प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: आपली शिक्षण व्यवस्था निर्माण करून आपल्या मुलांना महापुरुष याचे शिक्षण देणे गरजेचे आहेसत्यशोधक विचार आत्मसात करण्याची गरज आहे .याचवेळी महात्मा फुले याचा जीवनपट उलगडला यातूनच सत्यशोधक विधीकर्ते देशभर निर्माण केले जातील असे व्यक्तव्य अरविद खैरनार यांनी येथील मोठा माळी वाडा समाज मढीमध्ये १४८ व्या “सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिरावेळी केले.प्रबोधन शिबिराचे प्रास्ताविक माळी समाजाचे पंच हेमंत ज्ञानेश्वर माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प महामंडलेश्वर भगवानजी बाबा होते. या प्रबोधन शिबिराचे उद्घाटन संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रबोधन शिबिराचे प्रमुख वक्ते औरंगाबादचे सत्यशोधक अरविंद खैरनार, धुळे येथील सत्यशोधक…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नाशिक परिक्षेत्राच्या आय जी यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री ब्राऊन शुगर तस्करी करणाऱ्या एका आरोपीला हॉटेल परिसरातून अटक केली याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणातील अजून धागेदोरे समोर येतील आरोपी हा जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराचा आहे.नाशिक परिक्षेत्राचे आईजी यांच्या विशेष पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की ,जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील पंचशील नगर मधील 43 वर्षाचा एक किसन ब्राऊन शुगर तस्करी करीत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे या विशेष पथक व धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस यांच्या मदतीने शनिवारी रात्री 9 वाजेला भुसावळ येथील पंचशील नगर मधील रहिवाशी सैय्यद शेर सैय्यद बुडन या आरोपीला …
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे 8 ऑक्टोबर रोजी बौद्धिक संपदा अधिकार(IPR) या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली.सदर कार्यशाळेसाठी प्रा डॉ एम डी शिरसाट संचालक रुसा सेंटर इलेक्ट्रॉनिक विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद हे लाभले यांनी बौद्धिक संपदा अधिकार या विषयावर बोलताना पेटंट व कॉपीराईट्स संदर्भातील प्रोसिजर पेटंट धारकांचे अधिकार पेटंट मिळवताना अविष्कार कशा पद्धतीचे पाहिजेत विशेषतः संदर्भ पुस्तके व या पुस्तकांवर मिळणारी मिळकत म्हणजेच रॉयल्टी कशा पद्धतीने मिळते व ती किती काळापर्यंत मिळत राहते प्रकाशक संशोधकांची कशी फसवणूक करू शकतात त्यातील माहिती त्यांनी सहभागी संशोधकांना उत्कृष्ट मांडणी द्वारे सांगितले नवीन संशोधकांना पेटंट…
चुकीचे सल्ले देत असल्याने मोजमाप चुकीचे होत सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप प्रतिनिधी (गणेश साळुंखे) राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे त्यात शहरातून राष्ट्रीय महामार्गा जात आहे.याठिकाणी मोजमाप योग्य पध्दतीने होत नसल्याने त्यामुळे दोन्ही बाजूस समांतर रस्ता तयार होण्यास अडचणी येऊ शकतात असे असतानाही नाही अधिकारी योग्य सल्ला देत नाही आहे. असा आरोप आज सामाजिक कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता, शिवराम पाटील, ईश्वर मोरे, अनिल नाटेकर यांनी थेट हायवेवरच पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.चौपदरीकरण होत असतांना याच्या दोन्ही बाजूंनी उपलब्ध असणारी जागा लक्षात घेऊनच सेंटर लाईन प्रमाण मानावी अशी मागणी आज सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग उडडाणपुल, भुयारी मार्ग ई नवीन बांधकामे…
वार्ताहर भाईदास पाटील: धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथे सालाबादाप्रमाणे दोन गाव एक दुर्गा देवी नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.बोरगाव गावातील सर्वांचे प्रेरणास्थान असणारे कै,सजन आनंद सोनवणे यांच्या प्रेरणेने व त्यांच्या स्मरणार्थ बोरगाव खु.येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. नवरात्र उत्सव निमित्ताने गावात कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक ७ रोजी पासुन कीर्तनाला सुरूवात होणार असून १४ रोजी कीर्तन कार्यक्रमाची सांगता होणार आहे ह.भ.प चंद्रकांत महाराज आर्थेकर,शिवशाहीर गोपाल महाराज चिमठाणेकर,गोविद महाराज पाचोरेकर,जनार्दन महाराज आर्वीकर,रवींद्र महाराज तार खेडेकर,अनंतजी महाराज,शिवाजी महाराज बाविस्कर,जगन्नाथ महाराज बागले(सर)यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमानिमित्ताने गावातील मंदिर व्यवस्थापनाने भाविक भक्तांसाठी १७ रोजी महाप्रसादाचे आयोजन देखील केले आहे.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेने भाजप बंडखोर नगरसेवकाच्या मदतीने सत्ता मनपाची सत्ता काबीज केली होती याप्रकरणी आयुक्तांची नोटीस बजाविण्यात आल्या त्यानंतर बंडखोर नगरसेवका पैकी तीन नगरसेवकांची घर वापसी झाली आहे त्यामुळे पुन्हा मनपा मध्ये एकदा पुन्हा सत्तातराचे नाटक सुरू झाले आहे. मनपावर भाजपची एक हाती सत्ता असताना काही भाजपाच्या बंडखोर नगरसेवकांनी शिवसेनेशी हात मिळवणी करून भाजपची सत्ता पडली होती व मनपावर भगवा फडकविला होता मात्र याबाबत भाजपने आयुक्तांकडे तक्रार केली होती त्याची नोटीस 8 रोजी सर्वांना बजावण्यात आली होती या नोटिशी नंतर प्रभाग तीन मधील नगरसेवक सुरेश सोनवणे ,शोभा बारी,अशिनाभी शेख, हे आ शिरीष महाजन , आ राजू मामा भोळे, आबा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव पोलीस शिपाई भरती परीक्षेचा आज लेखी पेपर होता. यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा केंद्रात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कॉपी करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे तर दुसरा गुन्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक असे की, पोलिस शिपाई भरती २०१९ची प्रक्रीया सुरू झाली आहे. यात जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर १२८ पदांसाठी आज ९ ‘क्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता जळगाव व भुसावळ शहरातील ६८ केंद्रांवर २१ हजार ६९० उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी लेखी परिक्षा घेण्यात आली. कवयित्री बहिणाबाई उत्तर…
वार्ताहर भाईदास पाटील: धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे अखिल भारतीय जीवा सेनेच्या वतीने वीर जिवाजी महाले यांची जयंती सकाळी 9:30 वा. विठ्ठल मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली. जिवाजी म्हणून वाचले शिवाजी या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूरवीर जिवाजी महाले यांची ही जयंती अखिल भारतीय जिवा सेना विभागीय अध्यक्ष बी.एल.खोंडे सर व भवरखेडा गावचे प्रथम नागरिक सरपंच किरण गोकुळ पाटील उपसरपंच अजय तानकु ब्राह्मणे यांच्या उपस्थितीत जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अखिल भारतीय जिवा सेनेचे विभागीय अध्यक्ष बी. एल. खोंडे सर यांनी वीर जिवाजी महाले यांच्याबद्दल…
विशेष पोलीस उपमहानिरिक्षकांची कारवाई लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: – जिल्हयातील धरणगाव शहरानजिक असलेल्या परिसरातील कमल जिनींग मीलमध्ये रेशनमालाचा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचा पेेट्रोलिंगवर असताना आलेल्या फोनवरून नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने छापा टाकल्यानंतर दोन दिवसांची पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यात रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ११.६३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यात रेशनमालाचा काळाबाजार होत असून एका ठिकाणी रेशनमालाचे पॅकींग केले जात असल्याच्या माहितीवरून विशेश पोलीस उपमहानिरिक्षक यांनी छापा टाकून रेशनमाल जप्त करण्यात आला. या रेशनमालाचा पंचनामा करतेवेळी कमल जिनींग प्रेसिंग आवारात असलेला धान्यसाठ्याची रेशनमालात भेसळ करून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील मेहरूण परिसरात असलेल्या रामेश्वर कॉलनीतील रहिवासी भिमाबाई चिंधु भंगाळे (वय-९०) यांचे शुक्रवार दिनांक ८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या सुधाकर भंगाळे व सोपान भंगाळे यांच्या आई होत्या.

