जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेसमोर झोकून देत वासुदेव विठ्ठल बारी (वय ४४, रा. शिरसोली प्र.न., ता. जळगाव) या मेडीकल व्यावसायीकाने आत्महत्या केली. ही घटना दि. २९ मार्च रोजी रात्री जळगाव ते भादली दरम्यान आसोदा रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली येथे राहणारे वासुदेव बारी यांचे जळगाव व शिरसोली येथे मेडीकल आहे. दि. २९ रोजी घरातून बाहेर गेले होते. त्यानंतर जळगाव ते भादली रेल्वे मार्गावर अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२२/१८नजीक त्यांनी भुसावळ-सुरत रेल्वे समोर स्वतःला झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. या विषयी रेल्वेचालक चंदन पवार यांनी जळगाव स्थानक प्रमुखांना याविषयी कळविले.…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी खासगी कामानिमित्त एरंडोलकडे जाताना धरणगावातील तरुणाच्या कारला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात कार उलटून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३० मार्चला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास बोरगावनजीक घडली.अविनाश संजय चौधरी (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव असून, ते धरणगावच्या माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा चौधरी तसेच येथील श्री इलेक्ट्रॉनिकचे संचालक तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय वामन चौधरी यांचे चिरंजीव होते. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश चौधरी हे रुग्णवाहिका चालक होते. सोमवारी दुपारी ते आपल्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच-४६, एक्स- २६३६) ने वैयक्तिक कामासाठी बोरगाव मार्गे एरंडोलकडे जात होते. बोरगावजवळून जात असताना समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला…
आजचे राशिभविष्य दि.३१ मार्च २०२६ मेष राशी आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल थोडी चिंता वाटू शकते, पण हुशारीने वागल्यास यश मिळेल. आज तुम्ही कामात दिरंगाई करणे टाळावे. आपले काम वेळेवर पूर्ण करणे चांगले राहील. तुम्ही एका कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहाल. तुमचा आत्मविश्वास टिकून राहील. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. वृषभ राशी आज, बदलत्या हवामानामुळे तुमच्या आरोग्यात थोडी बिघाड होऊ शकते. नियमित योगाभ्यासामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. या राशीत जन्मलेल्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. शक्य असल्यास, आज कर्ज घेणे टाळा. कुटुंबातील सदस्यांशी क्षुल्लक बाबींवरून वाद घालणे टाळा. कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळण्याची अपेक्षा…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यात एलपीजी सिलिंडर आणि इंधन तुटवड्याच्या अफवा वेगाने पसरत असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. राज्यात कोणत्याही प्रकारचा गॅस किंवा इंधन तुटवडा नसून भारत सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठेबाजी टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले. भुजबळ यांनी सांगितले की, काही शहरांमध्ये पीएनजी सुविधा उपलब्ध असूनही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ज्या भागात पीएनजी लाईन पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत अर्ज न केल्यास एलपीजी सिलिंडर सेवा बंद केली जाऊ शकते.…
चोपडा : प्रतिनिधी शहरात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्कर्ष दिलीप पाटील (वय १६, रा. बोरोले नगर, चोपडा) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्च रोजी प्रताप हायस्कूलजवळ उत्कर्षचा गंभीर अपघात झाला होता. अपघातानंतर त्याला तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात येत होते. मात्र, रस्त्यातच त्याच्या शरीरातील हालचाल बंद झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. यानंतर त्याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ड्युटीवरील वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात एलपीजी सिलिंडर टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी सरकारमध्येच मतभेद उघड होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मंत्रिमंडळातील मंत्री एकमेकांना पत्र लिहित असल्याची बाब गंभीर असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गॅस सिलिंडर्ससंदर्भात पत्र लिहून सामान्यांचा प्रश्न ऐरणीवर आणल्याबद्दल सुळे यांनी त्यांचे आभार मानले. मात्र, “आता मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी,” अशी मागणी त्यांनी केली. एलपीजीसारख्या महत्त्वाच्या विषयावर सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे त्यांनी सूचित केले. जागतिक पातळीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुळे म्हणाल्या की, देशावर संकट आले तर विरोधक म्हणून आम्ही सरकारसोबत ठामपणे उभे राहू.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राजकारणात “राजकीय भूकंप” आणि “ऑपरेशन टायगर/तुतारी” या विधानांमुळे निर्माण झालेल्या खळबळीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कडाडून टीका केली आहे. नुकत्याच नांदेड दौऱ्यावर असताना ज्योती वाघमारे यांनी “राज्यात योग्य वेळी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी होणार” असे सूचक विधान केले होते. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिंदे यांनी उपरोधिक शब्दांत म्हटले की, “ज्योती वाघमारे यांना प्रथमच राज्यसभेवर संधी मिळाली आहे. त्या जनतेच्या…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील मानपुर येथील जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात तसेच राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन २००२ मध्ये मानपुर शिवारातील महार वतनाची गट क्रमांक १२२ ही जमीन खरेदी करण्यात आली होती. साखर कारखाना उभारण्याच्या उद्देशाने ही जमीन घेतल्याचे सांगण्यात आले होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीनमालक चमेलीबाई तुकाराम तायडे यांच्या वारसांना योग्य मोबदला देण्याचे तसेच साखर कारखान्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे…
नवी मुंबई : वृत्तसंस्था नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच नवी मुंबईतून आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. स्वतःला इस्रोचा शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या २१ वर्षीय आदर्श म्हात्रेला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे ऑनलाइन माध्यमांतून महिलांना लक्ष्य करून होणाऱ्या फसवणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श म्हात्रे हा केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला आहे. मात्र, त्याने अत्यंत चलाखीने मॅट्रिमोनी वेबसाइट्सवर तब्बल १२ बनावट प्रोफाइल तयार केले होते. वेगवेगळ्या नावांनी ओळख निर्माण करत तो उच्चशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना लक्ष्य करत असे. स्वतःचे व्यक्तिमत्त्व प्रभावी दाखवण्यासाठी महागडे कपडे,…
जळगाव : प्रतिनिधी घराला कुलूप लावून ड्युटीवर गेलेल्या तृषा चंद्रकांत संन्याशी (वय ३९, रा. कोल्हे हिल्स परिसर) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख २० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २८ मार्च रोजी भरदिवसा कोल्हे हिल्स परिसरात घडली. दरम्यान, चोरटे कडीकोयंडा तोडत असताना त्यांना दरवाजाच्या बाजूलाच चावी ठेवलेली दिसली व त्यांनी कुलूप उघडून ही चोरी केली. तृषा संन्याशी या रुस्तमजी स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्या घराला कुलूप लावून शाळेत गेल्या. त्यानंतर १० ते दुपार दुपारी एक वाजेदरम्यान चोरटे शिक्षिका राहत असलेल्या शकुंतला हाईट्स या अपार्टमेंटमध्ये शिरले.…

