धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथे हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची 97 व्या जयंती निमित्त पाळधी येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर तसेच रात्री ह भ प संजय पवार आळंदीकर महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रम प्रसंगी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे पाळधी बुद्रुकचे सरपंच प्रकाश पाटील पाळधी खुर्द चे सरपंच शरद कोळी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी यांच्या हस्ते बाळासाहेबांचे पूजन करण्यात आले. नेताजी सुभाष चंद्र बोस यांचीही जयंती असल्याने ज्येष्ठ शिवसैनिक…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (ठाकरे गट) जळगाव महानगर आणि कैलास क्रीडा मंडळ यांच्या वतीने हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे चषक भव्य कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पुरुष संघात क्रीडा रसिक संघाने पटकावले तर या महिलांमध्ये स्वामी स्पोर्ट्स संघाने पद पटकावले. पुरुषांचा अंतिम सामना हा ३१ ३१ गुणांनी ड्रॉ झाला. पुढे दोघांना पाच पाच रेड करण्याची संधी मिळाली. यामध्ये क्रीडा रसिकने ९ गुण पटकावले आणि जिंकून आले. यावेळी महर्षी वाल्मीक संघ केवळ ४ गुण घेतले अखेर क्रीडा रसिक संघाचा विजय झाला. तर महिलांमध्ये अंतिम सामन्यात विजेता संघाने ३६ गुण पटकावले तर पराभूत आर.सी.पटेल संघाने ११ गुण पटकावले. अंतिम…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील ३० वर्षीय विवाहितेचा सासरचे मंडळीकडून छळ केल्या प्रकरणी पतीसह चार जणांविरोधात अमळनेर पोलीसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गुरुकृपा कॉलनीतील माहेर असलेले प्रियंका संदीप पाटील या महिलेचा विवाह बडवानी जिल्ह्यातील पानसेमल येथील बडगुन येथील संदीप केशव पाटील यांच्यासोबत झालेला आहे. विवाहितेस दि १० डिसेंबर २०१३ पासून सासरचे मंडळींनी लग्नामध्ये हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून व एक लाख रुपये माहेराहून आणावे या मागणीसाठी नेहमी शिवीगाळ व मारहाण करीत घराबाहेर काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून ३० वर्षीय विवाहितेने अमळनेर पोलीस स्थानकात पती संदीप केशव पाटील यांच्यासह ४ जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तब्बल ६५ हजारांपर्यत वेतन मिळणार आहे. MPSC मेगा भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातल्या ३७जिल्हा केंद्रावर होणार आहे. संयुक्त पूर्व परिक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परिक्षा होणार आहे. कधी होणार पूर्वपरिक्षा ३० एप्रिल यातही महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही २ सप्टेंबर रोजी, तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. अर्ज कसा करावा? एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरुन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची मुदत २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी आहे. कोणत्या पदांची जाहिरात सहायक कक्ष…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा सपाटाच लावला आहे. एमपीडीएच्या महिनाभरात ४ कारवाया झाल्या आहेत. सोमवारी भुसावळ येथील एकावर एमपीडीए करण्यात आल्यानंतर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच जणांच्या एक गॅंगला मोक्का लावण्यात आला आहे. त्यांना नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिसांकडून सर्वसामान्यांना उपद्रवी ठरणाऱ्यांवर एमपीडीए आणि मोक्कानुसार कारवाई केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील एका गॅंगवर मोक्का कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता.…
जळगाव : प्रतिनिधी दुकानातील दिवसभर झालेले पैसे घेऊन घराकडे निघालेल्या ईश्वर मेघाणी (रा.सिंधी कॉलनी) या ड्रायफ्रुट व्यापाऱ्याची आठ लाख रूपये असलेली बॅग दबा धरून बसलेल्या तिघ चोरटयांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या पांडे चौक परिसरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ घडली्. रात्री घटनास्थळी पोलिसांनी येवून पाहणी केली. त्यानंतर चोरटयांच्या शोधार्थ पथक रवाना झाले होते. शहरातील सिंधी कॉलनी येथील ईश्वर मेघाणी हे ड्रायपूटचे व्यापारी आहे. यांचे दानाबाजार येथे दुकान आहे. बँकेत भरणा करण्यासाठी सोमवारी त्यांनी आठ लाख रूपयांची रक्कम बॅगेत ठेवले होती. पण, बँकेत भरणा न करता आल्यामुळे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते पैशांची बॅग घेवून घराकडे दुचाकीने निघाले होते. राधाकृष्ण…
जळगाव : प्रतिनिधी शाळेच्या १५० विद्यार्थ्यांची आपल्याकडून आरोग्य तपासणी करावयाची आहे असे सांगून सायबर ठगाने डॉक्टराला १ लाख २४ हजार ९९७ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात डॉक्टराच्या फिर्यादीवरून सायबर ठगाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील नवीन बसस्थानक परिसरामध्ये डॉ. प्रमोद वसंत जोशी हे कुटुंबासह राहतात. रविवारी सकाळी १०.३५ वाजता त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. आपण जळगाव केंद्रीय विद्यालय येथून सतीश कुमार बोलत असून मिल्ट्रीमध्ये अधिकारी आहे. आमच्या शाळेच्या १५० विद्यार्थ्यांची तुमच्याकडून आरोग्य तपासणी करावयाची असून तुमच्या दवाखान्याचा पत्ता माझ्या व्हॉट्सअॅपवर पाठवा, असे त्याने सांगितले. जोशी यांनी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मागील काही महिन्यापासून अनेक वाद विवादात अडकलेले असतांना त्यांनी कार्यमुक्त होण्याची देखील बोलले होते, त्यानंतर आज मोठी अपडेट यात झाली आहे. त्यांनी खुद्द राजीनामा देणार असल्याचे सांगतिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत पीएम मोदी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले त्यावेळी झालेल्या भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा राज्यपालांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे व्यक्त केली. याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीया राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिली. राजभवनातून जारी झालेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान…
मुंबई : वृत्तसंस्था बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाली आहे. यावेळी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वपक्षातील नेतृत्त संपवल्याचा हल्लाबोल वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर म्हणाले की, सध्या राष्ट्रीय नेतृत्व करणारं एकही राजकीय नेतृत्त्व नसल्याचे ते म्हणाले. ईडीच्या माध्यमातून देशातलं राजकीय नेतृत्त्व संपण्याचा घाट घातला जातोय असा आरोपही आंबेडकरांनी यावेळी केला. आज ईडीच्या मार्फत पॉलिटिकल लीडरशिपवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. मात्र, कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसून, नरेंद्र मोदींचासुद्धा…
जळगाव : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील निम येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीकडून वीटभट्टीचा व्यवसाय नियमित करण्यासाठी ग्रामसेवकाने २५ हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्याची घटना घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा जळगाव स्थानिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली आहे. मिळालेली माहिती अशी कि, तक्रारदार हे अमळनेर तालुक्यातील निम येथील रहिवासी असून त्यांचे गावातच वीज वीटभट्टीचा व्यवसाय करत आहे. दरम्यान ग्रामपंचायतीकडून व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला होता, यात ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील (वय-55, रा. सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे अमळनेर) यांनी २७ हजार ५०० रुपयांची लाची मागणी केली होती. तडजोडीअंती पंचवीस हजार रुपयाची लाच…

