक्षा पूर्णतः निकामी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सम्राट कॉलनी परिसरात उभ्या ट्रकच्या टाकीतून डीझेल चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी यावल मधून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाहनांमधील डीझेल चोरीच्या घटना घडत होत्या. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिषेक अशोक तिवारी यांनी १६ मार्च रोजी त्यांच्या मालकीच्या दोन ट्रक वडेश्वर महादेव मंदिराजवळील रस्त्यावर पार्क केले होते. त्यामध्ये ९,२०० रुपये किंमतीचे १०० लिटर डीझेल भरून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी चालक सैय्यद एजाज अकबर ट्रकजवळ गेला असता, टाकीतील संपूर्ण डीझेल गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. चोरी झाल्याची खात्री पटताच तिवारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नागपूर शहरात दंगलीची घटना घडली होती. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले होते त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरातील दंगलीचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा निश्चय व्यक्त केला. नागपूर दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून केली जाईल. विशेषतः त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकून त्याची भरपाई केली जाईल, असे ते म्हणाले. या दंगलीसंबंधी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांना दंगलखोरांसोबत सहआरोपी करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी आज नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा आढावा मी नागपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्या…
मुंबई : वृत्तसंस्था महायुती व महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दंगल होते, प्रशांत कोरटकर नागपूरचा आहे. नागपूरलाच दंगल का झाली हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. फडणवीसांचे सरकार हे मनोरुग्णांचे सरकार आहे, त्यांच्यावर सामूहिक उपचार करण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, नागपूरचा प्रशांत कोरटकर हा त्यांचाच माणूस आहे. तो पळून गेला का नाही हे तेच सांगू शकतात. आपण म्हणायचो तो पळून गेला आणि तो भाजपच्या कार्यालयात असायचा किंवा…

