Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज दि १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचण्यात येत असून यावर तत्काळ कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवेदन सादर की, महाराष्ट्राचे नेते माजी महसुलमंत्री तथा विद्यमान विधान परीषद नेते आ. एकनाथराव खडसे हे गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात व समाजसेवेत काम करीत आहे. वेळोवेळी त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांने त्यांनी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री खु आणि चावलखेडा येथे अन्न सुरक्षा मोहिम अतंर्गत पिक प्रात्यक्षीक रब्बी ज्वारीचे (दादर) फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप कण्यात आले. यावेळी पिंप्री खु. चे सरपंच नानाभाऊ बडगुजर, उपसरपंच मंगल अण्णा पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच याप्रसंगी कृषी सहाय्यक पद्माकर पाटील यांनी शेतकरी बांधवांना बियाण्याविषयी माहिती देऊन तृणधान्य पिकाचा पेरा वाढावा असे आवाहन देखील केले.तसेच तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी सन 2023 हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होणार असल्याने संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना नगदी पिकांसोबत तृणधान्य पिकाचा पेरा वाढवण्यासाठी आवाहन केले आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था अंधेरी पोटनिवडणुकीतील ट्वीस्ट क्षणाक्षणाला वाढत असून भाजपने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर राज ठाकरे आणि शरद पवारांच्या भावनिक आवाहनानंतर भाजप आपला उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय.शिंदे गट व ठाकरे गट ज्या विधानसभेसाठी लढत आपले चिन्ह हि गोठविले होते, त्याच विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला आता विजय मिळविणे सोपे झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा आपल्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली असून त्यामध्ये उमेदवारीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरवेल की मागे घेणार याकडे लक्ष लागलेले आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था कोरोना काळात जीव धोक्यात घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या राज्यातील पोलिसांमध्ये पोलीस बोनस तसेच अॅडव्हान्स न दिल्यामुळे नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. राज्यात दिवाळी सन येत्या आठवड्यात येवून ठेपला असून आतापर्यत सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी सरकारच्या बोनसमुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलीस विभाग अपवाद आहे. प्रवासी आणि गणवेश भत्ताही मिळालेला नाही. मागच्या दिवाळीमध्ये केवळ सातशे पन्नास रुपयांची कुपन देऊन तोंडाला पाने पुसली होती. त्यामुळे यंदाची दिवाळी तर गोड होईल अशी आशा वाटत होती मात्र, दिवाळी तोंडावर येऊनही अ‍ॅडव्हान्स पगार नाही. कोरोनाकाळी पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली मात्र पोलिसांनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था इंदूर येथील राहत्या घरी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री वैशालीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अचानक समोर आलेल्या या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच तिची शेवटची सोशल मीडिया पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. https://www.instagram.com/reel/CjkKpocLMUu/?utm_source=ig_web_button_share_sheet मृत्यूच्या 5 दिवसांपूर्वी वैशाली टक्करने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा एक मजेदार व्हिडिओ होता. यामध्ये वैशाली म्हणताना दिसत आहे ‘बेबी, मी तुझ्यासाठी एक गाणं गाऊ?’ यानंतर ‘दिल, जिगर, नजर काय आहे मी तुझ्यासाठी जीवही देईल’ हे गाणे म्हणते. इन्स्टाग्रामवर वैशालीचा हा मजेदार व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात काही दिवसांपूर्वी मुलं चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून विविध जिल्ह्यात नागरिकांनी अनोळखी लोकांना मारहाण केली होती, त्यानंतर हे कृत्य थांबविण्यासाठी राज्यातील पोलीस प्रशासनाने आवाहन केले होते. सांगलीमध्ये साधूंना मारहाण झाल्याची घटना घडली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एका साधूला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका जणावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. मंदिरातील एका साधूवर एका इसमाने प्राणघातक हल्ला केला. संबंधित साधू आणि हल्लेखोर हे दोघेही एकाच परिसरात राहणारे आहे. दारूच्या नशेत या इसमाने साधूवर चाकूने हल्ला केला. दारुच्या नशेत ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले…

Read More

मुबई : वृत्तसंस्था हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पुणे आणि मुंबईतही अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. दरम्यान उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सूनने परतीचा प्रवास केला आहे. याचबरोबर राज्यातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. पुढील 2-3 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मध्य भारतातील उर्वरित भागांमधून मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती होण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य आणि लगतच्या नैऋत्य बाजूस बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे परिवलन आहे. तसेच…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासोबत राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि १४ रोजी घरी एकटीच असताना कुणीतरी अनोळखीने तिला फूस लावत घरातून पळवून नेल्याची घटना घडली आहे. घरातील सदस्य संध्याकाळी घरी आले असता मुलगी आढळून न आल्याने त्यांनी गावात व नातेवाइकाकडे शोध घेतला असता परंतु मिळून न आल्याने त्यांनी लागलीच मारवाड पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी विरोधात पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास मारवाड पोलीस स्थानकाचे सफौ.बाळकृष्ण शिंदे हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील महिलेचे व तिच्या पतीचे अश्लील फोटो स्टेटस ठेवल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसरातील ३५ वर्षीय महिलेचे व तिच्या पतीचे पारोळा तालुक्यातील एक महिलेने तिच्या दि १३ रोजी मोबाईलवरील व्हॉटसअप स्टेटस ठेवत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन होईल अशी भाषा वापरून कॉमेंट केल्यामुळे पीडित महिलेने संशयित आरोपी महिलेच्या विरोधात रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात एका ६१ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका ४२ वर्षीय महिला दि १५ रोजी रात्री ८ वाजता रीडिंगहून एका गल्लीतून घरी जात असताना एक ६१ वर्षीय संशयित आरोपी विजय विनायक काळकर हा महिलेची वाट बघत थाबलेला दिसला, महिला पुढे गेली असता तिच्या मागे येत अंधाराचा फायदा घेत तू मला किती दुर्लक्ष करणार आहे, तू माझ्या सोबत ये तुला सुखी ठेवेल असे म्हणत महिलेचा मनाला लज्जा उत्पन होईल असे कृत्य केल्या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात सशयित आरोपी विजय…

Read More