Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रेशन दुकानातील ई पॉज मशीन सर्वर डाऊन मुळे बंद असून यामुळे रेशनवरील धान्याचा पुरवठा गेल्या पंधरा दिवसापासून बंद झाला आहेत. शिधापत्रिका धारकांचे अन्नधान्य हे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध असतांना मात्र ई-पॉज मशीन अभावी लाभार्थ्यांनाही वंचित राहावे लागत असून त्यामुळे रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांमध्ये खटके उडत आहेत. त्यामुळे इ पाँज मशिन तांत्रिक बिगाड़ तातडीने दुरुस्त करून धान्य पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर शिधापत्रिका लाभार्थ्यासह जोरदार निदर्शने करण्यात आली त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सुनिल सुर्यवंशी सो. यांना निवेदन देऊन खालील…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील १८२ गावात जाऊन जनतेसोबत संवाद साधण्यासाठी सुरू केलेली राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या पाचव्या दिवशी बोदवड तालुक्यातील शेवगे, चिखली बु, हरणखेड, चिचखेड प्र ग ,वडजी येथे पोहचली. प्रत्येक गावात ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरासह फटाक्यांच्या आतिषबाजीने जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी रोहिणीताई खडसे यांनी ग्रामस्थां सोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या.काही समस्या तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यां सोबत दूरध्वनी वरून चर्चा केली प्रलंबित प्रश्न नाथाभाऊ, भैय्या साहेब ,व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वसित केले. यात्रेत जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,व्हिजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया,बोदवड राष्ट्रवादी…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी औरंगाबाद हायकोर्टाकडून किनोदच्या लोकनियुक्त महिला सरपंच प्रियांका सूर्यवंशी ह्यांच्या विरोधातील अविश्वास प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. २०१७ साली तालुक्यातील किनोद गावाच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून प्रियंका सूर्यवंशी ह्या निवडून आल्या होत्या. गावातील अंतर्गत कलह तसेच नाराज ग्रामपंचायत सदस्य यांनी दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव पारित केला होता. एकूण ८ सदस्यांपैकी ६ सदस्यांनी अविश्वास ठरावास संमती दर्शवली होती. सदर अविश्वास ठरावास मान्यता देण्यासाठी दिनांक २९ ऑक्टोंबर २०२१ रोजी विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी मतदान करून आपला मतदानाचं हक्क बजावला होता. अविश्वास ठराव मान्यतेच्या दिवशी एकूण ६४५ मतदान झाले होते त्यात…

Read More

पुणे : वृत्तसंस्था शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मविआ सरकारनं बीएमसीसाठी 236 वॉर्ड केले होते. शिंदे-फडणवीसांनी संख्या कमी करुन 227 वॉर्ड केले होते. शिंदे-फडणवीसांच्या निर्णयाला शिवसेनेनं आव्हान दिलं होतं. शिंदे सरकारने मविआ सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा २०१७ च्या म्हणजेच ४ च्या प्रभागानुसार निर्णय घेतला होता. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. चारच्या प्रभागाबाबत राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी तीन सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली होती. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यावर शिंदे-…

Read More

पुणे : वृत्तसंस्था व्यवसायात भरभराट व्हावी, घरात सुख शांती नांदण्यासोबत पुत्रप्राप्ती व्हावी, यासाठी पत्नीला सगळ्यांसमोर अंघोळ करण्यास पतीनेच भाग पाडल्याची संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. एका बिझनेसमनने व्यवसायात भरभराट व्हावी, घरात सुख शांती नांदावी, यासाठी मांत्रिकाची मदत घेतली. इतकंच काय तर पुत्रप्राप्तीसाठीही त्याने मांत्रिकाची मदत घेत त्याला अघोरी पूजा करण्यास सांगितलं होतं. मांत्रिकांच ऐकून या बिझनेसमनने आपल्या पत्नीलाही पुजेत सामील करुन घेतलं.संतापजनक बाब म्हणजे यावेळी पूजेच्या नावाने या पतीने सर्वांच्या देखत आपल्या पत्नीला अंघोळ करण्यास भाग पाडलं. या संतापजनक प्रकाराची पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर अखेर भारती पोलिसांनी आरोपी…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी  भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाच्या तापी नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारुण आयुध निर्माणी वसहात मध्ये राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. आयुध निर्माणी वसाहतीतील रहिवाशी अतूल सतिष वाणी ( ३२ ) रा क्वॉ न १७६ ए ( मोडीफाईड ) हे आपल्या परिवारा सोबत राहत असून बहीण प्रिया सतिष वाणी ( ३२ ) ही यांच्या सोबत राहत होती. दि २१ रविवार रोजी सकळी नऊ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना घरातून निघुन हतनूर गावा जवळील तापी नदीच्या पुलावर जाऊन पाण्यात उडी घेतली. येथे उपस्थीत असलेल्या नागरिकाच्या लक्षात आल्याने महिलेस वाचविण्यासाठी प्रयत्न करीत तीला पाण्या बाहेर काढले. मात्र…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा फैसला लांबणीवर गेला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत, पाच आठवडे स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तसेच, या संदर्भात सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत केलं जाणार आहे. महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू व्हावं, अशी सरकारने मागणी केली आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकनाची याचिका दाखल करण्यात आली आहे. या सुनावणी दरम्यान, सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत केलं जाणार आहे. तसेच, पाच आठवडे सुनावणी ‘जैसे थे’च ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे 92 नगरपरिषदांच्या निवडणुका…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चितोडा येथील 38 वर्षीय युवकाची चाकूने गळा चिरून तसेच चाकूचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या घडली. मनोज संतोष भंगाळे (रा.चितोडा, ता.यावल) असे मयत युवकाचे नाव आहे. चितोडा गावातील रहिवासी असलेल्या मनोज भंगाळे या युवकाचा मृतदेह चितोडा-डोंगरकठोरा रस्त्यावरील चंदूशेठ चौधरी यांच्या शेतात असल्याची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आली. मारेकर्‍यांनी अतिशय क्रूर पध्दतीत मनोज भंगाळे यांना संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने ओढून रस्त्याला लागून असणार्‍या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे. यावल पोलिसांना याबाबतची माहिती कळवण्यात आल्यानंतर यावलचे पोलिस राकेश मानगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, गणेश ढाकणे, रोहिल गणेश, संदीप सूर्यवंशी,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी खानदेशमधून मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपयाची वसुली केल्या जात असल्याची धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसेंना केला आहे. आ.खडसेंनी या ठिकाणी तात्काळ भेट देऊन अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. तसेच या चेक नाक्यावरील प्रकाराबाबत विधान परिषदेत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र मध्य प्रदेश आरटीओ चेक पोस्ट नाक्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. चेक पोस्ट हा आरटीओ कर्मचाऱ्यांसाठी दोन नंबरच्या कमाईचे साधन आहे. वाहनचालकांकडून या ठिकाणी वसुली केली जाते. मध्यप्रदेश महाराष्ट्र आरटीओ चेकपोस्ट तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारी वाहनं असतात. अशावेळी त्यांच्याकड एकादा कागदपत्र कमी असला, तर त्यांच्याकडून वसुली केली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट मेसेज पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे, त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट मेसेजना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडत आहे. नुकताच जळगाव जिल्ह्यात बनावट मेसेज पाठवून ऑनलाईन लुबाडल्याचा प्रकार घडला आहे. यासोबतच महावितरणकडूनदेखील बनावट मेसेज प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार…

Read More