Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  देशासह राज्यातील वातावरणात सातत्याने बदल असल्याने काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे राज्यातील शेतकरी चिंतेत आला आहे. अनेक ठिकाणी पाऊस आणि धुक्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाकाही वाढला आहे. आज २ फेब्रुवारी राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आजपासून पुढचे दोन दिवस राज्यात थंडी वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. उत्तर भारतात सक्रिय असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील काही भागात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  येत्या २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे. त्याआधीच बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देऊ नये असे आदेश केंद्रांना दिले आहे. याआधी अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे पेपरला मुकावे लागू शकते. 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील विवाहितेला तिच्याच पतीने वर्षभरापासून अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पती विरोधात शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पतीला हैवानच म्हणावे लागेल मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात ३० वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह राहायला आहे. ३५ वर्षीय पती हा तिला दि २७ जानेवारी २०२२ पासून वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करण्यास बळजबरी करीत आहे. त्याला त्या विवाहितेने विरोध केला असता तिला शिवीगाळ व मारहाण करीत तु जर हे कृत्य मला करू दिले नाही तर तुला मारून टाकेल अशी देखील धमकी देत असल्याने विवाहितेने १ फेब्रुवारी २०२३ रोजी शनिपेठ पोलिसात धाव घेत पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागून असतानाच सत्यजीत तांबे यांनी एक ट्विट व्हायरल केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे. निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. https://twitter.com/satyajeettambe/status/1620966671119974400?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1620966671119974400%7Ctwgr%5E08c2240bc1108eb2001e30379510d21a331a3082%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fgraduate-constituency-election-satyajeet-tambe-accidental-death-of-youth-congress-president-manas-pagar-dro95 माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. अशा आशयाचे ट्विट तांबे यांनी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  देशातील अर्थसंकल्प नुकताच सादर होवून त्यावर राजकारणातून विविध प्रतिक्रिया येत असतानाचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील ५० आमदारांची आज तातडीची बैठक बोलवली आहे. मुंबईमधील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे. निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या सुनावणीमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यासंदर्भातील निकाल लवकरच लागणार असल्याने त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदेंनी बोलावलेल्या या बैठकीच कारण अद्याप स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही. मात्र पक्षचिन्ह आणि शिवसेना निर्णय अंतीम टप्प्यात असताना उद्याची बैठक महत्वाची असल्याचं…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  भाऊबंद्कीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या पुतणीवर लैगिंक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे अंघोळ करताना आरोपीने अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर आरोपींनी या विद्यार्थिनीला या व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी काकाने मुलगी घरी आल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीने मुरार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीचा काका सोनू जाटव काही महिन्यांपूर्वी ग्वाल्हेरमध्ये राहायला आला होता. त्या काकाने अल्पवयीन अंघोळ करताना तिचा अश्लील फोटो व्हिडीओ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचारीच्या विविध मागण्यासाठी आज दि १ फेब्रुवारी रोजी त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यलय बाहेर आंदोलन सुरु केले आहे. याचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अशोक मोपारी, समाधान बोरसे, समाधान मराठे, इम्रान तडवी, कुणाल पाटील, विशाल विसपुते, यादव महाले, किशोर पाटील, चेतन पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत. निवेदनात म्हटले आहे कि, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत मागील १० ते १२ वर्षापासून प्रामाणिकपणे अखंडीत मग्रारोयोची कामे करीत आहोत. वेळोवेळी वरीष्ठांनी दिलेली कामे व जबाबदारी आम्ही व्यवस्थीत पार पाडत असून मग्रारोहयोची…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  केंद्र सरकारकडून आज सादर झालेल्या अर्थसंकल्पमध्ये अनेक गोष्टीचा बदल केला आहे. यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. टॅक्स स्लॅबमध्ये कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे. सरकारने जुनी करप्रणाली रद्द केली. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी कोणत्या वस्तू स्वस्त केल्या जात आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होत आहेत हे देखील सांगितले आहे. अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीबाबत सरकार काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीसाठी कस्टम ड्युटीमध्ये सूट दिली जाईल. याशिवाय टेक्सटाइल वगळता मूळ कस्टम ड्युटी दर २१ वरून १३ पर्यंत कमी केला जाईल. त्याचबरोबर सोने आणि चांदीवरील…

Read More

देशाच्या संसदेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या पार्श्‍वभूमीवर अर्थमत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आतापर्यंत सादर झालेल्या अर्थसंकल्पात शेती व शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करणार असून शेतकर्‍यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केली आहे. केंद्र सरकार राज्यांना ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची सुविधा एका वर्षासाठी वाढवणार आहे येत्या ३ वर्षात १ कोटी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणार, यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा आणि संसाधने उपलब्ध करुन देणार पीएम प्रणाम- सेंद्रिय शेतीसाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील रस्त्यावर ६ अनोळखी चोरट्यांनी एका ३६ वर्षीय तरुणाच्या मित्राला मारहाण करीत तब्बल २२ हजार रुपयाचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याने एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एमआयडीसी परिसरातील रामदेव बाबा मंदिर सुप्रीम कॉलनीनजीक दि ३१ जानेवारी रोजी कुसुंबा येथील देवेद्र काळे व त्यांचा मित्र शाहीद हे दोघे उभे असतांना एका प्रवासी रिक्षात ४ इसम व इतर दोन असे एकूण सहा जणांनी त्यांचा मित्र शाहीद याला मारहाण करीत त्यांच्याजवळील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल, १ हजार ८०० रुपये रोकड, तसेच दुचाकीची चावी व त्यांचे महत्वाचे कागदपत्र घेवून फरार झाले, त्यानंतर…

Read More