Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला. त्यानंतर महिला आयोगाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली. अशात उर्फी प्रकरणात आता करुणा धनंजय मुंडे-शर्मा यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज उर्फी जावेदच्या कपड्यांवरून जो काही वाद सुरू आहे त्यात तिच्या कपड्यांवर मी देखील विरोध करते. इकडे-तिकडे अर्धनग्न फिरणे ही सर्वच महिलांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. ज्या महिला आणि राजकारणी महिला उर्फीला पाठींबा देत आहेत त्यांना मी सांगते की, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही अशा चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत आहात. ज्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका महाविद्यालय परिसरातील भागात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना शुक्रवारी दपारी अडीच वाजता घडली.याप्रकरणी दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता पीडिता एका महाविद्यालयाच्या परिसरातुन जात असताना फारुख खान अनिस खान (रा. उस्मानिया पार्क) व योगेश गजानन कुंवर (रा. श्रीराम चौक, वाघनगर) जळगाव या दोघांनी विद्यार्थिनीचा पाठलाग केला. तसेच तिला अश्लील हातवारे करून फोन मागून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील वंजारी खपाट या गावाचे रहिवासी नवल राजाराम माळी (वय 48) यांचे काल दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. खान्देशातील प्रसिद्ध गायक म्हणून त्यांची ओळख होती. साली नंबर वन, साली सं दिलवाली ही व अशी शंभर पेक्षा अधिक प्रसिद्ध खान्देशी गिते त्यांनी गायली. अहिराणी भाषेला गितांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आणि अहिराणी भाषेला एक नवीन ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. साली नंबर वन आजही प्रत्येक लग्नसमारंभात वाजवताना आपल्याला दिसतं. सर्वांना परिचित असं संयमशिल आणि निःस्वार्थ व्यक्तिमत्व काल आपल्यातून निघून गेलं. त्यांच्या प्रसिद्ध गितांद्वारे ते कायम प्रत्येकाच्या आठवणीत राहतील.

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस दिनांक ७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी गजानन तुकाराम तनपुरे(वय २७) याने काहीतरी फुस लावून अल्पवयीन मुलीस पळून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादी नुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास भरत लिंगायत हे करीत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून चारचाकी मालकाची घराजवळून चारचाकी चोरीस गेल्याची घटना दिनांक ५ रोजी उघडकीस आली आहे याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शाहूनगर परिसरातील नक्षत्र बिल्डिंगच्या जवळील रहिवासी जितेंद्र कैलास मुळीक यांच्या मालकीची तवेरा कार क्रमांक एम.एच.19.डीजे.00५७ या क्रमांकाची चार चाकी सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीची दिनांक 4 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना दिनांक ५ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी जितेंद्र मुळीक यांनी दिनांक ७ जानेवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. उद्धव यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे 40 आमदार शिंदेंसोबत गेल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. आम्हीच खरी शिवसेना आहोत असेही शिंदे गटाने म्हणायला सुरु केले. शिंदे आणि ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामुळे त्यांच्यातील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात शिंदे गट व ठाकरे गटात नियमित वाद सुरु आहे. यावर आज खान्देशची मुलुखमैदान तोफ म्हणून ख्याती असलेले शिंदे गटातील नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका कळी आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात फिरवला असता तर संजय राऊत खासदार झाले नसते. ते आडवे पडले असते,’ असे ते म्हणालेत. गुलाबराव जळगाव येथील हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये बोलत होते. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊतांना 41 मते पडली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली आहे म्हणून तर ते निवडून आले आहे. एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसपासून राज्य सरकार व ठाकरे गटात नेहमीच वाद होत आहे. नियमित भाजपकडून किरीट सोमय्या तर ठाकरे गटाकडून संजय राऊत हे आपली बाजू मांडत रोज नवे दावे होत आहे. आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले कि, राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली. राजकारण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. 2024 च्या आधी परिवर्तन…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेत लाखो नेत्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘भारत जोडो यात्रे’नंतर 26 जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करणार आहे. या प्रचारासाठी पक्ष ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर जनसंपर्क करणार आहे. ज्येष्ठ नेते पल्लम राजू हे या मोहिमेचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. १० जानेवारी रोजी विदर्भात प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची विस्तारित बैठक होणार आहे. या बैठकीत हात से हात जोडोचा राज्यव्यापी कार्यक्रम निश्चित होईल. ‘भारत जोडो’ नंतरचा हा दुसरा टप्पा राजकीय प्रचारासाठी असेल. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या माध्यमातून विधानसभेची तयारीही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मागच्या काळात ‘लव्ह जिहादचा’ कायदा सभागृहात आलेला आहे. मुख्यमंत्र्यापर्यत ही मागणी मी करणार आहे. येणाऱ्या अधिवेशनात हा कायदा पटलावर आलेला आहे. हिंदू म्हणून मी याच्यात अग्रेसर असेल तसेच पोलीस प्रशासनाला मी आदेश करतो. कि जिथे चुकीचे काम होत असेल तिथे कारवाई करावी. त्यासोबत धर्मातरबाबत म्हणाले कि आमच्या धर्माकडे कुणी वाकडी नजर करत असेल तर हिंदू म्हणून समोर येवू मला खुर्ची पेक्षा धर्म महत्वाचा असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. हिंदू युवती श्रद्धा वालकरचे आफताबने ३५ तुकडे केल्याचे प्रकरण शांत होता, तोच झारखंड राज्यातील रबिका पहाडन या हिंदू तरुणीचे दिलदार अन्सारीने ५० तुकडे केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली…

Read More