भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ रेल्वे विभागाकडून माहिती समोर आली असून गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या मुंबई एलटीटी (११०८०) एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एस ८ कोचमध्ये एक नकली तिकीट तपासनीस प्रफुल गजबीये याला रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले. भोपाळ विभागाचे डीवाय सीटीआय मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि २३ रविवार रोजी नियमित तपासणी दरम्यान, एस ८ कोचमध्ये एक प्रफुल गजबीये व्यक्ती तिकीट तपासणी करत असल्याचे आढळले. त्यास अधिकृत ओळखपत्र विचारले असता त्याच्याकडे रेल्वेच्या कोणत्याही अधिकृत कागदपत्रांचा अभाव होता. यावेळी प्रवाशांनी सतर्कता दाखवत खंडवा ते नेपानगर दरम्यानच हा…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी घरातील सदस्य गाढ झोपलेले असताना कपिल सुरेश सपकाळे (वय ३२, रा.नशिराबाद, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार दि. २३ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नशिराबाद येथे कपिल सपकाळे हा तरुण वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना मध्यरात्री कपिल सपकाळे यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घअना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर कुटुंबियांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ममुराबाद येथील घराला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत घरातल संपुर्ण साहित्य जळून खाक झाल्याने दोघ भावंडांच्या संसाराची राखरांगोळी झाली. तसेच शहरातील भवानी पेठेत डीपीला आग लागल्याची घटना देखील घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील पांडुरंग कुंभार व प्रकाश कुंभार या दोन भावांचे कुंभारवाडा भागात एकत्र घर आहे. सोमवारी ते कामावर गेलेले असताना शॉर्ट सर्कीटमुळे त्यांच्या घरात आग लागली. आग वाढत जाऊन घरातील टीव्ही, पंखा, धान्य, कागदपत्रे, कपडे व संपुर्ण साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे ७० हजारांपेक्षा जास्त नुकसान झाले असून दोघंही भावांचा संसार उघड्यावर आला आहे. डोळ्यासमोर संपुर्ण…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही राजकारण आणि धार्मिक कार्यात चांगला वेळ घालवाल. प्रभावशाली लोकांशी तुमचे लाभकारी संबंध निर्माण होऊ शकतात. तरुणांना त्यांच्या कठोर परिश्रमाचा योग्य लाभ मिळेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासापासून लक्ष विचलित करून मजा करण्यात वेळ वाया घालवू नये. व्यवसायात विपणन संबंधित कामावर अधिक लक्ष द्या. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे यश घरात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सकारात्मक ऊर्जा अनुभवता येईल. तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होईल. तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार योग्य परिणाम मिळतील. मुलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही वेळ काढा. आज व्यवसाय थोडे मंद होऊ शकतात. कुटुंबातील वातावरण…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुन्हेगारीच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतांना आता भाजप नेता योगेश रोहिलाने आपल्याच मुलांची हत्या केली. योगेश रोहिलाने आधी पत्नीवर गोळ्या झाडल्या त्यानंतर एक-एक करुन त्याने तीन मुलांवर गोळीबार केला. पत्नी नेहा, मुलगा देवांशस शिवांश आणि मुलगी श्रद्धा यांच्यावर गोळ्या चालवल्या. या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. पत्नीवर चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमध्ये सांगठेडा गावात ही धक्कादायक घटना घडली. योगेश रोहिलाला त्याच्या पत्नीवर संशय होता. पोलीस चौकशीत योगेश रोहिलाने सांगितलं की, त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याला माहिती मिळालेली की, पत्नी नेहाच बाहेर कुठल्यातरी युवकासोबत अफेयर सुरु आहे. अनेकदा यावरुन दोघांमध्ये…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील बजरंग बोगद्याजवळ गणपती मंदिर परिसरात जुन्या वादातून एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. तसेच लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २२ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता घडली. या प्रकरणी २३ मार्च रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहित हेमंत गुजर (वय १८, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) हा तरुण शनिवारी रात्री गणपती मंदिराजवळून जात असताना, संशयित आरोपी गणेश गोपाळ मराठे (रा. मयूर कॉलनी, जळगाव) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी त्याचा रस्ता अडवला. जुन्या वादातून गणेशने मोहितवर चाकूने हल्ला करून पाठीला गंभीर दुखापत केली. त्यानंतर…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपूर येथे औरंगजेबाची कबर हटवण्यावरून हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. नागपूर महानगरपालिकेने त्यांना स्वतःहून बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला होता, जो आज पूर्ण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील यशोधरा नगर येथील संजय बाग कॉलनीमध्ये असलेले हे घर फहीम खान यांच्या आईच्या नावावर आहे. इमारत आराखडा मंजुरी तील अनियमिततेबाबत महापालिकेने नोटीस बजावली होती. खरं तर, औरंगजेबाची कबर हटवण्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात मास्टरमाइंड फहीमसह ६ आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीमवर ५०० हून अधिक दंगलखोरांना जमवण्याचा आणि हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे. सध्या फहीम पोलिस कोठडीत आहे. यापूर्वी २१ मार्च रोजी फहीम…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती सरकारवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, “मूळ विषय बाजूला राहिले आणि लोकांना बाकीच्याच विषयांमध्ये भरकटून टाकले जात आहे. संपूर्ण विधानसभेतच खोक्याभाई भरले आहेत. एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात? मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत. त्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन,” असेही ते म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना टोला लगावला. “तुम्ही एका खोक्याभाईचे काय घेऊन बसला आहात सर्व विधानसभा खोक्याभाईंची आहे,” अशा शब्दांत राज यांनी महायुतीला टोला लगावला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंनी आमदारांबाबत खोक्याभाई शब्द वापरून केलेल्या टीकेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय, असा प्रश्न पत्रकारांकडून…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींसोबत एका ३५ वर्षीय तरुणाने अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना रविवारी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजता घडली याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ वर्षीय आणि ९ वर्षीय या दोन अल्पवयीन मुली आपल्या परिवारासह जळगाव शहरातील एका परिसरात वास्तव्याला आहे. दरम्यान संशयित आरोपी मनोज भीमराव धनगर (वय- २५ रा. जळगाव ) याने या दोन्ही मुलींसोबत अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार रविवारी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडला आहे. ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शनीपेठ पोलिस ठाण्याततक्रार…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार “लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही, असे कधीही बोललेले नाही. मात्र, सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती परवानगी देत नाही. परिस्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की देऊ,” असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथील सभेत केला. राज्याच्या १३ कोटी जनतेचा हिशोब सांभाळावा लागतो, असेही त्यांनी नमूद केले. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर, ही रक्कम कधी मिळणार, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अजित पवार म्हणाले, “शासनाच्या…

