पुणे : वृत्तसंस्था पहिल्या पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन हत्या करीत आरोपी पती हत्येनंतर फरार होवून ओळख लपवण्यासाठी नाव बदलुन दुसरा विवाह करून वेगवेगळ्या गावात राहिला पण तब्बल 28 वर्षांनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. एखाद्या चित्रपटाची वाटणारी ही कथा पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. 1 फेब्रुवारी 1995ला सुशीला कांबळे यांची पिंपरी चिंचवडमध्ये हत्या झाली होती. पती रामा कांबळे हत्या करुन पसार झाला होता. मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील कोळनूर पांढरी या गावचा. तिथे पुणे पोलीस बरेच दिवस सापळा रचून बसले होते. पण तो पोलिसांच्या हाती लागलाच नाही. काही महिन्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष झालं. येत्या 1 फेब्रुवारीला या हत्येला 28 वर्ष पूर्ण होणार होती. दरम्यान…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरतर्फे जळगाव शहरामध्ये गल्लो गल्ली रस्ते आंदोलनला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरात जिल्हा पेठ भागात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोरील रस्त्याची वाईट परिस्थिती खराब झाली आहे. दुकानदार आणी नागरिक धुळेने त्रस्त झाले आहेत, कंबर दुखीचा त्रास वाढला आहे. यासह शहरातील विविध समस्याबाबत आज मनसे आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी केले. मनसेने नवीन रस्ता बनण्यासाठी पाठपुरवठा करित असून, महानगपालिका ला अजून जाग आली नाही तरी मार्केट समोरील रस्ते लवकरात लवकर झाले पाहिजे, न झाल्यास आता मनसे त्यांच्या स्टाईल ने जवाब…
मुंबई : वृत्तसंस्था देवदर्शनासाठी पंढरपूरला जाणारी भाविकांची बस हुलजंती ते मंगळवेढा रोडवरील येड्राव फाटा येथे पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात 29 जण किरकोळ जखमी झाले आहेत, हा अपघातात सकाळी बुधवारी दि १८ जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील खासगी ट्रॅव्हल्स बस क्र.UP-FT-8283 मधून काही भाविक देवदर्शनाला निघाले होते. हे भाविक कर्नाटकातील देवदर्शन उरकून पंढरपूरला निघाले होते. यादरम्यान हुलजंती ते मंगळवेढा रोडवर येड्राव फाटा येथे आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली. या दुर्घटनेत 1 जण ठार, तर इतर 36 जण जखमी…
धरणगाव : प्रतिनिधी दिनांक 14 जानेवारी महसूल विभागामार्फत भरविण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत धरणगाव तहसिल कार्यालयातील चमूने सामाजिक समस्यांवर ‘माझ्या देशबंधावानो’ ही एकांकिका बसवून सामाजिक संदेश दिला. यात महिला सबलीकरण,भारतीय संस्कृती आणि शेतकरी आत्महत्या या विषयांवर एकांकिका सादर केली. यात धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी शिवा नावाच्या तरुणाची अफलातून भूमिका सादर करून हा तरुण समाजातील जाचक गोष्टींवर बोट ठेवताना नाटिकेत दाखविण्यात आला.सोबतच धरणगाव येथील कर्मचारी पंकज शिंदे,संजय ब्राहमने,तलाठी भागवत पवार,वीरेंद्र सोनकांबळे,राहुल ढेरंगे,सचिन कलोरे,रोशनी मोरे,कांचन वाणी,कोतवाल धनराज भोई,राहुल शिरोळे,ज्ञानेश्वर माळी यांनी उत्तम भूमिका निभावल्या. या एकांकिकेचे लेखन दिगदर्शन तहसीलदार देवरे यांनी केले आहे. सदर नाटिकेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.याप्रसंगी…
मुंबई : वृत्तसंस्था चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंना परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्या प्रकरणावर आज सुनावणी होती. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे परळी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज परळीमध्ये दाखल झाले. परळीत पोहोचताच त्यांचं राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत झालं. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. सुनावणीनंतर हे वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचं गाव पांगरी आहे, जिथे राज ठाकरे आले आहेत. याच भागामध्ये गोपीनाथगड असून वैजनाथ साखर कारखानाही याच…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या चर्चेला जोर आला आहे. त्यामुळे दोघांवर सोशल मिडीयावर चर्चा व्हायरल होत आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही, मात्र मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या आठवड्यात या दोघांचा लग्न समारंभ होऊ शकतो. कारण या दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे. पाली हिल्स बंगल्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. केएल राहुलचे पाली हिल्स येथील घर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवले गेले आहे. सोशल मीडियावर त्याच्या घराचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो अथियासोबत 23 जानेवारी रोजी लग्न…
मुंबई : वृत्तसंस्था भाजप नेत्या मुंडे यांनी शिवसेनेत यावे असे आमंत्रण शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांना वारवार दिले असतांना ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी आता भाजपवर हल्लाबोल करीत पंकजा यांना धीर दिला आहे. अंधारे म्हणाल्या, “ज्या बायकांना चळवळीचा बेस नाही त्यांना भाजप राजकारणात आणतंय. पंकजा मुंडेंचा मास बेस आहे. मराठवाड्यात त्यांना मानणारा वर्ग आहे. भाजपच्या अनेक जागा या पंकजा मुंडे यांच्यामुळं निवडून आल्या आहेत. मोनका राजळे, नमिता मुंदडा, बुलढाण्याची जागा असेल अशा अनेक जागा पंकजा मुंडेंमुळं निवडून आल्या आहेत हे त्रिवार सत्य आहे” या पंकजा मुंडेंना रिप्लेस करण्यासाठी भाजप ज्या बायकांना चळवळीचा बेसच नाही त्यांना पुढे आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करतंय.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरातील गेंदालाल मिल भागातील एका २६ वर्षीय तरुणाला मारहाण करून लुबाडल्याची घटना शनिवारी या परिसरात घडली आहे. तरुणाकडून बाराशे रुपयांची राेकड व पाच ग्रॅम साेन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन त्याच्या डाेक्यात फरशी मारून, मांडीवर शस्त्राने वार करून जखमी केले. या प्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात दाेन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी सम्राट सुरेश साेनवणे (वय २६) हा तरुण शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल परिसरातील आलिया प्राेव्हिजन जवळून जात असताना प्रशिक प्रकाश जाधव व शुभम सुनील जाधव या दाेघांनी काही एक कारण नसताना त्याला थांबवून सुरुवातीला…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळीच्या कोर्टाने समन्स बजावले आहेत. आज त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज ठाकरे आपल्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानावरून विमानतळाकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांना कोर्टात 11 वाजता हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे राज ठाकरे यांना आज कोर्टात हाजीर राहावे लागणार आहे. 2008 मध्ये राज ठाकरे यांना अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळी गंगाखेड परिसरात निषेध व्यक्त केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. त्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पूर्वी देखील राज ठाकरे…
जळगाव : प्रतिनिधी मा खा.निलेश राणे यांनी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्या बद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी शिवसेना जळगाव महानगर तर्फे करण्यात आली. मा.खा.निलेश राणे यांनी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्यावर आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जळगाव शहर पोलिस येथे तक्रार देण्यात आली असून त्यांच्यावर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शिवसेना जळगाव महानगर तर्फे करण्यात आली राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्यावर वेड्यांच्या इस्पितळात उपचार करावे अशा सतप्त भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगर प्रमुख शरद तायडे विरोधी…

