मुंबई : वृत्तसंस्था आपण नेहमीच सोशल मिडीयावर अनेक मित्र मैत्रीण बनवीत असतो पण यात किती खरे किती खोटे हे आपल्याला काहीच माहित नसते. अशाच एका ५२ वर्षीय महिलेला फेसबुकची मैत्री महागात पडली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याचे फेसबुकवरील मित्राला सांगणे अलका पाटील (५२) या महिलेस ‘महाग’ पडले. मदतीच्या बहाण्याने त्या कथित मित्राने अलका यांना आठ लाखांना गंडा घातला. शुक्रवारी नवघर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्टमध्ये राहणाऱ्या अलका या गृहिणीचे पती चंद्रकांत हे गेल्यावर्षी अभिनय विद्या मंदिरमधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. पतीच्या निवृत्तिवेतनावर घर चालत असल्याने मुलांच्या शिक्षणाकरिता…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील इच्छादेवी चौक ते डी-मार्ट पर्यंतचा रस्त्याच्या कामाची पाहणी आज आ.एकनाथराव खडसे यांनी दुपारी केली. रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी करत रस्त्याचे मोजमाप केले असता, एका बाजुच्या रस्त्याच्या मध्यभागातुन कडेपर्यंत डीमार्ट जवळ 8.10 मीटर, तर काही ठीकाणी 7, 7.5 मीटर एवढीच रुंदी असुन कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सायंकाळी आ.राजुमामा भोळे यांनी एक प्रसिध्दी पत्रक काढले आहेत. आ.भोळे म्हणतात की, इच्छादेवी चौक ते डी-मार्ट पर्यंत होणाऱ्या रस्त्यांचे काम थांबविणे म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळणे असेच होय. आ.भोळेंच्या प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे की, जळगाव शहरातील गेल्या 2 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छादेवी चौक पासून सुरु झालेले काम हे…
मुंबई : वृत्तसंस्था भाजपचे एजंट म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी काम पाहिले. मात्र यात त्यांचा दोष नाही. त्यांच्यावर केंद्राच्या गृहमंत्रालयाचा दबाव होता. मात्र आता नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे. राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये. अशी अपेक्षा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. संजय राऊत यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यपाल भगतिसंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. त्यांच्या जागी आता नव्या राज्यपालांची नियक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी यांच्या जागी रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन,…
जळगाव : प्रतिनिधी कारला ट्रकने मागून धडक दिल्याने यात भुसावळ येथील अॅड. श्रीराम काशीनाथ भोळे (६६) हे ठार झाले तर तीन जण जखमी झाले. ही घटना हरताळा फाट्यानजीक शुक्रवारी रात्री ११.३० वाजता एका हॉटेलनजीक घडली. अमरावती येथून खाजगी वाहनाने भुसावळकडे येत असताना हरताळा फाट्याजवळ ट्रकला मागाहूनन दिलेल्या धडकेत चालकासह चार जण जखमी झाले होते. यातील ६६ वर्षीय वकील श्रीराम काशिनाथ भोळे यांचा उपचारादरम्यान शनिवारी निधन झाले. अपघाताची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री ११:३० वाजता आशीयाई महामार्ग यादवच्या पुढे घडली. याबाबत माहिती अशी की अमरावती होऊन काम आटपून कार् क्रमांक एमएच- १९-सीझेड- ७२४६ ने भुसावळ कडे येत असताना पुढे चालणारा ट्रक…
जळगाव : प्रतिनिधी चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलाचे १३ फेब्रुवारी ऐवजी १६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे असे पालकमंत्र्यांनी आज बैठकीत सांगितले. चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलामुळे तीन तालुक्यांसोबत गुजराथ व मध्यप्रदेशच्या वाहनधारकांना लाभ होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यासोबतच शिवाजी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण, म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमीपूजन, बांभोरी येथील गिरणा नदीवरील…
मुंबई : वृत्तसंस्था नेहमी आपण रेल्वेने प्रवास करीत असतो. दूरचा प्रवास असल्याने एक रात्र तर नक्कीच आपल्याला रेल्वेमध्येच काढावी लागते. तुम्ही रात्री रेल्वेत शांत झोपलेले असतांना तुम्हाला माहित नसते कि आपल्या जवळ कोण येतय किवा कोण नाही, अशीच घटना एका प्रवासी सोबत झाली आहे त्यामुळे रेल्वेत प्रवास करतांना झोप आली तर अशी घटना आपल्या सोबतही घडू शकते. एक प्रवासी आणि त्याची पत्नी अहमदाबाद कोल्हापूर रेल्वे एक्सप्रेस गाडीतून प्रवास करीत असताना दोघांना लागली झोप. त्याचा फायदा घेत चोरटय़ाने प्रवाशाच्या पत्नीची पर्स लांबिवली आणि तो पसार झाला. मात्र तो वसई शहरातील सीसीटीव्हीत पोलिसांना दिसून आल्याने पोलिसांनी त्याला भायखळा येऊन अटक केली. त्याचे…
पुणे : वृत्तसंस्था राज्यभरात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे पुण्याची, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मोठ्या घटना घडत आहे. राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेचे इच्छूक असलेले उमेदवार राहुल कलाटे नाराज होते. त्यांनी अपक्ष निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली सुद्धा पण याच निवडणुकीत त्यांची चर्चा राज्यभर होवू लागली आहे. त्याचे कारणही तसेच काही आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षीय उमेदवारांना हा अपक्ष उमेदवार नक्की भारी पडणार आहे अशी चर्चा राज्यभर होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यासह अजित पवार यांनी खास समजूत काढून देखील राहुल कलाटे यांनी कुणाचे हि काही न एकत अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीत…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेंदुर्णी येथील बंद घरातून चोरटयांनी जवळपास सात लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना बुधवार ते शुक्रवार या दरम्यान शेंदुर्णी येथे घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंदुर्णी येथील अमित श्रीदत्त अग्रवाल यांचे लग्न होते. त्यासाठी सर्व परिवार ८ ते १० फेब्रुवारी या दरम्यान पाचोरा येथे गेले होता. यावेळी घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरावरील गच्चीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. अमित यांच्या कपाटातील तीन लाख रुपये रोख व १३ तोळे सोने असा एकूण सहा लाख ९० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. याबाबत जोगेश्वर अनिल अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था देशाचा अर्थसंकल्प झाल्यानंतर सोने व चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आली होती. तर गेल्या दोन दिवसात सोन्याचे भाव कमी झाले होते. तर १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५२,४०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५२,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. चांदी ७०,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,३५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,४०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५७,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात…

