मुंबई : वृत्तसंस्था क्रिकेटप्रेमीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिकेचे संघ या वर्षी भारत दौ-यावर येणार आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौ-यांच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ऑक्टोबरमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांच्या मालिका खेळवल्या जातील. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, पण सुधारित वेळापत्रकानुसार, हा सामना आता नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मुंबईहून लखनऊकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधून तब्बल आठ ते बारा प्रवासी पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. सोमवार (९ जून) सकाळी घडली आहे. सहा जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयांना जाणाऱ्या प्रवाशांनी लोकलमध्ये प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत काही प्रवासी दरवाजावर उभे होते. गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे संतुलन बिघडून तब्बल आठ ते बारा प्रवासी खाली पडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार यातील सहा जणांचा…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान 15 जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते 45 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान 40 अंशापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान 40 अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे. 14 जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही.…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील निपाणे येथील आनंदनगर तांडा येथील शेतकरी श्रीराम सखाराम राठोड (२६) याने रविवारी पहाटे ५ वाजता घरात दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सविस्तर वृत्त असे कि, श्रीराम राठोड यांना एक नऊ महिन्यांची मुलगी आहे. मागील वर्षी शेतात कपाशी पिकाची लागवड केली, परंतु निसर्गाने साथ दिली नाही. उत्पन्न जेमतेम आले, पण कपाशीला भाव नाही. बाहेरून लोकांचे उसनवारीचे पैसे कसे द्यावे, याने नेहमी विचार करत असे. वृद्ध आई आणि पत्नी श्रीराम राठोड यांना धीर देत होते, परंतु ते नेहमी चिंतेत राहत असे. श्रीराम सखाराम राठोड यांनी दि. ८ रोजी सकाळी घराला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही…
जळगाव : प्रतिनिधी महापालिकेच्या कचरा संकलनाच्या वाहनामध्ये प्राण्यांचे संशयास्पद अवशेष आढळून आल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बाब हिंदुत्ववादी संघटनांना समजताच पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले होते व यामुळे तालुका पोलिस ठाणे परिसरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री या प्रकरणी अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रविवारी सकाळी महापालिकेचे कचरा संकलित करणारे वाहन (एमएच १९, एम ९३८९) मास्टर कॉलनीत कचरा संकलित करीत असताना त्यात प्राण्यांचे आक्षेपार्ह अवशेष टाकण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास हे वाहन कचरा डेपो येथे कचरा खाली करीत असताना त्या ठिकाणी दुसरे वाहनदेखील (एमएच १९, एम ९३८५)…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गायत्री नगर परिसरातील ज्योती संदीप मेकलकर (वय ४५) हे नातेवाइकांकडे असलेल्या लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या असतांना त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख नऊ हजार रुपयांसह दागिने, चांदीचे पूजा साहित्य व लॅपटॉप चोरून नेला. ही घटना ३१ मे ते ६ जून दरम्यान गायत्री नगरात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गायत्रीनगरातील ज्योती मेकलकर यांच्या नातेवाइकांकडे लग्न असल्याने त्या लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून रोख नऊ हजार रुपये, सहा हजार रुपये किमतीची सोन्याची बाळी, नथ, १० हजार रुपये…
जळगाव : प्रतिनिधी गांजा सेवन करणाऱ्या अमन मुस्ताक पटेल (२०, रा. शिवाजीनगर हुडको) याच्यावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. आर. एल. चौफुलीजवळ दि. ६ जून रोजी गांजा सेवन करताना आढळला होता. याप्रकरणी पोकॉ. नितीन ठाकूर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमन पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत. दरम्यान, गांजा सेवन करणाऱ्यांवर जिल्हाभरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. गांजा सेवन करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होत आहे. गेल्या महिनाभरापासून जळगाव शहरातदेखील गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे.
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका २१ वर्षीय तरुणीची तिघांनी छेडछाड करीत मारहाण आणि लूटमार केल्याची गंभीर घटना ७ जून रोजी संध्याकाळी घडली. या तरुणीच्या घरी शोलू (पूर्ण नाव माहीत नाही), आसिफ बेग ऊर्फ बाबा काल्या आणि सादिक इबाबत हे आले. तिघांनी शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. शोलू याने तिचे केस ओढले, तर बाबा काल्या याने मारहाण केली. सादिक इबाबत याने चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी तिच्या खिशातील चार ते पाच हजार रुपये काढून नेल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. ही घटना घडत असताना मरियम नाजिर, हिसा नौशिर आणि फातेमा हिसा यांनी पीडितेलाआरोपींच्या तावडीतून सोडविले. बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा…
मेष – श्रीगणेश सांगतात की, ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल आहे. तुम्हाला सामाजिक कार्यांमध्ये रस वाटेल आणि त्याचवेळी तुमचे ध्येय गाठणे हेसुद्धा तुमचं प्राधान्य असेल, आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. कोणताही वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. तणाव घेणे कार्यक्षमता कमी करू शकते. मुलांसोबत थोडा वेळ घालवणे अत्यावश्यक आहे. व्यवसायात कामे योग्य पद्धतीने पूर्ण होतील. भागीदारीसाठी अनुकूल काळ आहे. नोकरीत असलेल्या लोकांना बदलाबाबत काही चांगली बातमी मिळू शकते. वृषभ – महत्त्वाच्या लोकांसोबत भेट लाभदायक ठरेल. घर व व्यवसाय या दोन्ही ठिकाणी योग्य समन्वय राहील. मालमत्तेसंदर्भातील रखडलेला प्रश्न सुटेल. काही संभ्रम निर्माण होऊ शकतात, मात्र तणाव न घेता शांतपणे समस्या सोडवा. धोकादायक कृती टाळा. वाहन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता राजधानी दिल्लीतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये मृतहेद आढळला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर, चिमुकलीवर बलात्कार झाल्याची देखील शक्यता याठिकाणी वर्तवण्यात येत आहे. पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्तर पुर्व दिल्लीच्या दयालपूर भागात डी ब्लॉकमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली घरातून चुलतीला बर्फ देण्यासाठी निघाली होती. पण फार उशीर…

