जळगाव : प्रतिनिधी शहरातील फुले मार्केट परिसरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी १९ ऑगस्ट रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कुसुंबा येथे १२ वीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ ऑगस्ट गुरूवार रोजी नातेवाईकांसह अल्पवयीन मुलगी जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात कामानिमित आले होते. दरम्यान अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याचे प्रकार उघडकीला आला. तिच्या नातेवाईकांनी संपूर्ण फुले मार्केट परिसर पिंजून काढला. शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी येथील धरणी चौकातील एका सोनाराला बनावट सोनं गहाण ठेवण्याच्या नावाखाली चक्क सहा लाखात गंडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात अधिक असे की, शहरातील धरणी भागात कौस्तुभ सराफ (रा. पंचमुखी हनुमान मंदिर जळगाव) यांचे रुद्र ज्वेलर्स नावाने दुकान आहे. श्री.सराफ यांच्याकडे धर्मेंद्र यादव आणि एक अनोळखी व्यक्ती मागील काही दिवसांपूर्वी एक दोन वेळेस सोने तारण ठेवून पैसे घेऊन गेले होते. व्यवहार बरा असल्यामुळे श्री.सराफ यांनी धर्मेंद्र यादवकडून १९ ऑगस्ट रोजी १८ तोळे सोने तपासून ६ लाख ९ हजार ५०० रुपयांमध्ये तारण ठेवले. परंतु श्री. सराफ यांनी जळगाव येथे गेल्यावर सोन्याचे दागिने तपासून बघितले असता, त्यावर फक्त…
परभणी : वृत्तसंस्था परिवारातील अथवा ओळखीच्या व्यक्तीकडून मुलींसोबत वाईट कृत्य केल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र, परभणीच्या पाथरी तालुक्यातील हादगाव इथे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरामध्ये झोपले असताना वडिलांनी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये आईने दिलेल्या तक्रारीवरुन वडिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हदगाव इथे एक तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात पलंगावर झोपली होती. यावेळी त्या ठिकाणी मुलीचे वडील आले. मुलींनी एकटी पाहून त्यांनी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग केला. याला मुलीने विरोध केल्यानंतर वडिलांनी घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने झालेला…
राजस्थान : वृत्तसंस्था राजस्थानच्या पाली जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून त्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. सुमेरपूर पोलीस स्टेशन परिसरात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यात्रेकरू ट्रॅक्टर ट्रॉलीतून जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. मात्र सुमेरपूरजवळ भाविकांवर काळाने झडप घातली. भरधाव वेगात आलेल्या ट्रॉलीने ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. खमींना शिवपूर आणि सुमेरपूर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात बळी पडलेले सर्व भाविक गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील रहिवासी…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील आज ‘शिव संवाद’ यात्रेच्या निमित्त शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंचे गावात लावलेले बॅनर फाडणाऱ्याविरुद्ध शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. गुलाबराव वाघ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वाजता युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा कार्यक्रम असल्याने सदर कार्यक्रमानिम्मीत्ताने शहरात ठिक ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे. सदर बँनवर माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे तसेच कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आले होते. धरणगाव-एरंडोल रोडावरील गणेश नगर स्टॉप येथे लावण्यात आलेले आमदार आदित्य ठाकरे यांचे शिवसंवाद…
धरणगाव : प्रतिनिधी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने आगमन होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. “शिव संवाद” यात्रा दौरा आज दि.२० ऑगस्ट, शनिवारी दुपारी १ वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवा सेना कडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर, व उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे स्वागत बॅनरवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार पाहायला मिळाला. जवळपास सहा ते सात ठिकाणी हे…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबईत 26/11 रोजी झालेला दहशतवादी हल्ला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी आपले जीव गमावले होते. त्या हल्ल्यात देशाच्या जवानासोबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. 26/11 सारखाच हल्ला पुन्हा करण्याची धमकी पाकिस्तानमधून देण्यात आली आहे. 26/11 सराखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मुंबई ट्राफिक पोलिसांना देण्यात आली आहे. ट्राफिक पोलिसांच्या कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ६ दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा केला गेला आहे. तसंच लवकरच मुंबईत २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी यात दिली गेली आहे. या मेसेजनंतर…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉजवर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकली होती. यावेळी लॉजवर तब्बल 13 जोडपी पोलिसांना आक्षेपार्ह अवस्थेत मिळून आली होती. यावेळी पोलिसांनी लॉज मालक दलालांनाही ताब्यात घेतले होते. याप्रकरणी रात्री उशिरा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन लॉजजवर अनैतिक प्रकार सुरु असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह पथकाने धाड टाकली. सागर हॉटेल व लॉज येथे 3 मुली व 3 मुले तर हेरंब पॅलसे या ठिकाणी 9 मुली व 9 मुलं मिळून आली. यात काही मुली वेगवेगळ्या महाविद्यालयात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन जळगाव या संस्थेमार्फत शनिवारी दि. २० ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता संस्थेतील मुख्य इमारतीत (ड्राॅईंग हॉल ४) मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व पालकांना डिप्लोमा प्रवेशासाठी कट ऑफ म्हणजे काय, ऑप्शन फॉर्म कसा भरावा, सर्व संस्थांची फी कोणत्या वेबसाईट वरून बघण्यात यावी. अश्या अनेक मुद्यावर या मार्गदर्शन आयोजित केले आहे. तसेच विद्यार्थी व पालकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थी व पालक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी लंघूशंकेसाठी रस्त्यावर थांबलेल्या दाम्पत्याला सात ते आठ जणांनी जंगलात नेत मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि रोकड असा एकूण ३७ हजार २०० रूपयांचा ऐवज जबरी लुटून नेला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत सहा जणांना अटक केलीय. पंकज रामसिंग राठोड (वय-२१, रा. जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर) हा तरूण आपल्या पत्नीसह मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील कालिंका माता मंदीराच्या पुढे जवळ बुधवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी थांबला. याचवेळी बहादू, तोरे, आणि प्रताप याच्यासह इतर ७/८ अनोळखी जणांनी दोन्ही पती-पत्नीला जंगलात नेवून बेदम मारहाण केली. यानंतर राठोड यांच्या पत्नीच्या…

