मुंबई : वृत्तसंस्था विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावर विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे. तत्वाची लढाई तत्वाने लढावी. असं एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही. निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हाव, असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. चार दिवस वादळी ठरले. पाचवा दिवस वादळी ठरणार अशी अपेक्षा होती.…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर पहिल्यादाच पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोंधळाचं वातावरण चांगलेच तापलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करत आहे. त्याचवेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे त्यांच्या समर्थक आमदारांसह आले. ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार आमने सामने आले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. डरपोक आहोत काय? असं भरत यांनी म्हटलं आहे. शिंदे गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या नादी लागू नका असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. हा…
जळगाव : प्रतिनिधी शहरात सुभाष चौक परिसरात रामनाथ मुलचंद कोगटा या दुकानात वन विभागाने सोमवारी रात्री टाकलेल्या छाप्यात घुबडाची नखे, समुद्रघोड्यासह आठ प्रकारच्या वन प्राण्यांची विक्रीसाठी ठेवलेली सुमारे ३४७ प्रकारचे अवशेष जप्त करण्यात आले आहे. या घटनेत वन विभागाने डॉ. अजय लक्ष्मीनारायण कोगटा, चुनीलाल नंदलाल पवार, आणि लक्ष्मीकांत रामपाल मनीयार अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शिकार केलेल्या वन्यप्राण्यांचे अवशेष तस्करीसह विक्री केली जात असल्याची माहिती मिळल्याने वन विभागाने टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झाला आहे. या छाप्यात हताजोडी 11 नग, राजमांजर रंगनी 11, सियारसिंगी 260, कासवपाठ एक, इंद्रजाल 38, नाग मणके 21, घुबडींची नखे 3,…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील चुंचाळे शिवारात एका ५० वर्षीय शेतकरीने शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पाचोरा पोलीस स्थानकात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील बाळदबु येथील शिवारात चुंचाळे येथील रहिवासी वाल्मिक वामन पाटील(वय ५०) यांनी रतन बळीराम पाटील यांच्या शेतात २२ रोजी रात्री ९ ते ११ वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली होती. पाचोरा पोलिसात दिलेल्या मयताची पत्नी सपना पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत शेतकऱ्याच्या शेतावर यातील रतन बळीराम पाटील, योगेश रतन पाटील यांनी घेतलेल्या ट्रक्टरचा कर्जाचा बोजा बसवलेला असल्याने…
चोपडा : प्रतिनिधी शहरात बहिणीकडे रहायला आलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देवून पळवून नेवून वेगवेगळ्या ठिकाणी ३ वेळा शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पिडीत मुलीला तिच्या मूळगावी आणल्यानंतर तिने चोपडा पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा रा.कालीकुंडी ता. वरला जि. बडवाणी ( मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिडीत मुलगी मध्य प्रदेशातून दि. ८ जुलै २०२२ रोजी तिच्या बहीणीकडे चोपडा येथील राहत्या घरी राहावयास आली. त्यादरम्यान पीडितेची बहीनीने, “गावामध्ये तु सचिनच्या नावाने बदनाम झाली” असे सांगितल्याने, दोघींमध्ये भांडण झाले. त्यामुळे पीडित तरुणीने आरोपी सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा रा.कालीकुंडी ता. वरला जि.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेनंतर एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश उत्तम पाटील (वय २८, रा. आव्हाने) असे मयताचे नाव आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात चार दिवसातील हा तिसरा खून आहे. हा खून इतका भयंकर होता की तरुणाला तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने तो जागीच ठार झाला होता. याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की,शहरातील एसएमआयटी महाविद्यालायाजवळ मुख्य रस्त्यावर रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास भावेश पाटील याच्या भावाने जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली आहे की, निवृत्ती नगरातील बंधन बँकेच्या समोर रात्री १२ ते…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांचे बिझनेस पार्टनर सुजीत पाटकर यांच्याविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुजीत पाटकर आणि अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीनं बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीनं कोविड सेंटरचं कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. पुरेशी क्षमता नसल्यानं अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेनंतर एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश उत्तम पाटील (वय २८, रा. आव्हानी) असे मयताचे नाव आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात चार दिवसातील हा तिसरा खून आहे. भावेश उत्तम पाटील (वय-२८, रा.आव्हाणे, हल्ली मुक्काम निवृत्तीनगर) असे मयताचे नाव आहे. रात्री १ वाजेच्या सुमारास एसएमआयटी महाविद्यालयासमोरील १०० फुटी रस्त्यावर हा खून करण्यात आला. चाकूने सपासप वार केल्याने तरुण रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. खून करणारे संशयीत वाळूमाफिया असून वाळू व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची कळते. मात्र, अद्याप खून कोणी केला व त्यामागील नेमकं कारण स्पष्ट…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सत्ता बदल झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून शस्त्रक्रिया झाल्याने घरीच विश्रांती घेत होते. दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर राज ठाकरेंनी आज पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी माझी तुलना गद्दारांशी करू नका असं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. त्याचसोबत बाळासाहेब ठाकरेंची एक आठवणही सांगितली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्यांना घेऊन बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडांचा उल्लेख करताना राज ठाकरेंचं नावही वारंवार उल्लेखलं जात होतं. त्यावरुन राज ठाकरेंनी तेव्हाच ठणकावून सांगितलं होतं की माझी तुलना गद्दारांशी करू नका. त्याच संदर्भातली एक आठवण राज ठाकरेंनी शेअर केली आहे. आजवर…
जळगाव : प्रतिनिधी नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा लोकशाहीला बळकटी देणारा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने प्रस्थापितांच्या घराणेशाही प्रवृत्तीला चपराक लगावली आहे. सामान्य जनतेमधून नेतृत्व पुढे आल्यास ठरावीक घराण्यांची राजकारणातील मक्तेदारी संपुष्टात येईल या भीतीमुळेच विरोधकांनी या निर्णयास विरोध सुरू केला असला, तरी हा निर्णय घेऊन जनतेच्या भावनांचा सरकारने आदर केला आहे, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष आ सुरेश भोळे व महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात यावी अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती. महाराष्ट्र सरपंच परिषदेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. जनतेचीही तीच मागणी असताना…

