• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बाभूळगाव ग्रामपंचायतीचे बोगस काम ही सरकारची फसवणूक; नागरिकांचा आरोप..!

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 28, 2021
in धरणगाव
0

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे प्लॉटिंग भागात राहणाऱ्या रहिवाशांनी तुंबलेल्या तलावासह गटारीच्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धरणगाव येथील बाभूळगाव परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांना घरासमोर तुंबलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्यास वाव मिळत आहे. सध्या या साचलेल्या पाण्यामुळे डेंगू व मलेरिया यांसारख्या आजारांची वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झाली आहे. नुकतीच कोरोना महामारी संपली असून त्यानंतर लगेचच सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून त्यातून आजारांची उत्पत्ती होत आहे. परिणामी बाभूळगाव परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतच्या बोगस कामावर प्रश्न उपस्थित केला आहे.

यासंबंधीचे निवेदन संपूर्ण गावकर्यांतर्फे धरणगाव तहसीलदार यांना सादर करण्यात आले असून साचलेल्या पाण्याची तसेच भूअंतर्गत गटारींची योग्य ती चौकशी करून यात दोषी असलेल्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ मंडळांनी केली आहे. तसे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ग्रामसेवकाचे उडवाउडवीचे उत्तर

यासंदर्भात ग्रामसेवकाकडे नागरिक तक्रार घेऊन गेले असता ग्रामसेवकाने नागरिकांच्या भावनांचा विचार न करता प्रत्यक्षपणे उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळून एक प्रकारे शासनाच्या होणाऱ्या फसवेगिरी ला हातभार लावला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात लवकरात लवकर कारवाईची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

Previous Post

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात

Next Post

दर्जेदार रस्ते म्हणजे विकासाचा दुवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

दर्जेदार रस्ते म्हणजे विकासाचा दुवा - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group