Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार “लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही, असे कधीही बोललेले नाही. मात्र, सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती परवानगी देत नाही. परिस्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की देऊ,” असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथील सभेत केला. राज्याच्या १३ कोटी जनतेचा हिशोब सांभाळावा लागतो, असेही त्यांनी नमूद केले. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर, ही रक्कम कधी मिळणार, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अजित पवार म्हणाले, “शासनाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कानसवाडा-शेळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (वय ३८, रा. कानसवाडा) यांच्या खूनप्रकरणी भरत भास्कर पाटील या तिसऱ्या संशयितास नशिराबाद पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा दि. २१ मार्च रोजी सकाळी खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार असलेल्या भरत पाटील याला नशिराबाद पोलिस ठाण्याचे सपोनि ए.सी. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ शरद भालेराव, शिवदास चौधरी, पोकों सागर बिडे यांनी ताब्यात घेतले.

Read More

भुसावळ  : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला अंगावर अॅसीड फेकण्याची आणि पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत पैशांची मागणी करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, ३५ वर्षीय महिला आपल्या पती आणि मुलांसह एका भागात वास्तव्याला आहे. सरकारी नोकरी करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. १ मार्च ते १५ मार्च या कालावधीत संशयित आरोपी अब्दुल रहीम शेख (वय २७) रा. स्टेट कॉलनी, भुसावळ याने महिलेला संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली असून तरुण व अल्पवयीन मुलीला पुण्यातून ताब्यात घेतले. याप्रकरणी तरुणाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात पोस्को कायद्यान्वये वाढीव कलम लावण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अजय सुभाष भिल (वय १९, रा. निपाणे, ता. पाचोरा) याने सप्टेंबर २०२४ मध्ये पळवून नेले होते. त्यांचा शोध घेत असताना पाचोरा पोलिसांनी दि. २२ मार्च रोजी त्यांना पुणे जिल्ह्यातील केडगाव येथून ताब्यात घेतले. लग्नाचे अमिष दाखवून या अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचे तिने…

Read More

मेष राशी आजच्या दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल. अशी काही घटना घडू शकते. यामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. राजकारणात वर्चस्व वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित काही बातम्या मिळतील. वृषभ राशी आज कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होईल. प्रेमप्रकरणात गोडवा राहील. अविवाहितांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचे सहकार्य आणि सहकार्य मिळेल. मिथुन राशी आज, कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांशी अनावश्यक वादविवाद टाळा. अन्यथा यामुळे तुमच्यासाठी मोठी अडचण देखील होऊ शकते. व्यवसायात एखादी मोठी घटना घडू शकते ज्यामुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्काल बसेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सावध राहा. अन्यथा, तुम्हाला त्रास होऊ शकतो. कर्क राशी आज तुमची…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील मोंढाळा रोडवर झालेल्या अपघातात २६ वर्षीय बांधकाम कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. तर हा अपघात नसुन घातपात झाल्याचा संशय मयताचा भाऊ याने व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील बहिरम नगर येथील रहिवासी हर्षल बाबुलाल तडवी (वय – २६ वर्ष) या तरुणाचा मोंढाळे रोडवर २२ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता मोटरसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हर्षल तडवी हा सायंकाळी मित्रास घरी सोडुन आपल्या घराकडे परतत असताना हर्षल यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळुन आला. हर्षल यांचे डोक्यास गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून खुनाच्या घटना घडत असतांना आता वरणगावनजीक असलेल्या विल्हाळा शिवारात दारूच्या नशेत पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना रविवार (२३ मार्च) रोजी भल्या पहाटे समोर आली असून आरोपी पती अजीज सलीम शेख (वय ३३) हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विल्हाळा शिवारातील गट क्र. ६५१ मध्ये किशोर पाटील (रा. सुसरी) यांच्या मालकीच्या विटभट्टीवर परळी वैजनाथ (जि. बीड) येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर हे कुटुंबासह कामासाठी आले होते. त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज सलीम शेखही चार मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते. सर्व कुटुंब एकाच परिसरातील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई महापालिकापूर्वीच सर्वच पक्षातील नेत्यांनी वातावरण तापविण्यास सुरुवात केली असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच मनसेच्या मुंबई अध्यक्ष पदाची घोषणा केली. संदीप देशपांडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखा अध्यक्षांची जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी पक्षाची केंद्रीय समितीही जाहीर केली. राज ठाकरे यांनी संघटनेत पहिल्यांदाच एवढे मोठे बदल केले आहेत. केंद्रीय समितीची जबाबदारी नितिन सरदेसाई यांच्याकडे सोपवली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत नवीन पदांची रचना केली आहे. मनसेचे नते बाळा नांदगावकर यांच्याकडे केंद्रीय गट अध्यक्षांची जबाबदारी दिली आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ शनिवार दि. २२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उड्डाणपुलावरुन जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रकचालकाने ट्रकवरिल नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरुन रिव्र्व्हस येणाऱ्या ट्रकने उड्डाणपुलाशेजारी उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना चिरडले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यात उपचार घेत असलेले सुरेश रूपचंद जैस्वाल (वय ५५) यांचा दुर्देवी मृत्यू झाल आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुरत रेल्वेगेटजवळ असलेल्या मालधक्क्यावरुन सिमेंट लोड करुन (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजी नगरच्या उड्डाणपुलावरुन जात होता. उड्डाणपुलावरील काही अंतर कापल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश घेणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत असतांना आता मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील आणि अजित पवारांच्या बंद दाराआडच्या चर्चेवरून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. भविष्यात जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित आहे, असे संजय शिरसाट म्हणाले. जयंत पाटील आणि अजित पवार…

Read More