मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून एकदा कोरोनाच्या आजाराने डोकेवर काढले आहे आता देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आज सक्रिय रुग्णांची संख्या 1252 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 430 रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 383 रुग्ण आहेत. यापैकी 316 पेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. राज्यात देखील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी एका दिवसात कोरोनाचे 86 सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 383 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील ठाण्यात एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 21…
Author: editor desk
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथील मयुरी पेट्रोल पंपासमोरून सायकलव्दारे २२ वर्षीय तरुण घरी जात असताना त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्य मार्गावर किनगावातील मयुरी पेट्रोल पंपावर गणेश भास्कर धनगर (वय २२) हा तरुण सायकल घेऊन घरी जात होता. दरम्यान, त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गणेश धनगर हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय…
चोपडा : प्रतिनिधी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार जणांच्या टोळीस अटक करण्यात आली. त्यांच्याजवळील मिरची पूड व इतर साहित्य असा सव्वा तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. अंकलेश्वर-ब-हाणपूर महामार्गावर हातेड बुद्रूक (ता. चोपडा) गावानजीक मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू चक्कर चव्हाण (२५), यशवंत निराधार पवार (४२), धर्मा चिमन भोसले (४०) आणि भरत निराधार पवार (३८ सर्व रा. जामदे, ता. साक्री, जि. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. मंगळवारी रात्री १२:३५ वा.चे सुमारास हातेड बुद्रूक (ता. चोपडा) गावानजीक एका पेट्रोलपंपाजवळ चोपडा ते गलंगी रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दोन दुचाकीवर चार जण फिरत होते.…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील घाट रोडवरील गोकुळधामच्या पाठीमागे असलेल्या शुभश्री पार्कमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरफोड्या करून सुमारे १ लाख ५० हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. चोरीची ही घटना २६ रोजी रात्री ११ ते २७ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. दीपक राजेंद्र साळकर (शुभश्री पार्क, चाळीसगाव) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो व त्याची आई आणि बहीण असे २६ रोजी रात्री ११ वाजता जेवण करून पुढच्या हॉलमध्ये झोपले. पहाटे ६ वाजेच्या सुमारास दीपक यांची आई उठली असता घराचा बेडरूमचा दरवाजा उघडत नव्हता. हा दरवाजा आतील बाजूने कोणीतरी लॉक केल्याचे लक्षात आले. याचवेळी साळकर यांना घराच्या बाहेर लोकांचा आवाज…
जळगाव : प्रतिनिधी कंपनीत पंखा लावत असताना विजेचा धक्का लागून अनिल बारेला (मूळ रा. मध्यप्रदेश) या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (२८ मे) औद्योगिक वसाहत परिसरातील एका चटई कंपनीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरामधील एका चटई कंपनीत अनिल बारेला हा कामाला होता. बुधवारी सकाळी कंपनीत पंखा लावत असताना त्याला विजेचा धक्का लागला. ही घटना आजूबाजूला काम करणाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : प्रतिनिधी पोलिस असल्याची बतावणी करीत दुचाकीस्वारांनी संजय भगीरथ सोमाणी (वय ५९, रा. सोमाणी गल्ली, पिंप्राळा) यांच्याजवळील सोन्याची चेन व अंगठी लांबविली. ही घटना दि. २७ मे रोजी बजरंग बोगद्याजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली. जिल्हापेठ पोलिसात दोन अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय सोमाणी हे दुचाकीने घरी जात असताना पोलिसांचा गणवेश घातलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना थांबविले. त्यानंतर सोमाणी यांनी त्यांना वाहन परवाना दाखविला. त्यातील एकाने पंजाब व उत्तर प्रदेश येथून काही लोक आले आहेत, तुमच्या हातातील अंगठी व सोन्याची चेन काढून ठेवा, असे सांगत दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले. चेन व अंगठी रुमालात गुंडाळल्यानंतर सोमाणी यांनी तो रुमाल खिशात ठेवून निघून…
फैजपूर : प्रतिनिधी आमोदा ते पिंपरूळ फाटा दरम्यान बुधवारी सकाळी तीन वाहनांचा अपघात होऊन त्यात एका वाहनातील केळी वाहतूक करणारे जवळपास १५ मजूर जखमी झाले. ही घटना सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आमोदा गावाजवळील या महिन्यातील अपघाताची ही तिसरी घटना आहे. शनिवारी रात्री याच रस्त्यावर इंदोरकडे जाणारी ट्रॅव्हल उलटली होती. त्यातही ५० प्रवासी होते, तर पंधरा दिवसांपूर्वी दोन रिक्षांच्या अपघातात विद्यार्थिनी ठार झाली होती. मोर नदीच्या पुढे मिनी ट्रक व दोन ट्रक यांच्यात अपघात झाला. त्यामुळे दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. मोर नदीच्या पुलाजवळ असलेल्या वळणावर भुसावळकडून येणारा मालवाहू ट्रक हा…
मेष राशी व्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला नवीन मित्र मिळतील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील. वृषभ राशी आज तुम्हाला व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्हाला भरपूर संपत्ती मिळेल. जमा भांडवलात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी हा काळ सामान्यतः चांगला राहील. अनावश्यक खर्च टाळा. मिथुन राशी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात, तुमच्या जोडीदाराकडून सकारात्मक पाठिंबा वाढेल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. कुटुंबात एका नवीन सदस्याचे आगमन होईल. कर्क राशी आज कानाशी संबंधित समस्या होण्याची शक्यता कमी आहे. पोटाशी संबंधित समस्या हलक्यात घेऊ नका. ताबडतोब…
जळगाव मिरर | २८ मे २०२५ जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि निर्णायक ठरू शकणारा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जळगाव औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांना डी ± दर्जा (सवलतींचा झोन) देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे संपूर्ण जिल्हाच डी ± झोनमध्ये समाविष्ट झाला असून, स्थानिक उद्योजकांसाठी हा निर्णय क्रांतिकारक ठरणार आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, आ.सुरेश भोळे ( राजूमामा भोळे ),आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे,आ.किशोर आप्पा पाटील,…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आज दि.२८ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील धानोरा रस्त्यावर वाळूचे ट्रॅक्टर पटली झाल्याने १९ वर्षीय तरूण चालकाचा दबून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असून यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या अपघातात विश्वनाथ आधार भील वय १९ रा.शिरसोली ता.जळगाव या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात विश्वनाथ भील हा तरूण आपल्या आई, वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. मोहाडी गावातील एका वाळूच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून नोकरीला होता. बुधवारी २८ मे…

