Author: editor desk

मेष : दिवस आनंददायी आणि अद्भुत राहील. घरात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. काही जुने प्रलंबित काम पूर्ण झाल्यामुळे तुमचे मन आनंदी असेल. प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. वृषभ : तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमची निवड काही खास कामासाठी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. अधिकारी तुमच्यावर खूश असतील. तुमच्यासाठी काही चांगली बातमी घेऊन येणार आहे. मिथुन : तुम्ही निरुपयोगी कामांमध्ये अडकाल, ज्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा वाया जाईल. कोणत्याही गोष्टीवर रागावणे तुमच्यासाठी चांगले ठरणार नाही. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी चांगले राहील. व्यवसायात भागीदारीचा विचार करूनच कोणतेही काम करा. कर्क…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतांना आता भुसावळ शहरात झालेल्या चोरीच्या घटनेची पोलिसांनी उकल केली आहे. भुसावळ येथील गायत्री नगरमधून १५ लाखांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी मोठा मुद्देमाल शिरपूर येथे एका खाजगी गोदामात लपवला होता. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ तालुका पोलिसांच्या मदतीने हा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. किंमत १८ लाख ८० हजार रुपये असून, यात फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी आणि एलईडी टीव्ही असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, दि. १५ जून रोजी मध्यरात्री नंदलाल मिलकीराम मकडीया यांच्या गायत्री नगर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचा काय भलं करणार आहेत? असा सवाल संजय राऊतांनी विचारला. त्यावर आता शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. संजय शिरसाट यांनी नुकताच एका माध्यम समूहाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांसह शिवसेना ठाकरे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहे. या नवीन योजनेबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. यामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मिळून पतसंस्था सुरु केली जाणार आहे. याबाबत बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या ८ मार्च २०१९ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी वार्ड प्रभाग ठिकाणी पतसंस्था स्थापन केली जाणार आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई येथे ही पतसंस्था स्थापन केली…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात मान्सूनचा जोर वाढू लागला असून, हवामान विभागाने पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये धोका पातळीचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, अशी सूचना देण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. मुंबईसह कोकणात पावसामुळे जलभराव, वाहतुकीत अडथळे आणि दरड कोसळण्याचा धोका असल्याने सतर्कता बाळगावी लागणार आहे. पुणे जिल्ह्यातही घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या इतर भागांचा विचार केल्यास कोल्हापूर, सातारा, नाशिक आणि मराठवाड्यातही अधूनमधून…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाण्यातील बंगल्यात बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे बंगल्याच्या किचनला आग लागली आणि किचनमधील सर्व साहित्य जळून खाक झालं. सुदैवाने, स्फोटाच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेने बंगल्याचं मोठं नुकसान झालं असून परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात, हा स्फोट किचनमधील फ्रिजच्या कॉम्प्रेसरमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. स्फोट इतका तीव्र होता की, किचनमधील साहित्य सर्वत्र विखुरलं गेलं, तर आगीमुळे भिंती काळ्या पडल्या. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर लागलेली आग वेगाने पसरली, पण सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मॉर्निंग वॉक करीत दुचाकीने असताना धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले सतीश एकनाथ सुलक्षणे (५६, रा. नागेश्वर कॉलनी) यांचा उपचार सुरू असताना बुधवारी (१८ जून) मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, डीटीपी ऑपरेटर असलेले सतीश सुलक्षणे हे सोमवारी (१६ जून) रोजी सकाळी ७ वाजता फिरण्यासाठी गेले होते. मायादेवी मंदिराजवळ एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. ते गौरांग सुलक्षणे यांचे वडील होत.

Read More

रावेर : प्रतिनिधी सीमेलगतच्या बहादरपूर येथील विटांचे व्यापारी आनंदा अशोक प्रजापती (वय ४७) यांचा १८ रोजी तालुक्यातील अजनाड शिवारातील एका विहिरीत गंभीर दुखापत झालेला मृतदेह आढळला. यामुळे खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, अशोक प्रजापती (रा. बहादरपूर, ता.जि.बऱ्हाणपूर) यांनी त्यांच्या पुतण्यास नागुरखेडा ता. बऱ्हाणपूर येथील एकाने पैसे घेण्यासाठी बोलावले असल्याचे सांगून ते १८ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घरून गेले. काही वेळातच ११:५५ वाजता त्यांनी त्यांचा पुतण्या रघुनाथ प्रजापती यांना भ्रमणध्वनीवरून कॉल करून सांगितले की, ‘हे मला इथे मारतायं तू लवकर ये…. पूर्ण बोलण्याच्या आतच फोन कट झाला. त्या पार्श्वभूमीवर रघुनाथ प्रजापती, मयताचा मुलगा आणि नातेवाईक मोटारसायकल घेऊन मदतीसाठी…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील आठवडे बाजार परिसरातील डिस्को टॉवर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या गायत्री नगरमधील गोडावूनमधून चोरट्यांनी ३५ लाख रुपयांचा इलेक्ट्रॉनिक सामान लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.. सविस्तर वृत्त असे कि, नंदलाल मिलकीराम मकडीया (वय ६२) हे श्रीहरीनगर, सिंधी कॉलनी, येथील रहिवासी असून, आठवडे बाजारात त्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, हे गोडावून गायत्री नगरमधील रेणुका माता मंदिराजवळ आहे. १५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता, एका ग्राहकाला कुलर दिल्यानंतर मकडीया है गोडावून बंद करून घरी परतले; परंतु १६ जून रोजी सकाळी ८:४० वा. शेजारील व्यापारी जितेंद्र पाचपांडे यांनी फोन करून गोडावूनचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती त्यांना दिली. मकडीया…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नांदेड येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी ठिबक सिंचन पद्धतीने लावणी केलेल्या चक्री पिकाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्याने वैतागून उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे. नांदेड, ता. धरणगाव परिसरात येथे बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. नांदेड येथील संजय बाबुराव पाटील यांची धावडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून शेती आहे. यात पाच बिघे क्षेत्रात ठिबक सिंचनाद्वारे उन्हाळ्यात चक्री या पिकाची लागवड केली होती. सद्यस्थितीत पीक परिपक्व झालेले असताना या पिकाला योग्य भाव नसल्याने कुणीही व्यापारी माल घेण्यासाठी यायला तयार नव्हते. याला वैतागून चक्रीच्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे. पीक लावणीपासून ते परिपक्व झालेल्या पिकाच्या मशागतीवर आजपावेतो सुमारे पन्नास ते साठ हजाराच्या…

Read More