Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ तालुक्यातीलसाकेगाव येथील तरूणाला खंडणी मागण्याच्या प्रकरणाती दाखल गुन्ह्यातील दोन संशयितांना तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत वृत्त असे की, महामार्गावर असणार्‍या बर्‍हाटे पेट्रोल पंपाजवळ बंटी पथरोड यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर फाडल्याच्या आरोप करत मयूर मदन काळे (वय १९, रा.साकेगाव) याचे संशयितांनी चारचाकीतून अपहरण केले. चॉपर व पिस्तुलाचा धाक दाखवून ५ लाख रुपये खंडणी देण्याच्या अटीवर सोडून दिले होते. ७ व ८ सप्टेंबरला घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेप्रकरणी मयूर मदन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंटी पथरोड, नितीन कोळी (अंजाळे, ता.यावल), हर्षल पाटील, गोलू जव्हेरीलाल कोटेचा (साकेगाव), ओम, सागन भगवान भोई (वय…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भोसरी जमीन खरेदी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.मुंबई उच्च न्यायालयाने एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना दिलासा दिला. अटक झाल्यास ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे पोलिसांना आणि १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश त्यांना न्यायालयाने दिले . विशेष न्यायालयासमोर हजर राहण्यासंदर्भातील निर्देश न्यायालयाने मंदाकिनी यांना दिले आहेत. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा खटल्यात मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा बँक निवडणूक सर्वपक्षीय पॅनल ची उभारणी सुरू असून सामाजिक समतोल साधावा म्हणून महिला राखीव मतदारसंघ माजी नगराध्यक्ष पुष्पा महाजन यांना महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची बैठक घ्यायला पाहिजे होती. परंतु तसे झाले नाही त्यामुळे आता जिल्हाध्यक्षांनी तात्काळ इच्छुकांची बैठक बोलवावी अशी मागणीही महाजन यांनी केले आहे सर्वपक्षीय पॅनल मध्ये सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सुरू असून माळी समाजालाही न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील महिला दक्षता विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला २० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडले. एसीबीने सदर कारवाई आज दुपारी केली असून या कारवाईमुळे पोलीस मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस मुख्‍यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद केदार अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाच्‍या परिसरात असलेल्या महिला दक्षता समिती कार्यालयात आज सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केदार यांनी एका प्रकरणात तक्रारदाराकडून २५ हजाराची लाचेची मागणी केली होती. यात तडजोडीअंती २० हजार रूपये निश्‍चीत झाले. व यासंदर्भात तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. असा रचला सापळा..तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करत २० हजाराची…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भारत मातृसत्ताक असल्याचे ऐतिहासिक संदर्भ दीपस्तंभा समान आहेत.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत छत्रपती शिवरायांनी जिजाऊंच्या नेतृत्वात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर, स्वातंत्रोत्तर काळात भारताने स्व.इंदिराजींच्या रूपाने जगाचे नेतृत्व करून दाखविले आहे. म्हणून इतिहासातून बोध घेऊन स्त्री शक्तीचे संवर्धन करून मानवजातीचे अधिक कल्याण साधता येईल असे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मानसमित्र समुपदेशन केंद्र आणि मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्त्री शक्तीचा जागर’ या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलतांना प्रा.संदीप पाटील यांनी विविध क्षेत्रात प्रभावी कार्य करण्यासाठी सावित्रीमाई फुलेंचा आदर्श ठेऊन शिक्षणाची कास धरून तिमिरातून तेजाकडे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जामनेर तालुक्यातील पाळधी येथे कपासाची गाडी भरत असतांना विजेचा धक्का लागल्याने २५ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणा जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पाळधी येथे आज १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास व्यापाऱ्यानं ट्रक्मध्ये कापसाची गाडी भरत असतांना टपावर बसलेले तिघे जण ट्रकवरून खाली उतरत असतांना विजेच्या तारांचा जबर धक्का लागल्याने विशाल बाबुराव श्रीखंडे (वय-२५) रा. माळपिंप्री या मजूराचा जागीच मृत्यू झाला.तर सोबत असलेले तर ज्ञानेश्वर श्रावण काळे व ज्ञानेश्वर सिताराम भजे रा. माळपिंपरी हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने  जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान रेल्वे खांबा २८२/१३ च्या दरम्यान दोन्ही रेल्वे रुळाच्या मध्ये एक ईसम रेल्वे अपघात मृत्यू  झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यु नोंद झाली आहे .स्टेशन मास्टर चावलखेडा रेल्वे स्टेशन यांनी मेमो द्वारे धरणगाव पोलीस स्टेशनला कळविले कि, धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान रेल्वे खांबा २८२/१३ च्या दरम्यान दोन्ही रेल्वे रुळाच्या मध्ये एक ईसम रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. असे कळविल्यावरून धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यु रजी नं. ६९/२०२१ C.P.C. १७४ प्रमाणे दाखल असून घटनास्थळावर धरणगाव पोलीस स्टेशनचे पो.उप नि गवारे , पोहेकॉ संतोष थोरात  यांनी तपासणी केली.   मयत इसमाची तपासणी केली…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:  क ब चौ उ म विद्यापीठ मध्ये बऱ्याच प्रकरणात अधिकारी वर्ग टाळाटाळ करण्याचे काम करीत असून काही लोक अधिकारी वर्गाला हाताशी धरून संगनमत करून जाणीव पूर्वक  विद्यापीठात भ्रष्टाचार करत आहेत व विद्यापीठाची बदनामी करत आहेत त्याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदन आज अँड कुणाल बी पवार, भूषण भदाणे, गणेश निंबाळकर, गौरव वाणी,चेतन चौधरी यांनी इमेल व्दारे राज्यपाल भगतसिंह कोश्यायरी कडे केली आहे. आज विद्यापीठाच्या कारभाराबाबत राज्यपाल भगतसिंग कोशायरी ई-मेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले यात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा मध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत यामुळे विद्यापीठाला बदनाम करीत आहे या सर्व प्रकरणाची सखोल…

Read More

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मते  भाजपचे गटनेते भगत बालाणीलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महापालिकेत गटनेता पदावरून पेच निर्माण झाले असतानाच माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे अधिकृत गटनेते हे भगत बालाणी असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे गटनेते पदार भाजपचा हक्क असल्याचे भाजपा पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट  डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी केले. आजच्या पत्रकार परिषदेत डॉ. राधेश्याम चौधरी यांनी महापालिकेतील सत्ताधारी आणि भाजपचे फुटीर सदस्यांवर टीका केली. आजवर आम्हाला ३० नगरसेवकांचा पाठींबा होता. यानंतर तीन जण सोबत आले. तर आज पुन्हा दोन जणांनी संमती दिल्यामुळे आता भाजपच्या ३५ सदस्यांनी संमतीने भगत बालाणी हेच भाजपचे गटनेते असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा दावा डॉ. राधेश्याम चौधरी यांनी दिला.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सध्या नवरात्री सुरू आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. महिला शक्तीचा जागर होत आहे. याच धर्तीवर जिंदगी फाउंडेशनने चाळीसगाव तालुक्यातील जुनोने आणि नाईक नगर तांडा या अतिशय दुर्गम गावात महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीबद्दल जनजागृती केली. जुनोने हे गाव कन्नड घाटाच्या वरच्या बाजूला आहे. त्यामुळे हे गाव दुर्गम भागात मोडते. जिंदगी फाउंडेशनने गावातील महिला आणि किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सर्व महिला आणि किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात आले. जिंदगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळी विषयी शास्त्रीय माहिती सांगितली. मासिक…

Read More