नवी मुंबई : वृत्तसंस्था नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच नवी मुंबईतून आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. स्वतःला इस्रोचा शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या २१ वर्षीय आदर्श म्हात्रेला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे ऑनलाइन माध्यमांतून महिलांना लक्ष्य करून होणाऱ्या फसवणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श म्हात्रे हा केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला आहे. मात्र, त्याने अत्यंत चलाखीने मॅट्रिमोनी वेबसाइट्सवर तब्बल १२ बनावट प्रोफाइल तयार केले होते. वेगवेगळ्या नावांनी ओळख निर्माण करत तो उच्चशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना लक्ष्य करत असे. स्वतःचे व्यक्तिमत्त्व प्रभावी दाखवण्यासाठी महागडे कपडे,…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी घराला कुलूप लावून ड्युटीवर गेलेल्या तृषा चंद्रकांत संन्याशी (वय ३९, रा. कोल्हे हिल्स परिसर) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख २० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २८ मार्च रोजी भरदिवसा कोल्हे हिल्स परिसरात घडली. दरम्यान, चोरटे कडीकोयंडा तोडत असताना त्यांना दरवाजाच्या बाजूलाच चावी ठेवलेली दिसली व त्यांनी कुलूप उघडून ही चोरी केली. तृषा संन्याशी या रुस्तमजी स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्या घराला कुलूप लावून शाळेत गेल्या. त्यानंतर १० ते दुपार दुपारी एक वाजेदरम्यान चोरटे शिक्षिका राहत असलेल्या शकुंतला हाईट्स या अपार्टमेंटमध्ये शिरले.…
जळगाव : प्रतिनिधी भरधाव डंपरने धडक देत चिरडल्याने बशीरशा मकबूलशा शाह फकीर (७५, रा. वराड, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. हा अपघात २८ मार्च रोजी रात्री वराड, ता. जळगाव येथे झाला. अपघात होताच नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. एमआयडीसी पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. या प्रकरणी चालक नितीन वसंत मिस्तरी (रा. दापोरे, ता. एरंडोल) व मालक भूषण सुधाकर चव्हाण (रा. धानोरा, ता. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली असून दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, वराड येथील बशीरशा फकीर हे कामानिमित्त गावातील बसस्थानकाकडे गेले होते. त्यावेळी एक डंपर (क्र. एमएच ४७, एएस ५१४८) गावातून जात असताना जोरदार धडक…
फैजपूर : प्रतिनिधी येथील पोलिस ठाण्यातच पोलिसांशी धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ११:३० वाजता घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण प्रमोद भिरूड (वय २६) व धीरज विजय सोनवणे (वय २५, दोघे रा. फैजपूर) हे गुटखा खात पोलिस ठाण्यातील अंमलदाराच्या कक्षात गेले. तेथे त्यांनी गुटखा थुंकल्याने पोलिसांनी त्यांना विचारणा केली. यावेळी दोघांनी वाद घालत एका पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून धक्काबुक्की केली व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यामुळे थोडावेळ तणाव झाला होता. या प्रकरणी हवालदार रुपेश पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसउपनिरीक्षक…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जुन्या कोंडवाडा परिसरात किरकोळ वादातून गॅरेज चालकावर मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सहा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज शेख याकूब (वय ३६, रा. जाम मोहल्ला) हे खडका चौफुलीजवळ ‘सिकंदर कार’ नावाचे गॅरेज चालवतात. २७मार्च रोजी कुटुंबीयांच्या कार्यक्रमानिमित्त ते मुस्लिम कॉलनी येथे गेले असताना रात्री सुमारास गाणे लावण्याच्या कारणावरून काही युवकांमध्ये वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी फिरोज शेख घटनास्थळी गेले. त्यानंतर रात्री १०.४५ वाजता चिराग हॉलजवळील मैदानावर चर्चा करण्यासाठी गेले असता, तेथे उपस्थित काही जणांनी एकत्र येत त्यांच्यावर शिवीगाळ करत चापटा व बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच जीवे मारण्याची…
आजचे राशिभविष्य दि.३० मार्च २०२६ मेष राशी आज तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नियोजित कामे स्वतःहून वेळेवर पूर्ण करा नाहीतर नंतर घाई गडबडीत काम बिघडेल. आज कामाबद्ल तुम्हाला काही नवीन आणि उत्कृष्ट सूचना मिळतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि मनमिळाऊ स्वभावामुळे तुमचे सहकारी तुमचे काम करून घेतील. तुमच्या निस्वार्थ मेहनतीला आज फळ मिळेल. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना आज नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. वृषभ राशी आज विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. महाविद्यालयातील तुमच्या चांगल्या कामगिरीमुळे तुमचे शिक्षक खूश होतील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा खूपच चांगले राहील. जर तुम्ही लाकडी फर्निचर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ते…
मुंबई : वृत्तसंस्था इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन टंचाईचे सावट गडद होत असताना, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा प्रश्नही तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. सरकारकडून वारंवार “कोणतीही टंचाई नाही” असा दावा केला जात असला, तरी राज्यातीलच एका मंत्र्याने गॅस सिलिंडरची मागणी केल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून गॅस सिलिंडर्सची मागणी केली आहे. या पत्रामुळे राज्यात प्रत्यक्षात गॅस टंचाई असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लोढा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, जैन धर्मातील ‘ओली आयंबील’ हा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडामोडींना वेग आला असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वावरून नवीन वाद निर्माण होताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचे पुढील सूत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हाती जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप करत, “पक्षावर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर इंदापूर येथे पार पडलेल्या पक्षाच्या कार्यक्रमातील बॅनरमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे 27 मार्च रोजी नवनिर्वाचित जिल्हा…
नाशिक : वृत्तसंस्था भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी तयार केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावले आहे. या समन्सनंतर रुपाली चाकणकर यांच्यावर चौकशी होईल, आणि त्यानंतर अटकेची टांगती तलवार उभी राहण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातशी असणाऱ्या कथित संबंधांमुळे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि नंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून राजीनामा दिला होता. या प्रकरणात शिवसेना उपनेते सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोलिसांशी भेट घेऊन रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. टीव्ही 9च्या वृत्तानुसार,…
मुख्यमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव जळगाव, दिनांक 28 मार्च (जिमाका)-: महाराष्ट्र् राज्याचे प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या हेतुने मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातंर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आज मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्या मार्फत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे सात सर्वसमावेशक निकषांवर…

