चाळीसगाव : प्रतिनिधी शांताबाई या फेसबुक अकाउंटवर बदनामी केली व ३० हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी शांताबाई अकाउंटधारकासह दोघे व अन्य साथीदारांविरोधात १४ मे रोजी चाळीसगाव शहर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शेख अजीज शेख बशीर खाटीक यांच्या फिर्यादीवरून १४ मे रोजी शांताबाई अकाउंटधारक रणजितकुमार सुदेश दरोडे व मुराद पटेल (दोघे रा. चाळीसगाव) व इम्रान शेख (रा. मेहुणबारे) यांच्या व इतर साथीदारांविरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘शांताबाई’ या नावाने फेसबुक अकाउंटवर समाजातील प्रतिष्ठित लोकांची बदनामी व त्यांच्यावर चिखलफेक केली जात होती. हिंगोणे येथील माध्यमिक शिक्षक शेख अजिज शेख…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी तुकारामवाडी परिसरात खुनाच्या रागातून गुंडांच्या एका टोळक्याने हैदोस घातल्याची घटना गुरुवारी पहाटे २:३० वाजेच्या घडली. तुकारामवाडी व सम्राट कॉलनीतील तीन घरांवर सशस्त्र हल्ला चढवला. लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर करत मालमत्तेचे नुकसान केले. घरात घुसून महिलांना अश्लील शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात जणांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही जणांना ताब्यात घेतले आहे. शारदा ठाकूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा आकाश व टिनू गोसावी यांच्यात चार ते पाच वर्षापासून सुरेश ओतारी यांच्या खुनाच्या रागातून वाद सुरू आहे. याच रागातून टिनू गोसावी आणि त्याच्या साथीदारांनी पहाटे त्यांच्या घरावर हल्ला केला.…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील काझी प्लॉट भागातील रहिवासी इकबाल पिंजारी व फरीद पिंजारी यांच्या घरातील लग्न कार्य असल्याने वन्हाड हे गुरुवारी बुलढाण्याकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या घरात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील टीव्ही फ्रीज, इलेक्ट्रिक समान आणि इतर साहित्य जळून सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे कि, पिंजारी यांच्या परिवारातील रजार या तरुणाचे लग्नकार्य असल्यामुळे सकाळी आठ वाजता वन्हाड बुलढाण्याकडे निघाले. यानंतर काही वेळातच त्यांच्या घरामध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीचा धूर पसरल्याने सभोवतालच्या नागरिकांनी त्वरित मदत कार्य केले. ही माहिती शेजारी राहणाऱ्या नाजीम याने पिंजारी यांना दिली. दरम्यान, पापा मेंबर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घरात…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज वेळ अनुकूल आहे. आपल्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन केल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता . रागावर नियंत्रण ठेवा. उत्पन्नाचे स्रोत वाढतील तसाच खर्चही वाढेल. वैयक्तिक गोष्टींमध्ये बाहेरच्यांचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. मार्केटिंगकडे अधिक लक्ष द्या. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, जवळच्या नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. जोखमीच्या गोष्टींमध्ये रस असेल तर यश मिळेल. अहंकार व आत्मविश्वासावर ताबा ठेवा. आपली ऊर्जा सकारात्मक मार्गाने वापरा. व्यवसायात थोडासा मंदीचा काळ येऊ शकतो. पती-पत्नीचे संबंध अधिक घनिष्ठ होतील. सांधेदुखीची जुनी…
मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन नाच केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एका लग्नाच्या वरातीत घडली असून, आमदार खरात हातात तलवार घेऊन नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ खरात यांच्यासह अनिल गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी लग्नाच्या मिरवणुकीत हातात तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी डान्स केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बाब उघडकीस आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात हे एका लग्नाच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीसाठी लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली होती तर विरोधकांकडून बहिणींना २१०० रुपये मिळावे याची मागणी करीत असतांना आता लाडकी बहीण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावला असून तब्बल अडीच हजारांहून अधिक बनावट खाती आढळली आहेत. याप्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरातमधील असून तो सध्या फरार आहे. दरम्यान, याप्रकरणानंतर राज्याचा महिला विकास विभाग खडबडून जागा झाला आहे. दीड कोटी केसरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना सोडून एक कोटी लाभार्थी लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा हवेत विरून गेली.…
अमळनेर : प्रतिनिधी भुसावळ कडून नंदुरबार कडे जाणारी रेल्वे मार्गावरील मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना १५ रोजी प्रताप महाविद्यालयाजवळ दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून रेल्वे चे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत. डब्बे खाली पडल्याने आजूबाजूचे ट्रॅक देखील खराब झाल्याने सुरत भुसावळ मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रवासी रेल्वेच्या प्रवाश्यांचे हाल होणार आहेत. स्टेशन पासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने तात्काळ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि दुरुस्ती कामाला सुरुवात केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नेमका अपघात कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक नागरिक आज देखील सरकारचे रेशन घेवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असून यात आता बोगस रेशनकार्ड धारकांना मोठा दणका बसला आहे. राज्यातील १८ लाख रेशन कार्ड रद्द झाले. राज्यात सध्या रेशनकार्ड ई-केवायसी मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमुळे सरकारच्या अन्नधान्यावर डल्ला मरणाऱ्यांना चपराक बसली आहे. भरगोस पगार, सरकारी नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, श्रीमंतांची नावे या मोहिमेमुळे रद्दबातल होत आहे. तर बांग्लादेशी नागरिकांचे पण धाबे दणाणले आहे. तसेचआधार कार्ड सहाय्याने ई-केवायसी मोहिम राबवण्यात येत आहे. त्यात अनेक बोगस रेशनकार्डधारक समोर आले आहेत. त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहे. आता या मोहिमेत अजून मोठ्या…
बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतना आता दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाले. तर 4 जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१४) दुपारी अंबाजोगाई – आडस रोडवरील उमराई पाटी नजीक घडली. मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून (एम एच 05 सी व्ही 9186) या कारमधून अंबाजोगाईकडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक कुटुंब जात होते. आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटील नजीक असलेल्या दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आला. या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार जागीच पलटी झाली. यात शौकत अहमद शेख (वय ४६)…
चाळीसगाव : प्रतिनिधी ‘शांताबाई’ या नावाने बनावट अकाउंट तयार करून चाळीसगावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने बदनामी करणाऱ्या ‘शांताबाई’ फेम रणजीतकुमार दराडे तरुणाला अखेर नाशिक येथील पथकाने नुकतेच ताब्यात घेतले आहे. त्याला रसद पुरविणारे आता पोलिसांच्या रडारवर आहेत. गेल्या एक-दीड वर्षापासून फेसबुक या सोशल मीडियावर ‘शांताबाई’ या नावाने अकाउंटद्वारे दररोज एक-दोन व्यक्तींवर चिखलफेक करून बदनामी केली जात होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांनी नाशिक येथील सायबर क्राइम ब्रँच यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने तपासाअंती पोलिसांनी दराडे याला ताब्यात घेतले. त्याला माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ पुरविणारे आणि त्यावर प्रतिक्रिया देणारे कोण? याबाबत पोलिसांकडून चौकशी होत आहे. या…

