Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

मनपात गटनेत्या पदावरून घडामोडींना वेग लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून आपल्याला ३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचे पत्र भगत बालाणी यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे. यामुळे आता उद्या होणार्‍या महासभेतील घडामोडी रंजक वळणावर आल्याचे दिसून येत आहे. १३ ऑक्टोबर रोजी महापालिकेची महासभा आयोजीत करण्यात आलेली आहे. यात स्थायी समिती सभापती, या समितीचे सदस्य आदींची निवड होणार आहे. या आधी राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. यात काही दिवसांपूर्वीच भाजपच्या तीन बंडखोर सदस्यांनी घरवापसी केली. यानंतर आता गटनेतेपदाबाबतची घडामोडी समोर आल्या आहेत. भगत बालाणी यांनी आपण स्वत: गटनेता तर राजेंद्र पाटील हे उपगटनेता असल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले असून यात आपल्याला ३३…

Read More

प्रतिनिधी प्रवीण पाटील| जळगाव तालुक्यातील जळके व वसंतवाडी येथे 13 रोजी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानावर हरभरे बियाणे साठी चे परमिट वाटप करण्यात येणार आहे तरी परिसरातील शेतकऱ्यांनी सातबाराचा उतारा आधार कार्ड झेरॉक्स घेऊन येण्याचे आव्हान करण्यात आले आहे. तालुक्यात 13 रोजी जळके व वसंतवाडी येथील शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी हरभरा बियाणे उपलब्ध झाले असून त्यासाठी लागणारे परमीट जळके ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ९वाजेपासुन वाटप होणार आहे तरी जळके वसंतवाडी परिसरातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीचा ७/१२ गट नंबर समजण्यासाठी व आधार कार्ड झेरॉक्स घेऊन जाणं आवश्यक आहे . तरी जळके वसंतवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी उद्या जळके ग्रामपंचायत येथे येऊन हरभरा बियाणे परमीट घेऊन जाण्याचे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यातील काही ठिकाणी 16 व 17 ऑक्टोबर, 2021 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी करावी व शेतात साठवणूक केलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी ठेवावा. जेणेकरुन वरील कालावधीत होणाऱ्या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण करणे सोयीचे होईल, असेही  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.

Read More

महाराष्ट्र बंद वरून भाजपची ठाकरे सरकारवर टीकालाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या अविर्भवत मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजु मामा) यांनी आज ११ ऑक्टोबर रोजी प्रसिध्दी पत्राद्वारे केले असुन प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडले, असा सवालही त्यांनी केला. वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर अशा…

Read More

प्रतिनिधी अमोल पाटील:- उत्तरप्रदेशातील लाखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.त्यास पाळधी गावांतील व्यापारान पासून तर छोटे,मोठे व्यावसायिक यांनी देखील सकाळ पासून पूर्णपणे कळकळीत बंद पाळून साथ दिली. गावांतील सर्वसामान्य नागरिकांनी देखील बंद मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन बंद पाळला बंद मधून जीवनाश्यक सुविधांना बंद मधून वगळण्यात आले होते त्यात प्रामुख्याने दवाखाने,मेडिकल याचा समावेश होतो. बंदला प्रतिसाद देण्यासाठी आवाहन करताना शिवसेनेचे पाळधी गटाचे जि. प.सदस्य प्रतापराव पाटील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी,मा.सभापती मुकुंदराव नंनवरे, कॉग्रेसचे वी. डी. पाटील,मा.सरपंच अरुण पाटील,सामाजिक कार्यकर्ते संजय महाजन,प्रशांत झंवर युवासेनेचे प्रमुख आबा माळी.आदी उपस्थित होते.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाविकास आघाडीने  पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्यावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारामारीमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं .भुसावल तालुक्यातील वरणगाव येथे  महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करत होते. भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते. दोन्हीकडून शहरभरामध्ये वेगवेगळा प्रचार केला जात असतानाच दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मारामारी झाली.दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले जात आहे. आम्ही शांततेमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंदला समर्थन द्या असं सांगत असताना भाजपाचे लोक तिथे आला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे इ -फेरफार प्रकल्पाचे समन्वयक व प्रमुख रामदास जगताप यांनी महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांना उद्देशून अर्वाच्य भाषेत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज राज्यभर तलाठी संघाने आंदोलन पुकारले आहे .धरणगाव तालुका तलाठी संघानेही आज तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करीत धरणे आंदोलन केले आणि या अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी राज्य सरकारकडे केली. तलाठी कर्मचाऱ्यांसोबत मंडल अधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read More

उपद्रव हा खूनापेक्षा जास्त वाईट आहे-पवित्र कुराणलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी गोळ्या घालून नागरिकांना ठार मारल्याचा निषेधार्थ जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी च्या रविवारी झालेल्या तातडीच्या सभेत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.उप द्रविना इस्लाम मध्ये थारा नाही पवित्र कुराण मधील सूर ए अलमायदा आयत ३२ मध्ये स्पष्ट नमूद आहे की ज्याने एखाद्या माणसाला खूनाबद्दल अथवा पृथ्वी तलावर उपद्रव पसरविण्या व्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानव जातीला जीवन प्रदान केले.इस्लाम मधील सहिष्णुता नैसर्गिक रीतीने आपले कार्य करणारे कायदे असूनही इस्लाम आपल्या अनुयायांना…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चोपडा म्हटलं म्हणजे राष्ट्रवादीचा गड परंतु अलीकडे लोकसभेला भाजपा आणि विधानसभेला राष्ट्रवादी असे समीकरण असते परंतु जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय फार्मूला नुसार चोपडा ची जागा ही काँग्रेसला सोडण्यात आले आहे त्यामुळे आघाडीतील मित्रपक्ष ही अनुकूल झाले परंतु राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपाचे घनश्याम अग्रवाल हे उमेदवार असतील यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने सर्वपक्षीय पॅनल वादात सापडले आहे. जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल चे वारे वाहत असताना चोपडा नेहमी उलट्या दिशेने चालते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्थानिक असतानादेखील या ठिकाणी अनेकवेळा भाजपाला रसद पुरवली स्थानिक नेत्यांकडून झाले असल्याचे अनेक निवडणुकीच्या मतदान वरून दिसून येते. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लीड चोपडा तून…

Read More

महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज – लक्ष्मणराव पाटील धरणगांव प्रतिनिधी: येथील अ.भा.जिवा सेना व शहरातील नाभिक समाज बाधवांतर्फे शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त गुजराथी गल्ली येथे प्रतिमा पूजन व जिवाजी महाले यांचे जीवनपट यावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत सेवक जिवाजी महाले होते. असे प्रतिपादन महात्मा फुले हायस्कूल चे उपक्रमशिल शिक्षक पी. डी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. जिवा सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. बी. एल. खोंडे होते. या जयंती महोत्सवानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. जिवा सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. बी. एल.…

Read More