जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरात असलेल्या १९ वर्षीय तरुणीला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव नाही तर मी आत्महत्या करुन घेईल आणि तुझ्या घरच्यांना देखील जीवंत ठेवणार नाही अशी धमकी तरुण देत होता. तरुणाकडून वारंवार दिल्या जाणार्या धमक्यांमूळे तणावात असलेल्या तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी त्रास देणार्या पिंप्राळा येथील अक्षय रामचंद्र सुरवाडे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात मयत तरुणी आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होती. त्या तरुणीला अक्षय सुरवाडे हा तरुण तरुणीला फोन करुन माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवावेच लागेल नाही तर मी आत्महत्या करुन टाकेल आणि तुझ्या घरच्या लोकांना सुद्धा…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी कुरिअर ऑनलाइन ट्रॅक करताना अज्ञाताने पाठविलेल्या लिंकवरून दोन रूपये पाठविण्यास सांगितल्यावर चोपडा शहरातील रामकुवर नगरातील रहिवासी असलेले खंडेराव पाटील यांनी दोन रूपये पाठविले. काही वेळाने खात्यातून ९८ हजार ६९८ रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक करण्यात आली. खंडेराव पाटील यांनी आपल्या मुलीसाठी शहरातील तिरुपती कुरिअर येथून मोबाइल पाठविला होता. मुलीला पाठवलेला मोबाइल पार्सल ऑनलाइन ट्रॅक करीत असताना त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क केला असता व्यक्तीने लिंक पाठवून पाटील यांना दोन रूपये पाठविण्यासा सांगितले. त्यांनी दोन रूपये पाठवताच काही वेळाने त्यांच्या खात्यावरून ९८ हजार ६९८ रुपये परस्पर वर्ग होऊन फसवणूक केल्याची घटना दि. ११ रोजी संध्याकाळी…
एरंडोल : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून अनेक हाणामारीसह खुनाच्या घटना आता नवीन राहिलेल्या नाही. अशीच घटना पुन्हा एकदा जिल्ह्यात घडली आहे. अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून धारदार शस्त्रांनी सपासप वार करीत एकाचा खून करण्यात आला. ही थरारक घटना रविवारी सकाळी एरंडोल तालुक्यातील भातखंडे उत्राण दरम्यान घडली आहे. यामध्ये सचिन उर्फ सोन्या देवीदास पाटील (३९, रा. अंतुर्ली, ता. पाचोरा) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, सचिन पाटील हा रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने भातखंडे गावाहून उत्राणकडे जात होता. त्याचवेळी मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक देत फरफटत नेले. त्यावेळी वाहनातून आलेल्यांनी त्याच्यावर…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येणाऱ्याची संख्या दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना दिसत आहे. नुकतेच १९ मार्च रोजी जळगाव शहरातील ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी ना.गुलाबराव पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शिंदे गटात दाखल झाले आहे. ठाकरे गटाचे जळगांव शहरातील माजी उपमहानगरप्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, निष्ठावंत कार्यकर्तेसह दि.१९ रोजी अजिंठा विश्रामगृहात संध्याकाळी ६ वाजता राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री जळगांव जिल्हा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थित शिववसेनेत प्रवेश केला. यामध्ये माजी उपमहानगप्रमुख सोहम विसपुते, राहुल नेतलेकर विलास भदाणे, फेरीवाला महानगरप्रमुख बाळू बाविस्कर, विभागप्रमुख नितीन तामयचे, बॉबी चांगरे, वकील आघाडी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍड राजेश पावसे…
जळगाव : प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु आहे. त्याबाबतचे अनेक नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या असतांना जळगाव तालुका पोलिसांनी एका अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर आव्हाणे येथील गिरणा नदीपात्राजवळून एक ब्रास वाळू तालुका पोलिसांनी जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला. हि कारवाई १८ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मिळालेली माहिती अशी कि, तालुका पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड, हरिलाल पाटील, अनिल मोरे, संदीप पाटील व रामकृष्ण इंगळे हे आव्हाणे गावातील नदी किनाऱ्याजवळ पोहचले. त्या ठिकाणी विनाक्रमांकाचे एक निळ्या रंगाचे ट्रॅक्टर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील अवकाळी पावसाने शेतकरीचे हाल केले असतांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र अजूनही काही शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. तुम्ही EKYC केलं असेल आणि तुम्ही लाभार्थी असाल तर चिंता करण्याचं कारण नाही.तुमच्या खात्यावर सरकारकडून हे पैसे जमा केले जाणार आहेत. तुम्ही नोंदणी करताना जर काही चुका केल्या असतील किंवा चुकीचं बँक खातं निवडलं असेल तरी सुद्धा तुमचा हप्ता येणार नाही किंवा थांबवला जाण्याची शक्यता आहे. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन याबाबत तपासणी करू शकता. याशिवाय तिथे टोलफ्री क्रमांक दिला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजच्या काळात अनेक प्रकरण समोर आला कि धक्काच बसत आहे कारण लग्नानंतर नवरा असो या बायको विवाहबाह्य संबंध ठेवताना दिसतं आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांचे संसार मोडून आपल्या प्रियकर किंवा प्रियशीसोबत कलाकार राहताना दिसत आहेत. लग्नापेक्षा लिव्हिंगमध्ये जोडपी राहत आहेत. नुकतच हैदराबादमध्ये एका तरुणाने एकाच मंडपात दोन तरुणीसोबत लग्न…दुसरीकडे एक प्रकरण तर कोर्टात पोहोचले तिथे पतीची दोन पत्नीसोबत वाटणी करण्यात आली. तीन दिवस एका पत्नीसोबत तीन दिवस दुसरीसोबत आणि रविवारी सुट्टी… पण सध्या सोशल मीडियावर एका वेगवेगळ्याच नात्याची चर्चा होते आहे. एक महिला तिच्या पती आणि प्रियकरासोबत एकाच घरात राहते. यावरुन ती महिला सोशल मीडियावर ट्रोल होते.…
मुंबई : वृत्तसंस्था देशात नियमित अशा घटना घडत असतात कि त्या आपल्याला समजल्यावर धक्काच बसत असतो यात प्रामुख्याने महिलावर होणारे अत्याचाराचे मोठे प्रमाण असतांना आता एक नवीन घटना समोर आली आहे. चक्क एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणीला १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मध्य प्रदेशाच्या इंदूरमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. त्यात एका मुलीला बलात्काराप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या मुलीला बलात्काराप्रकरणी दोषी घोषित करत तब्बल 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. “पॉस्को’ कायद्यांतर्गत पुरुषच नव्हे तर महिलाही दोषी ठरू शकते,’ असे कोर्टाने यावेळी म्हटले आहे. इंदूरच्या बाणगंगा भागात राहणाऱ्या एका 19 वर्षीय…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील १८ लाख राज्य सरकारी कर्मचारीनी संप पुकारला होता अखेर या संपाचा तिसऱ्या दिवशी सरकारला निर्णय घावा लागला आहे. राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून अतिशय जलद गतीने घडामोडी घडत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचा निर्णय झाला. कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. त्याचसाठी महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे हे सगळं करत असताना राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेला हात लावणार नाही. पण तरीही कर्मचाऱ्यांचा फायदा करण्याचा मानस सरकारचा आहे. त्यासाठीच आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत…
धरणगाव : प्रतिनिधी एका कुरियर कंपनीने शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीकडे फोन करून लिंकद्वारे पाच रुपये भरण्यास सांगितले त्यानंतर दुसऱ्या दिवशी खात्यातील तब्बल ८३ हजार रुपये लंपास झाल्याने धरणगाव पोलिसात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरातील नितीन श्रावण पाटील (वय ४५) यांची एका कुरियर कंपनीने कस्टमर केअरच्या नंबरवरून फोन करून फिर्यादीकडे कुरियरचे डीटेल्स विचारून मोबाईलवर एक पीडीएफ पाठवून त्यासोबत एक लिंकद्वारे ५ रुपये पाठविले. नंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादीच्या खात्यातील ५ वेळा अनोळखी इसमाने ८३ हजार रुपये काढल्याची घटना घडल्याने धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस…

