मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा फैसला आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. सकाळपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. पोस्टल मतमोजणीनंतर ईव्हीएमद्वारे टप्प्याटप्प्याने मतमोजणी होणार आहे. मतमोजणीपूर्वी पोस्टल बॅलेटमधील मतांचा आढावा घेण्यात येतो. आतापर्यंतच्या कलानुसार भाजपने राज्यभरात मोठी आघाडी घेतली असून, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे पुढील स्थानावर आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार महायुती 150 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असल्याचे संकेत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसचे तुलनेने चांगले प्रदर्शन दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. राज्यपातळीवर महायुती आणि महाविकास…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी कपडे विक्रीसाठी आसोदा येथे जात असताना वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे नंद साबणदास जगिया (६८, रा. भुसावळ) हे ठार झाले. हा अपघात शनिवारी, दि. २० रोजी, दुपारी आसोदा सहींस रोडवर झाला. तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील नंद जगिया हे कापड विक्रीसाठी बायपासवरून आसोदा सव्र्व्हस रोडने जात असताना त्यांना मालवाहू वाहनाने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. काही जणांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यांनी जगिया यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. बायपासवर अपघात झाल्याचा व्हिडिओ व्हाटस् अॅप ग्रुपवर शेअर करण्यात आल्यानंतर तो मयताचे पुतणे…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून, निकालाच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या लढतीत चुरशीचे चित्र पाहायला मिळत आहे. यात प्रभाग १ मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी धरणगाव शहर विकास आघाडीच्या लीलाबाई सुरेश चौधरी हे ४९० मतदानाने आघाडीवर, तर महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या भावे वैशाली विनय यांना ३२३ पाठलागावर असल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रभागनिहाय मतमोजणीत आघाडी–पिछाडी बदलताना दिसत असून, काही प्रभागांमध्ये जनविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याने निवडणूक आणखी अटीतटीची बनली आहे. त्यामुळे अंतिम निकालाबाबत अद्यापही स्पष्ट चित्र समोर आलेले नाही. दरम्यान, नगराध्यक्ष पदासह ९ प्रभागांतील नगरसेवक पदांची मतमोजणी सुरू असून, काही प्रभागांमध्ये विकास आघाडी…
आजचे राशिभविष्य दि.२१ डिसेंबर २०२५ मेष राशी आज, तुमच्या आंतरिक शक्तीमुळे कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कलांमध्ये रस असलेल्यांना हा दिवस अनुकूल वाटेल. तुमच्या कलेची प्रशंसा देखील होऊ शकते. वृषभ राशी आज तुम्ही नवीन व्यवसायाची योजना देखील आखाल. महत्वाच्या निर्णयामध्ये तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाची योजना आखू शकता, ज्यामुळे तुमचे मन ताजेतवाने होईल. मिथुन राशी आज खूप एनर्जेटिक वाटेल. जर तुम्ही अधिक उत्साहाने, मन लावून काम केलं तर तुमचं काम कमी वेळेत पूर्ण होईल. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात होणारे बदल आनंद आणतील. घरात सुरू असलेल्या कोणत्याही वैवाहिक समस्या लवकरच दूर…
मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज राज्य निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत आयोग भाजपचीच ‘बी-टीम’ म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप केला. शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले, “एवढा नालायक आणि निद्रावस्थेत असलेला निवडणूक आयोग कुठेही नाही. निवडणुकांच्या आधी सरकारी तिजोरीची लूट करून पैसे वाटायचे आणि त्यातून निवडणुका जिंकायच्या हा भाजपचा धंदा झाला आहे.” त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीचा उल्लेख करत त्यांनी आरोप केला की, भाजपकडून एकेका मतासाठी तब्बल ५० हजार रुपये वाटण्यात आले. “सध्या सर्वत्र बोगस मतदान आणि व्होटचोरी सुरू आहे. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून, धमकावून निकाल फिरवले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार यांनी बिहारमधील…
वाशीम : वृत्तसंस्था वाशिम येथील भाजपच्या एका उमेदवाराकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित भाजप उमेदवाराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाशिम जिल्ह्यातील लाखाळा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजता घडली. ठाकरे गटाचे उमेदवार गुड्डू उर्फ प्रवीण डोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाजप उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखेडे याने निवडणुकीच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत जीवे मारण्याची धमकी दिली. प्रवीण डोळे हे आपल्या मित्रांसोबत चर्चा करत असताना सतीश वानखेडे तेथे आला. निवडणूक आणि मतदानाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद वाढत गेला. वाद…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजप व सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करत, आपले राजकारण सत्तेसाठी नसून मूल्यांसाठी असल्याचे ठामपणे सांगितले. “आम्हाला जर फक्त खुर्चीची आणि सत्तेची चिंता असती, तर आम्ही केव्हाच भाजपसोबत गेलो असतो. मात्र आमचे राजकारण मूल्यांवर आधारित आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी, पर्यावरणाचा ऱ्हास आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “देशातील एक तरी असे शहर दाखवा, जिथे भाजपशासित कारभारामुळे प्रत्यक्ष सुधारणा झाल्या आहेत. जिथे भाजप सत्तेत आली, तिथे विकासाऐवजी उलट प्रवास सुरू…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. १५ जानेवारीला 29 महानगर पालिकांसाठी मतदान पार पडणार आहे तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. सध्या सगळ्यांचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागले आहे. या ठिकाणी ठाकरेंसमोर गड राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे तर भाजप आणि शिंदेंची शिवसेना सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत. एकीकडे महायुतीची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मनरेगाचे नाव “विकास भारत जी-राम जी” असे बदलण्यावरून विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या विधेयकावरून सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, मोदी सरकारने मनरेगा उध्वस्त करून गरिबांच्या हितावर हल्ला केला आहे. त्याला काळा कायदा म्हणत काँग्रेस नेत्याने त्याविरुद्ध लढण्याची तयारी दर्शविली’. सोनिया गांधी म्हणाल्या, “मला अजूनही आठवते की २० वर्षांपूर्वी, जेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा संसदेत मनरेगा कायदा एकमताने मंजूर झाला होता. हे एक क्रांतिकारी पाऊल होते ज्यामुळे लाखो ग्रामीण कुटुंबांना, विशेषतः वंचित, शोषित, गरीब आणि अत्यंत गरीबांना फायदा झाला. यामुळे त्यांच्या मायदेशी, गावे आणि घरे…
जळगाव : विजय पाटील भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात युती होणार की नाही या बाबत अजून अस्पष्ट आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत अजूनही ट्विस्ट असला तरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये प्रभागात कोणाला उमेदवारी मिळेल? यावरून निवडणूक रंगतदार होणार आहे. यात प्रामुख्याने भाजप व शिवसेना या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये जास्त रस्सीखेच आहे. २०१८च्या निवडणुकीत भाजपने या प्रभागात वर्चस्व राखत चारही जागा जिंकल्या होत्या. मात्र, अडीच वर्षांत महानगरपालिकेत सत्तांतर नाट्य रंगल्याने चारही नगरसेवक शिवसेनेत गेले होते. त्यानंतर पुन्हा शिवसेना फुटीनंतर तीन माजी नगरसेवक भाजपत आले, तर एक नगरसेवक शिवसेनेत आहे. त्यामुळे प्रभागात कोणाला उमेदवारी मिळेल? यावरून निवडणूक रंगतदार होणार आहे. भाजपकडून…

