जळगाव : प्रतिनिधी शहरातील २७ वर्षीय तरुणीचा दोन अनोळखी इसमांनी मोबाईल लांबविला प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेली माहिती अशी की शहरातील तांबापुरा परिसरातील रहिवासी २७ वर्षीय स्वाती सोमनाथ शिरसाट या दिनांक १९ रोजीच्या रात्री शहरातील महामार्ग क्रमांक सहा जवळील हॉटेल क्रेझी कॉटेज हॉलच्या समोरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या जवळ येत त्यांच्या हातातील ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेत पळ काढला याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील हे करीत आहे
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्एयातील साकेगावातून नकली नोटा बाळगल्याप्रकरणी एका महिलेसह एकाला भुसावळ तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील साकेगावातील एका परिसरात राहणाऱ्या महिलेजवळ तब्बल २१ हजार ९०० रुपयांचे नकली नोटा बाळगणे भोवले आहे. दि १९ रोजी साकेगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी याची खातरजमा करून पोलीस पथक तयार केले. या पथकाने गुरूवारी रात्री उशीरा साकेगावात छापेमारी केली. यात एका महिलेसह एका पुरुषास अटक करण्यात आली. यासाठी पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून बनावट नोटा मिळविल्या. यामध्ये संशयित…
धरणगाव : प्रतिनिधी तालुका बाळासाहेबांची शिवसेना युवती सेनेच्या तालुका प्रमुखपदी साळवा येथील प्रिया कुणाल इंगळे यांची बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते मुलुख मैदान तोफ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ सरिता ललित कोल्हे यांनी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्हा प्रमुख निलेश पाटील,जळगाव जिल्हा उप प्रमुख तथा प्रवक्ते पी.एम.पाटील सर, जळगाव जिल्हा युवा नेते प्रतापराव पाटील, धरणगाव तालुका प्रमुख गजानन पाटील, युवा उपजिल्हाधिकारी भैय्या महाजन,जळगाव जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी समन्वयक पप्पू भावे, तालुका प्रमुख शेतकरी सेना विनायक महाजन, उप तालुका प्रमुख संजय चौधरी, मोतीआप्पा पाटील, महिला शहर प्रमुख भारतीताई हेमंत चौधरी,सेनेचे शहर प्रमुख विलास…
नाशिक : वृत्तसंस्था शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोकं वर काढले आहे. नाशिक शहरात सलग दोन दिवस खुनाच्या घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातपुरच्या काश्मिरे मळे परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेने तर शहरात खळबळच उडाली आहे. खरंम्हणजे मुलगी सारखी घरातून निघून जाते म्हणून वडिलांनी मुलीचा गळा आवळून मारून टाकल्याची बाब ताजी असतांना दोघा मित्रांनी तिसऱ्या मित्राला संपवल्याची बाब समोर आली आहे. नाशिक शहरातील काश्मिरे मळा परिसरात चाळीत राहणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा हा खून झाला होता. मात्र, यामागील कारण काय याबाबत स्पष्टता येत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. पोलीस दलातील प्रमुख अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही अद्यापही आरोपींचा शोध लागलेला नाही. मात्र खुणाचं…
मुंबई : वृत्तसंस्था मॉडेल, अभिनेत्री शर्लिन चोप्राने गतवर्षी दाखल केलेल्या पोलिस तक्रारीवरून राखी सावंतला गुरुवारी 19 जानेवारी अटक करण्यात आली.अभिनेत्री राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. राखीला आज दुपारी 3 वाजता तिची डान्स अकादमी सुरू करणार होती, यात तिचा पती आदिल खान दुर्राणी तिचा पार्टनर आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही या वृत्ताला दुजोरा देत ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ती म्हणते की, “आंबोली पोलिसांनी राखी सावंतला एफआयआर 883/2022 संदर्भात अटक केली आहे. काल राखी सावंतचा एबीए 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.” शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी अॅक्टच्या अनेक कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. मुंबई…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका बंद कंपनीत गुरुवारी सकाळी ६६ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृतदेह जळताना आढळून आला. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले असून घातपात की अपघात असा तपास सुरू आहे. मिळालेली माहिती अशी कि, एमआयडीसी हद्दीत असलेल्या राम नगरात ईश्वर देवराम अहिरे वय-६६ हे परिवारासह वास्तव्यास आहेत. अहिरे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करून उदरनिर्वाह करतात. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळ समोरील बाजूस असलेल्या विक्रम प्लास्टिक यांच्या बंद कंपनीत गुरुवारी सकाळी सुरक्षारक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे यांनी गेट उघडताच त्यांना काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहिले असता एक इसम जळत असल्याचे…
औरंगाबाद : प्रतिनिधी गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद येथील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. तर नुकतीच राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एक धक्कादायक घटना समोर आली असून, राष्ट्रीय विधी विद्यापीठातील पाचव्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आपल्या एका मित्रासोबत फोनवर बोलताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. युक्ती सुशील बुजाडे (रा. त्रिमूर्तीनगर, जि. चंद्रपूर, ह. मु. मुलींचे वसतिगृह, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्ती ही विधी विद्यापीठातील पाचव्या आणि…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका सिनेमा टॉकीज परिसरात असलेल्या दुकानात एक ४२ वर्षीय महिला खरेदी करत असताना तीन संशयित आरोपींनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मिळालेली माहिती अशी की, शहरातील अशोक टॉकीज जवळील एका दुकानात दि १८ रोजी संध्याकाळच्या सुमारास ४२ वर्षीय महिला आपल्या मैत्रिणीसह खरेदी करण्यासाठी गेली असता. झिरो बल खरेदी करीत असताना संशयित आरोपी रईस बागमार याने फिर्यादी महिलेचे एकेरी नाव घेत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यासह संशयित आरोपी नवीन आसिफ बागवान, शिबान रईस बागवान या तीन जणांविरोधात जळगाव शहर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील तरुणाला जुन्या वादाच्या कारणावरून व पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या रागातून तरुणासह आईला चारचाकीची धडक देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात दोन संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील रहिवासी असलेल्या अतुल रविद्र सोनवणे हा तरूण दि १८ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास संशयित आरोपीची जळगाव शहर पोलीस स्थानकात तक्रार देवून आई सोबत दुचाकीवर घरी जात असतांना शिवाजी नगर उड्डाणपूल उतरत असतांना संशयित आरोपी दीपक दगडू भोई व अरविंद शिंदे या दोघांनी त्याच्यामागून चारचाकी क्र.एम.एच.३०ए.एफ.८७३४ पांढऱ्या रंगाची भरधाव वेगात आणत दुचाकीवर असलेले अतुल सोनवणे व…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेनेने महानगरपालिकेत ज्या कामांची पायाभरणी केली त्याच कामांचे उद्धाटन करण्यासाठीच प्रधानमंत्री येत आहे. शिवसेनेने सुरु केलेल्या कामांना जी गती मिळाली त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला आज त्यांच्या प्रचाराचे भूमिपुजन करता येत आहे. अशी टीका शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. राऊत भारत जोडो विषयी म्हणाले, भारत कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत एक आहे. त्यामुळे शिवसेनेची पाऊले उमटली पाहिजेत. त्यामुळे सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत सहभागी होऊ. 2 दिवस जम्मु काश्मिरला जाणार आहे. त्याठिकाणी हजारो काश्मिरी पंडीत सरकार विरोधात आंदोलन करत आहे. मी त्याठिकाणी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत विविध विकास…

