लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :- सोमवारी रात्री अतिवृष्टीमुळे तितुर डोंगरी नद्यांना पूर आल्यामुळे चाळीसगाव शहरात शहर इतर गावांमध्ये घरांचे शेतीचे जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील वाकडी येथे पोहोचले असता त्याठिकाणी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण व संपूर्ण यंत्रणा आदी उपस्थित होते दोन्ही आधी माझी पालकमंत्र्यांनी संयुक्तिक वाकडी गावाची पाहणी केली. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी महसूल विभागाला दिले याच वेळी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनी म्हणून संपूर्ण परिस्थिती ची माहिती जाणून घेतलीसोमवारी रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश परिस्थिती होवून मोठ्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी:- कोरून रुग्णाची संख्या राज्यात कमी झाली असली तरी राज्य सरकार सण साजरे करण्यासाठी परवानगी देत नाही आहे याचा निषेध व्यक्त करीत आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कोर्ट चौकात बालगोपालांच्याहस्ते दहिहंडी फोडण्यात आली. सविस्तर असे की, महाराष्ट्रात कोरोनाचे संकट संपल्यावरसुध्दा महाराष्ट्रातील आघाडी सरकार हिंदू सणांना परवानगी देत नाही व इतर पक्षांच्या हजारोंच्यावर कार्यकर्ते रस्त्यांवर आंदोलन करतात परंतु हिंदूचा सण असलेला दहिहंडी साजरी करण्यासाठी परवानगी देत नसल्याने जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, मनसे तालुकाध्यक्ष मुकूंद रोटे यांच्या नेतृत्वात खाली सरकारच्या निषेधाची दहिहंडी स्मित चौधरी, हर्षल निकम आणि तेजस रोटे या…
जळगाव प्रतिनिधी :- प्रभारी सरपंच याच्या मनमानी कारभार विरोधात तक्रारी करूनही कारवाई होत नाही पाचोरा तालुक्यातील डाभुर्णी च्या सरपंचवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून प्रतिभा परदेशी या महिलेने आज पासून आमरण उपोषण ला सुरुवात केली आहे .उपोषणकर्त्या महिला प्रतिभा परदेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील डांभूर्णी येथील रहिवाशी असल्याने त्यांच्या ताब्यातील व मालकीची जागेवर अनधिकृपणे प्रभारी सरपंच संतोष नवलसिंग परदेशी यांनी जागेवर कब्जा केला आहे. याबाबत पाचोरा गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली व त्यांनी याचा निवाडा केला होतो. परंतू प्रभारी सरपंच संतोष परदेशी यांनी सदरील जागवेर पत्र लावून ग्रामपंचायतीच्या ताब्यात जमा केली आहे. या जागेवर भोगवटा म्हणून आमचे…
कन्नड घाटात दरड कोसळली तर तितूर डोंगरीच्या पूरात दोन जण अडकल्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !लाइव्ह महाराष्ट्र न्यूज :- हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात अतीवृष्टीचा इशारा दिला असून सोमवारी रात्री चाळीसगाव तालुकापरिसरात झालेल्या पावसामुळे तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात दोन जण अडकल्याचा अंदाज असून चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे एसडीआरएफ पथकाची मागणी केली.तसेच मन्याड प्रकल्प पूर्ण भरल्याने गिरणा नदीपात्र तसेच जामदा बंधार्यातून किमान १५००क्यूसेक प्रवाह आहे. त्यामुळे तितूर, डोंगरी व गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे तर कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली असून हि वाहतूक नांदगाव शिवूर…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वपक्षीय पॅनल साठी अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी सव्वा वर्षाचा फार्मूला ठरला असून पाच वर्षात 4 चेअरमन व चार व्हाईस चेअरमन असणार आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते भाजपनेते गिरीश महाजन हे सर्वपक्षीय बैठकीला उशिरा पोहोचल्याने तर्क वितर्क लढवले जात होते. परंतु बैठकीच्या शेवटच्या अर्धा तास अगोदर पोहोचल्याने तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.जिल्हा बँक चेअरमन पदाचे कसे राहील असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पाच वर्षात सव्वा सव्वा वर्षाचा फार्मूला ठरला. तसेच या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व भाजपा नेते…
धरणगाव प्रतिनिधी । तक्रारदारला जादा वेतन दिले गेल्याने जादा रकमेची परतफेड करण्यासाठी जिल्हा परिषदेला अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी २ हजाराची लाच स्विकारणाऱ्या धरणगाव ग्रामविस्तार अधिकारीसह ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील ग्रामपंचायतीत तक्रारदार हे शिपाई म्हणून नोकरीला आहे. तक्रारदार यांना सन २०१५-१६ वर्षात जादा वेतन दिले गेल्याने सदर जादार देण्यात आलेली रक्कमची परतफेड करण्यासाठी तक्रारदार यांना नोटीस आली. नोटीसीचा अनुकूल अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यासाठी धरणगाव येथील विस्ताराधिकारी सुरेश शालिग्राम कठाळे (वय-५१) रा. गंगूबाई नगर, पारोळा आणि कंडारी बुद्रुक ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे (वय-४५) रा. बोरोले नगर, चोपडा यांनी २ हजाराची लाच मागितली. याबाबत…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्या सोमवारी दुपारी दोन वाजता अजिंठा विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठक होणार आहे. परंतु त्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चेअरमन पदाचे स्वप्न असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आमदार गिरीश महाजन यांच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व सहकारात आहे ऐनवेळी भाजपनेते गिरीश महाजन हे राजकीय खेळी खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव महापालिकेत भाजपा शिवसेना युती होणार असेच शेवटपर्यंत शिवसेनेला गाफील ठेवून ऐनवेळी भाजपाने सर्व जागा लढून शिवसेनेला पराभूत केले हीच खेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खेळण्याची दाट शक्यता असून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : आज जळगांव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी युवक व युवती कॉंग्रेस,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच इतर सेलचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, जे कार्यकर्ते कार्यकारणीत असून पदाधिकारी आहेत व जे पक्षाचे काम करत नसून त्या पदाधिकारी यांना एक संधी देवून पदमुक्त करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जळगांव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेली जळगांव महानगरची कार्यकारणी पुर्णपणे बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारणीची घोषणा येत्या काही दिवसात करणार असल्याचे संगण्यासत आले. आगामी महापालिका निवडनूकीसंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जास्तीत जास्त नगरसेवक कसे…
स्वामी समर्थ नगर व गनाबाप्पा नगर मधिल रस्ते काँक्रीटीकरणला सुरुवात ! धरणगाव प्रतिनिधी : दळणवळणाच्या साधनांसाठी रस्ते हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा मुद्दा असून शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते विकासाचा दुवा ठरत आहे असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथे रस्ते भूमिपूजन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे होते. धरणगाव नगरपालिका हद्दीतील स्वामी समर्थ नगर गट क्रमांक 306 मध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण करणे (६० लक्ष ) गनाबाप्पा नगर गट क्रमांक 305 मध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण करणे (57 लक्ष) अशा दोन्ही रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी १ कोटी १७ लक्ष…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे प्लॉटिंग भागात राहणाऱ्या रहिवाशांनी तुंबलेल्या तलावासह गटारीच्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धरणगाव येथील बाभूळगाव परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांना घरासमोर तुंबलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्यास वाव मिळत आहे. सध्या या साचलेल्या पाण्यामुळे डेंगू व मलेरिया यांसारख्या आजारांची वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झाली आहे. नुकतीच कोरोना महामारी संपली असून त्यानंतर लगेचच सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून त्यातून आजारांची उत्पत्ती होत आहे. परिणामी बाभूळगाव परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतच्या बोगस कामावर प्रश्न उपस्थित…

