मुंबई : वृत्तसंस्था तुम्ही कमी उत्तपन होते त्यावेळेस तुम्ही रेशन कार्ड बनविले असेल व आता तुमचे उत्पन वाढले असेल तरीही तुम्ही रेशन कार्ड बंद केले नसेल तर आता येत्या 1 सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे. कौटुंबिक परिस्थिती सुधारूनसुद्धा अनेकजण जुन्या रेशनकार्डचा वापर करत वर्षानुवर्षे स्वस्त किमतीमध्ये धान्य घेतात. धक्कादायक बाब म्हणजे अनेकजण स्वस्तातील रेशनधान्य घेऊन ते खासगी व्यक्तींना विकतात त्यामुळे जे गरजू आहेत त्यांना या धान्य मिळत नाही. अशा पद्धताने धान्य विकून ते सरकारची फसवणूक करत आहेत. माणसांना अन्न मिळत नाही काहीजण रेशनधान्य जनावरांना खाद्य म्हणू वापरल्याचंही उघड झालं आहे. तरूसुद्धा हे लोक रेशन धान्यावरील हक्क सोडण्यासाठी तयार नाहीत. फौजदारी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातून कारागिराची दुचाकी चोरी झाल्याची घटना १९ रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात दुचाकी चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील प्लॉट न ०३ येथून हिरो कंपनीची स्पेल्डर प्लस काळ्या रंगाची ३० हजार किंमतीची RJ.०५.LS ६९२२ या नंबरची केशवकुमार भरतसिंग (वय २४) यांची मालकीची दुचाकी लांबविल्याची घटना दि १९ रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकणी फिर्यादी केशवकुमार भरतसिंग यांनी दि २० रोजी सकाळी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास तपासी अमलदार प्रफुल्ल धांडे हे करीत…
जळगाव : प्रतिनिधी आम्ही शिवसेना वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केलेत मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आदित्य ठाकरे यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. हे सरकार कोसळणारच असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. हे सरकार शिवसेना व भाजप युतीचं सरकार आहे. याकडे त्यांनी त्याच दृष्टीने बघावं, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. शिंदे गटात जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र त्यावेळी त्यांनी त्याची दखल घेतली असती…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा दूध संघाला बदनाम करून संचालक मंडळाला अडचणीत आणण्यासाठी हेतपुरस्कर प्रयत्न केला जात आहे. जिल्हा बँकेत काही सापडले नाही; म्हणून दूध संघात हेतपुरस्कार अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिंदे सरकारच्या माध्यमातून तसेच प्रशासन मंडळाच्या सहाय्याने जिल्हा दूध संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. जिल्हा दूध संघाच्या कारभारात अध्यक्षा मंदाकिनी खडसे व त्यांचे संचालक मंडळाने गैरव्यवहार केल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचाऱ्याने शासनाकडे केली होती. त्या तक्रारीवरुन शिंदे सरकारकडून चौकशी समिती देखील नियुक्त केली. दरम्यान चौकशीत दहा कोटी रुपयांचा निधी शासनाची कुठलीही परवानगी न घेता संचालक मंडळांनी परस्पर खर्च केल्याचा धक्कादायक…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या कथित मद्यधोरण घोटाळ्यासंबंधात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य १४ लोकांविरोधात लुकआउट नोटिस जारी केली आहे. सीबीआयने गुन्हा नोंदवलेल्याच १५ लोकांची नावे या लुकआउट नोटिशीमध्ये आहेत. मनीष सिसोदिया यांच्या घरी शुक्रवारी सीबीआयने छापे टाकले होते. त्यानंतर केजरीवाल सरकारने केंद्र सरकारविरोधात टीका केली होती. तसंच, मनीष सिसोदिया यांनीही येत्या दोन-चार दिवसांत मला अटक केली जाईल, असं म्हटलं होतं. मनीष सिसोदिया यांनी शक्यता वर्तवल्यानंतर २४ तासांतच सीबीआयने सिसोदिया यांच्यासह १४ लोकांविरोधात लुकआऊट नोटिस जारी केली आहे. सीबीआयची ही लुकआउट नोटिस सिसोदियांसह केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कारण, आता सिसोदियांसह हे १४ जणांना…
जळगाव : प्रतिनिधी राम टोटल बॉडी चेकअप सेंटरचे संचालक डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” या कामजीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीत “सेक्सोलॉजी” विषयावरील राष्ट्रीय परिषदेत एका हॉटेलमध्ये झाले. या पुस्तकामुळे कामजीवनातील अनेक समज, गैरसमज दूर होण्यास मदत होईल. हे पुस्तक डॉक्टर, विद्यार्थांना अभ्यासाच्या दृष्टीने मार्गदर्शक व सर्वसामान्यांसाठी देखील मोलाचे ठरेल,असा सूर मान्यवरांच्या मनोगतातून उमटला. या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेक्सोलॉजिस्ट चेन्नईचे डॉ.नारायण रेड्डी, मुंबईतील नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.राज ब्रम्ह्नभट , हैद्राबादचे डॉ.व्यंकट रामण्णा, नागपूर येथील डॉ.संजय देशपांडे, कोल्हापूर येथील डॉ.राजसिंह सावंत आदींच्या मुख्य उपस्थितीत झाले. या परिषदेत स्त्री – पुरुषांमध्ये असमधनाता, नसांची कमजोरी, शीघ्रपतन, समलिंगी आकर्षण, लिंगरोपण, हर्निया, हायड्रोसील, इंद्रियाची…
वाशीम : वृत्तसंस्था वाशीममध्ये माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात होऊन अपघातग्रस्त कार २०० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना २० रोजी शनिवारी सायंकाळी घडली. मृत तिन्ही प्रवासी वाशीम जिल्ह्यातील आहेत. जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. सविस्तर वृत्त असे की, वाशीम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटनासाठी गेले होते. परतीच्या वाटेवर असताना माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात झाला. २०० फूट खोल दरीत कार कोसळली. यामध्ये गाडीचा चुराडा झाला. या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला हे सर्व मृतक वाशीम जिल्ह्यातील…
सांगली : वृत्तसंस्था घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य सन्मान राखता. मग, गणपतीचा किती राखायला हवा? चित्रपटाची गाणी लावणे, त्यावर बीभत्स नृत्य करणं हे प्रकार बंद व्हायला हवेत, असं मत कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी व्यक्त केलंय. सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं प्रथमच कावड यात्रा काढण्यात आली. कालीचरण महाराजांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडली. कालीचरण महाराज म्हणाले, गणेशोत्सव जवळ आला असून आपण गणपतीचे कशापद्धतीनं पूजन करतो, त्याला कसा निरोप देतो याचा विचार करायला हवा. घरी आलेल्या पाहुण्याला आपण सन्मानानं निरोप देतो. पण, गणपतीला अनेकदा तेवढा सन्मान का मिळत नाही? त्याच्यासमोर चित्रपटाची गाणी लावली जातात. विसर्जन मिरवणुकीत तशीच गाणी व नृत्य सादर केलं जातात.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रीय जनता दलाच्या सहकार्यानं स्थापन झालेलं नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकार सतत वादात सापडत आहे. विरोधी पक्षांच्या राजकीय भाषणबाजीनंतर, हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलंय. सरकार स्थापन होऊन आठवडाही उलटला नाही, तोच सरकार बरखास्त करण्याची मागणी जोर धरू लागलीय. यासाठी पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. असंवैधानिक मार्गानं स्थापन झालेलं हे सरकार बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी फिर्यादीनं न्यायालयाकडं केलीय. याचिकाकर्त्यानं 2017 मध्ये आरजेडी सोडल्यानंतर आणि भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आरजेडी आणि तेजस्वी यादव सरकारला जनादेश चोरण्यास सांगत होते, याची आठवण करून दिलीय. याच आधारावर नितीशकुमार यांचं सध्याचं सरकार घटनाबाह्य आहे. त्यामुळं कलम १६३ आणि…
नाशिक : वृत्तसंस्था गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना संसर्ग आजाराचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता कुठे दिलासा मिळत असताना स्वाइन फ्लूच्या आजाराने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा शहरामध्ये ९४ च्या वर पोचला असून, ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, असे असले तरी स्वाइन फ्लूमुळे शहरातील मृतांची संख्या अवघी तीन असून, उर्वरित मृत ग्रामीण भागातील आहे. जून महिन्यापासून स्वाइन फ्लूचे रुग्ण सातत्याने आढळत आहे. जून महिन्यात दोन जुलै महिन्यात २८ तर ऑगस्ट महिन्यात ६४ रुग्ण आढळून आले आहे. स्वाइन फ्लूमुळे उपनगर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. राजूनगर येथील एका ६५ वर्षी व्यक्ती व राणेनगर मधील आणखी एका महिलेचा असे तीन…

