मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील एका टीव्ही शोच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आपले जीवनयात्रा संपविली होती. त्यानंतर या प्रकरणी तुनिषाच्या प्रकरणी शिझानला अटक करण्यात आली आहे. तसेच तो तिचा छळ करत होता, असे आरोपही करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील वसई येथे २४ डिसेंबर रोजी एका टीव्ही शोच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आपले जीवन संपविले होते. याप्रकरणी अभिनेता शिझान याच्यावर तुनिषाला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. या घटनेनंतर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मृत तुनिषाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, आज मी तुनिषा शर्माच्या आईशी अर्धा तास बोललो. मुलीच्या बाबतीत…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारीची हत्या करण्यात आली आहे. मुळची झारखंडची असणाऱ्या रिया कुमारीचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील ती नेहमीच चर्चेत असते. तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ती पती प्रकाश कुमारसोबत प्रवास करत होती. दरम्यान काही अज्ञातांनी तिच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये तिचा मृत्यु झाला आहे. रियाच्या पतीकडून बळजबरीनं पैसे घेण्यासाठी त्या गुंडांनी झटापट केल्याचे दिसून आले आहे.पतीला गुंड मारहाण करत असतानाच त्या हल्लेखोराची गोळी रियाला लागली आणि त्यात तिचा मृत्यु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकीकडे प्रसिद्ध अभिनेत्री तुनिशा शर्माचे प्रकरण वादात असताना त्यानंतर घडलेल्या रियाच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कट्टर विरोधक असलेले शिंदे व ठाकरे गटातील सातत्याने नेहमीच विविध आरोप प्रत्यारोप समोर येत आहे. तर मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता शिवसेना भवन ताब्यात घेण्याच्या हालचारी सुरू झाल्याचे समजते. शिवसेना भवन शिंदे गट लवकरच ताब्यात घेईल, असा दावा आज अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलाय. त्यामुळे या चर्चेला वेग आलाय. शिंदे गटाने शिवसेना भवन ताब्यात घेण्याची हालचाल केली, तर मुंबईत राजकीय वातावरण तापू शकते. येणाऱ्या काळात मुंबई महापालिका निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय खेळ्या खेळल्या जात आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेचा एकछत्री अंमलय. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर काल…
अमळनेर : प्रतिनिधी जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील प्राध्यापकांची महाविद्यालय प्रशासन आर्थिक शोषण करत असल्याचा अर्ज येथील एका प्राध्यापकांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी येथील कुलसचिव यांच्याकडे केला आहे. दिलेल्या अर्जात म्हटले आहे कि, नवलभाऊ कृषि महाविद्यालय अंमळनेर जिल्हा जळगाव येथे सन 2011नंतर महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी येथील तज्ञ कमिटी मार्फत सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया नाही. सन 2011मधील भरती प्रक्रिया मधील दोन सहाय्यक प्राध्यापक फक्त आज सेवेत त्यांचे देखील विद्यापीठकडून approval मिळालेले नाही. कृषि विद्यापीठातील सक्षम अधिकारी व संस्थाचालक हे मिळून संगत मताने आर्थिक शोषण करीत आहेत. सन 2011पासून कुठलाही वेतन आयोग लागू न करता मनमानी पद्धतीने वेतन…
जामनेर : प्रतिनिधी शेतकऱ्यावर नेहमीच संकट येत असतात पावसाळ्यात निसर्गाचे संकट तर हिवाळ्यात चोरट्याचे संकट दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी चोरट्यांचे संकट मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आढळून येत आहे. जामनेर तालुक्यातील एका गावातील एका शेतकऱ्याचा कापूस व गहू याची चोरी केल्याची घटना उघडतेस आले आहे याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील गोरमाळा शिवारात शेती असलेले सुपडू संतोष पाटील यांच्या शेतातील पत्राच्या खोलीतून अनोळखी चोरट्यांनी खोलीचा कडी कोणाला तोडून खोलीत असलेले 17 क्विंटल कापूस व ७ हजार ५०० रुपये किमतीचा गहू असा एकूण १,३४,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे घटना दिनांक 28 रोजी उघडकीस आली आहे याप्रकरणी जामनेर पोलीस…
जळगाव : प्रतिनिधी एका परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने घरफोडी करीत ३५ हजाराचा एवस लंपास केला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, निमखेडी शिवारातील अनुपम सोसायटी अष्टभुजा मंदिराच्या गेट जवळील रहिवाशी गणेश अशोक पाटील (वय ४५) यांच्या घरात दिनांक ११ डिसेंबर ते २८ डिसेंबर यादरम्यान अनोळखी चोरट्यांनी घराच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातून ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर ४ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व २२ हजार रुपयाची रोख रक्कम असा एकूण ३५ हजाराचा मुदेमाल लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अनोळखी चोरट्या विरोधात…
जळगाव : प्रतिनिधी एका परिसरातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, जळगावातील एका परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी पासून ते आतापर्यंत नेहमी शाळेत जाताना संशयित आरोपी सादखान आयुब खान (वय १९) त्या मुलीचा पाठलाग करून अश्लील इशारे करून व तिच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास एपीआय रविंद्र बागुल हे करीत आहे.
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर अमळनेर पोलिसांनी कारवाई करीत मंगळवारी दुपारी तीन वाजता ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, राजाराम नगर परीसरातून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने २७ डिसेंबर मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास कारवाई करत वाळूचे ट्रॅक्टर पकडले. ट्रॅक्टर चालकाला वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिले. तसेच ट्रॅक्टरमधील वाळू खाली करून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक दीपक गणेश…
जळगाव : प्रतिनिधी ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या वेगळा गट स्थापन करून राज्यात सत्ता स्थापन केली त्यानंतर शिवसेना हि आमचीच म्हणत त्यांना बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले व त्यानंतर त्यांनी आता राज्यभरात आपले जाळे तयार करीत असतांना जळगाव जिल्ह्यातील रखडलेली कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये शहरातील विविध आंदोलनात आक्रमक चेहरा असलेले निलेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी तर सरिता माळी-कोल्हे यांना महिला जिल्हाप्रमुखपदी नियुक्त केले आहे. सविस्तर वृत्त असे की, राज्यात शिंदे गटाने सत्तास्थापन झाल्यापासून जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. प्रतिक्षेत असलेली जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी आज दि.28 रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव…
धरणगाव : प्रतिनिधी रेशनकार्डावर धान्य मिळत नसल्याची तक्रार घेऊन कल्पना चंदू पारधी नामक महिला तहसीलदार धरणगाव नितीनकुमार देवरे यांच्या केबिन मध्ये आली असता रेशनकार्डावर दुकानदार धान्य देत नसल्याची बाब तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देताना सदर महिला अश्रू ढाळू लागली असता तहसीलदार यांनी तात्काळ पुरवठा निरीक्षक शेख यांना सूचना देत ऑनलाईन कार्ड झाले आहे का? अशी विचारणा केली.सदर कार्ड ऑनलाइन नसल्याने धान्य मिळत नसल्याची बाब श्री शेख यांनी सांगितली. सदर कार्ड तात्काळ ऑनलाइन करून यांचे दर महिन्याचे रेशन सुरू करा असा आदेशवजा सूचना तहसीलदार देवरे यांनी पुरवठा निरीक्षक यांना देऊ केल्या. तसेच तहसिल कार्यालयातर्फे गरजुना देण्यात येणारे एका महिन्याचा किराणा उदरनिर्वाह…

