मुंबई : वृत्तसंस्था अभिनेत्री दीपाली सय्यद वारंवार त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात परंतु यावेळी त्यांच्यावर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी सय्यद यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी हे आरोप केले आहेत. त्याचबरोबर दीपाली सय्यद ट्रस्टतर्फे होणारे व्यवहार चुकीचे आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. शिंदे यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तर भाऊसाहेब शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या…
Author: editor desk
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत चालली असून नाशिक येथे छोट्या मोठ्या कारणावरून गुन्हे घडत आहे. नुकतीच एका धक्कादायक घटना घडली आहे. नर्स मैत्रिणीला महिला डॉक्टरने रागावल्याच्या कारणावरुन त्याच रुग्णालयातील वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणाचा व्हिडिओ आज समोर आला आहे. याप्रकरणी वॉर्डबॉयवर गुन्हा दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या निम्स् हॉस्पिटल येथे काम करणाऱ्या संशयित अनिकेत डोंगरे नावाच्या वाॅर्ड बाॅयने कात्रीने वार केले. निमसे हॉस्पिटलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दवाखान्यातील कात्रीने डॉ. आव्हाड यांच्या मानेवर उजव्या बाजुस व पोटावर वार केले. यामुळे डॉ. आव्हाड जखमी झाल्या आहेत.त्यांची प्रकृती सध्या स्थिर…
अहमदाबाद : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. हिराबेन यांना मंगळवारी रात्री अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिराबेन यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गुजरात निवडणुकीच्या मतदानादरम्यान ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मातोश्री हिराबेन यांची गांधीनगरमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत बसून चहा प्यायला. गुजरात निवडणुकीपूर्वी १८ जून रोजी मोदींनी त्यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आईची भेट घेतली होती.
पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील एका परिसरात एका महिलेने व तरुणाने एकाच घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ३२ वर्षीय बरखा मंडल आणि 31 वर्षीय राजू फारुख शेख अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. कात्रज परिसरात ही घडना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरखा मंडल आणि राजू फारुख शेख या दोघांनीही एकाच घरात आत्महत्या केली आहे. दोघांच्याही आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही आहे. बरखा आणि राजू यांची बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत ओळख झाली होती. दोघांनीही चार दिवसांपूर्वीच कात्रज परिसरात भाड्याने रुम घेतली होती. त्यामुळे घरासंदर्भात कोणतंही अग्रीमेंट करण्यात…
अमळनेर : प्रतिनिधी वर्णेश्वर महादेव मंदिर परिसरात गावठी कट्टा व इतर शस्त्र घेऊन फिरणाऱ्या एकाला अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक विजय शिंदे, हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर, किशोर पाटील, पोलिस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील, सिद्धांत शिसोदे व शरद पाटील यांचे पथक सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरात पेट्रोलिंग करत होते. शहरातील पैलाड भागातील चोपडा रोडवरील वर्णेश्वर महादेव मंदिर परिसरात संशयित अविनाश बाळू शिरसाठ (वय २६, रा.वाडी बु.ता.शिरपूर) हा विना परवाना गावठी बनावटीचे सहा बोअर असलेले रिव्हॉल्व्हर, चाकू, फायटर व दोन मोबाईल घेऊन फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील सिधरा येथे सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली, ज्यामध्ये तीन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे. सिधरा भागातून दहशतवादी निघून गेल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाच्या पथकाने एक टीम तयार करून दहशतवाद्यांना घेराव घातला. https://twitter.com/ANI/status/1607947655304609793?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1607947655304609793%7Ctwgr%5E5ee23876013b33039b9dc8cc056eecdf59154888%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fencounter-breaks-out-in-jammu-kashmir-sidhra-3-terrorists-killed-in-encounter-with-security-forces-in-jammu-news-ask97 दहशतवादी ट्रकमधून नगरोटा येथे जात असताना सुरक्षा दलांनी त्यांना सिधरा पुलाजवळ अडवले. काही दिवसांपूर्वी याच परिसरात ग्रेनेड हल्लाही झाला होता. चकमकीमुळे सिधरा मार्गावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले असता त्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या चारचाकी कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रल्हाद मोदी यांच्यासोबत कारमध्ये मुलगा आणि सून प्रवास करत होते. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले असून, उपचारांसाठी त्यांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हैसूर जवळील कडकोल्ला परिसरात हा अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. प्रल्हाद मोदी हे गुजरात फेअर प्राइस शॉप्स अँड केरोसीन लायसन्स होल्डर असोसिएशनचे प्रमुख आहेत. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एका सामाजिक कार्यक्रमात गुजरातच्या जनतेने भाजपला निवडून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. तर काही भागात सोशल मिडीयावरील सुरु असलेल्या हालचाली लहानमुले जवळून पाहत असल्याने ते त्याच गोष्टी करू लागल्याने पालकांचे टेन्शन वाढत आहे. तसेच लहान मुलांसह प्रौढांनाही मोबाइलचे व्यसन लागले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मोबाइलच्या वाढत्या व्यसनाच्या दुष्परिणामाबद्दल अनेकदा चर्चा होतात. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. अशीच एक दुर्देवी घटना समोर आली आहे. मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्यास मनाई केल्याने एका 10 वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात…
नागपूर : वृत्तसंस्था नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक विरोधातील ठराव मांडला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. सीमाभागातील गावांच्या विकासाठी योजनांच वचनदेखील दिलं. कर्नाटकविरोधातील ठराव आज एकमताने मंजूर करण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाभागातील लोकांसठी मोठी घोषणा केली आहे. तसेच, सीमावादप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटूंबांना अर्थिक मदत देखील जाहिर करण्यात आली. सीमाभागातील गावांच्या विकासाठी योजनांच वचन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मराठी माणसांवरील अन्याय दुर करणार. बेळगाव निपाणीसह ८६५ महाराष्ट्रात सामील करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्यास असल्यास सरकारी नोकरीची संधी देणार. यासोबतच, बलिदान देणाऱ्या कुटुंबाला अर्थिक मदतीची घोषणा…
धरणगाव : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्रीमरी माता मंदिराच्या भव्य जीर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार उमेशदादा पाटील होते. माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील, आर एन महाजन सर, गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, डी.जी.पाटील, डी आर पाटील सर भगवान भाऊ महाजन सुरेश नाना चौधरी जीवन अप्पा बायस संजय महाजन भानुदास विसावे दिपक वाघमारे कैलास माळी सर कडू महाजन सुनील चौधरी विलास यवले रामकृष्ण महाजन मोठा भाऊ मराठे चंदन पाटील सुरेश महाजन भागवत चौधरी ललित येवले भालचंद्र माळी शरद कंखंरे विजय महाजन विलास महाजन दिलीप महाजन इंजिनीयर सुनील शहा किरण पाटील कांतीलाल चौधरी परेश जाधव भैया मराठे कन्हैया रायपुरकर…

