Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मंत्रिमंडळाने नगरपालिका महानगरपालिकेच्या धर्तीवर नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या जागांमध्ये वाढ केली आहे जिल्हा परिषद ला दहा जागा तर पंचायत समितीसाठी 20 जागा जळगाव जिल्ह्यात वाढलेले आहे यात कोणत्या तालुक्याला किती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद ला 67 जागा जळगाव जिल्ह्यात होते मंत्रिमंडळाच्या नवीन निर्णयामुळे त्यामध्ये दहा जागांची वाढ होऊन ही संख्या 77 वर गेली आहे जागांची संख्या वाढल्यामुळे अनेक इच्छुकांची संख्याही वाढणार आहे तसेच पंचायत समितीच्या जळगाव जिल्ह्यात 134 जागा होत्या त्यामध्ये 20 ने वाढ होऊन ते 154 वर गेले आहेत जळगाव जिल्ह्यात गट आणि गण यामध्ये झालेल्या वाढीव…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातील बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधवार या ३६ वर्षाच्या प्रदिघे सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याहस्ते मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सत्कार करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवाला हे ३० नोव्हेंबर रोजी ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांच्याहस्ते सत्कार केला असून त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव तालुक्यातील बांभोरी बु.येथील मोलमजुरी करणारे देविदास वसंत सोनवणे यांचा चिरंजीव पहेलवान अक्षय देविदास सोनवणे याने नुकतेच गोवा येथे झालेल्या नॅशनल ट्रॅडिशनल कुस्ती स्पर्धेत ‘मास रेसलिंग’ मध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. ऑल इंडिया रेस्टलिंग अंड पैक्रेषन चैम्पियनशिप २०२१ हि स्पर्धा २९ ते ३१ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे पार पडली. जागतिक स्तरावरील या स्पर्धेत सुवर्ण मिळविल्यानंतर अक्षयची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झाली आहे. १६ डिसेंबर रोजी विदेशात फ्रीलेंड या ठिकाणी जागतिक स्तरावरील पुढील स्पर्धा होणार आहे. त्यात तो सहभागी होणार आहे. त्यासाठी त्याला तत्काळ स्वरुपात पासपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. अक्षयची निवड झाल्याबद्दल त्याच्या गावी त्याचा सत्कार करण्यात आला असून…

Read More

आरोपींच्या तात्काळ अटकेची पत्नी मीना जगताप यांची मागणी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: न्यायालयीन कोठडीत असताना बेदम मारहाणीत मृत्यू झालेल्या चिन्या जगताप हत्याकांडात आज  पोलिसांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे . दरम्यान , तब्बल १४ महिन्यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे . तत्कालीन कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड , तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत अशी या आरोपींची नावे आहेत . ११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता . कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव तालक्यातील बोरणार म्हसावद गटात रुग्णांना ने आण करण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रेरणेने जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष बापूसाहेब परदेशी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष वावडदा सरपंच राजेश वाडेकर यांनी रुग्णवाहिका बुक केली आहे. बोरणार म्हसावद गटातील रुग्णांना जळगाव येथे आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असे त्यामुळे या गटामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या प्रेरणेने लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. आज जळगाव येथे जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बोरणार म्हसावद गटातील गोरगरीब रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष बापूसाहेब…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील : तालुक्यातील जवखेडा येथे 29 रात्री बारा ते सकाळी चार वाजेच्या दरम्यान शेतातील विजेच्या तारांची चोरी झाल्याची माहिती छोटू सरपंच यांनी विद्युत उपकेंद्राचे ज्युनिअर इंजिनिअर यांना दिली असून याची चौकशी करून पोलिसात तक्रार देणार असल्याचे ज्युनिअर इंजिनिअर यांनी सांगितले. तालुक्यातील जवखेडा लोणवाडी रस्त्यावरील २९नोव्हेंबर रात्री १२ते सकाळी ४च्या सुमारास जवखेडा शिवारात शेतातील १९तारांची चोरी झाली आहे .यात डि.पी.तारांची क्रमांक४२३८६९ छोटु सरपंच यांच्या शेतातील डि.पी.वरील ११गाल्यांच्या तारांची व डि.पी.क्रमांक४२३८७०दिपक लोटन पाटील यांच्या शेतातील डि.पी.वरील ८गाल्यांची तारांची चोरी झाल्याची माहिती म्हसावद विद्युत उपकेंद्राचे ज्यु.इंजिनिअर माने मॅडम यांनी दिली आहे. तरी माने मॅडम स्वतः व त्यांचे कर्मचारी शिवाजी काळे…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : धरणगाव तालुक्यातील बालाजी लोंढे तलाठी पाळधी बु. आणि सुमित गवई तलाठी चांदसर यांना प्रांताधिकारी एरंडोल विनय गोसावी यांनी निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तलाठी बालाजी लोंढे व सुमित गवई यांच्या बाबतीत नागरिक व शेतकरी यांना न्याय न देणे, मुख्यालयी न थांबणे,अतिवृष्टी याद्यामध्ये नावे वगळणे,शेतकरी व नागरिकांना फिरवणे, 7/12 साठी धरणगावला बोलावणे अशा अनेक तक्रारी नागरिक व शेतकऱ्यांच्या असल्यामुळे चौकशीअंती त्यांचा अहवाल तहसिलदार धरणगाव यांनी पाठविला होता. यात तलाठी पाळधी बालाजी लोंढे यांचा असमाधानकारक असल्याने तसेच तलाठी चांदसर यांनी खुलासा सादर न केल्यामुळे सदर निलंबन कारवाई त्यांच्यावर प्रांताधिकारी यांचेकडून करण्यात आली आहे.

Read More

अरबी समुद्रात लक्षद्वीपमध्ये येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अरबी समुद्रात लक्षद्वीपमध्ये येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता व बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) क्षेत्रात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 2 डिसेंबर, 2021 पर्यंत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिक, शेतकऱ्यांनी सतर्क राहात सुरक्षितस्थळी थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व तापी नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होवून हातनूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नदी काठच्या गावातील नागरिकांनी…

Read More

महात्मा फुले नसते तर शिवराय कळले नसते – लक्ष्मणराव पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: हनुमान नगर मित्र परिवार, बहुजन क्रांती मोर्चा आणि सत्यशोधक परिषद धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त हनुमान नगर येथे वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. या प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे सल्लागार पंच हेमंत माळी सर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे ज्येष्ठ पंच सखाराम दुला महाजन होते. या वैचारिक प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक वक्ते प्रा.भरत शिरसाठ, पी.डी.पाटील, लक्ष्मणराव पाटील होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील राजीव गांधीनगरात अंदाजे २० ते २२ महिन्याचे अर्भक  उकिरड्यावर मृतावस्थेत आढळून आले याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आज सकाळी राजीव गांधीनगरात २० ते २२ आठवड्याचे अर्भक स्वप्नील चौधरी यांना उकिरड्यावर मृतावस्थेत टाकून दिले असल्याचे दिसून आले.यावेळी स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. स्वप्नील चौधरी यानी घटनेची माहिती पोलिसांना दिली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पो.काँ. नितेश बच्छाव, हरिश डोईफोडे, सुशिल चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन या बाळाला ताब्यात घेतले आणि पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले . तेथे सीएमओ डॉ संदीप पाटील यांनी या बाळाला मयत घोषित केले . शासकीय रुग्णालयात रामानंद…

Read More