पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महत्वाची मानली जाणारी पुण्यातील पोटनिवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे आज त्यांचा निकाल सुरु झालेला असून यात आता कसबा पेठ निवडणुकीमध्ये काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत रासने यांची आघाडी मोडीत निघाली आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी सातव्या फेरीमध्ये ४ हजार २७० मतं घेतली. कसब्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुरु केला आहे. कसब्यामध्ये सध्या तरी सर्व अनिश्चित दिसून येत आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले रवींद्र धंगेकर यांची आघाडी कमी झाली आहे. धंगेकर हे सहाव्या फेरीअखेर ३…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातून जवळ असलेल्या एका गावातील ३० वर्षीय तरुणाने युट्यूब वरून पाहून घरात भारतीय चलनाच्या नकली नोटा छापणाऱ्या संशयताला पोलिसांनी एमआयडीसीतील व्ही सेक्टर मधून बुधवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता छापा टाकून अटक केली आहे. कुसुंबा तालुक्यातील देविदास पुंडलिक आढाव (वय-३०) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, कुसुंबा तालुक्यातील देविदास पुंडलिक आढाव हा भारतीय चलनाच्या नकली नोटा तयार करून ते बाजारात वापर करत असल्याची गोपनीय माहिती विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाल्यानंतर यांनी संशयित आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. सूचनेप्रमाणे पोना.महेश महाले, रविद्र मोतीराया, निलेश पाटील, सुहास पाटील, राहुल…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरुच आहे. जळगाव शहराजवळ असलेले आव्हाणे भागात बुधवारी दुपारी २ वाजता वाळू भरण्यासाठी जात असलेल्या ट्रॅक्टरने आव्हाणे रस्त्यालगत असलेल्या काळभैरव मंदिराजवळ दुचाकीवर आव्हाण्याहून जळगावकडे जात असलेल्या माय-लेकाला उडविल्याची घटना घडली. यामध्ये मुलाला जबर मार बसला असून, आईच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ट्रॅक्टरची तोडफोड करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून तुफान वाळू उपसा सुरु आहे. पोलिस प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नसून, वाळू माफियांना जणू मोकळे रानच करून दिले आहे. त्यातच वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर देखील मोठ्या भरधाव वेगाने…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील उस्मानियों पार्क येथील विवाहितेने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सना तौसिफ मिस्तरी (वय २१, रा. उस्मानियाँ पार्क, शिवाजीनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. विवाहितेच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सना तौसिफ मिस्तरी ही विवाहिता पती, सासू आणि सासरे यांच्यासह वास्तव्याला होती. गेल्या दोन महिन्यांपासून घरात कौटुंबिक वाद सुरू होता. घरात होत असलेल्या कौटुंबिक वादासंदर्भात विवाहितेने तिचे वडील मजीद शेख सांडू यांना सांगितले होते. गेल्या चार दिवसांपूर्वीच सनाचे आपल्या आई- वडिलांशी शेवटचे बोलणे झाले होते. मंगळवारी मध्यरात्री सर्व जण झोपलेले…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या शो मधून अभिनेता कुशल बद्रिके घराघरात पोहचला आहे. त्यामुळे तो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत देखील असतो. आपल्या विनोदी अभिनय कौशल्याने त्याने रसिकांच्या मनात घर केले. त्याच्या फॅन्सच्या संख्येतही खूप वाढ झाली आहे. कुशल सोशल मीडियावर सक्रीय असून तो फोटो आणि पोस्ट शेअर करत असते. दरम्यान आता त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर त्याचा खिडकीकडे पाहत असलेला फोटो शेअर करत लिहिले की, माणसं आपली असतात आणि नसतातही,जशी ती आपली असण्याची आपल्याला सवय असते, तशीच ती आपली नसल्याची सुद्धा सवय होते हळूहळू. नाही म्हणजे आठवण…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क जवळ मंगळवारी रात्री 11.30 वाजता भरधाव दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात आमोद्यातील दुचाकीस्वार ठार झाला तर तिघे जखमी झाले. अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश सोमा सपकाळे (32, आमोदा खुर्द) मृत तरूणाचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द गावातील डंपर चालक असलेला गणेश सपकाळे हा आसोदा येथील मालकाकडे मंगळवारी कामाला गेल्यानंतर रात्री गावातील मित्र समाधान प्रल्हाद बाविस्कर (आमोदा खूर्द) याच्यासोबत दुचाकीने आमोदा खुर्द गावाकडे येत असताना कानळदा रोडवरील केसी पार्क येथे रात्री 11.30 वाजेच्या सुमारास समोरून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील समीर हनीफ काकर या तरुणास एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. समीर काकर याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न या कलमाखाली एक, गंभीर दुखापत करणे या कलमाखाली एक, गर्दीसह दुखापत या कलमाखाली एक, सरकारी नोकरावर हल्ला या कलमाखाली एक आणि घरफोडीचे पाच असे एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. जळगाव शहर, रामानंद नगर आणि एमआयडीसी पोलिस स्टेशन अशा तिन पोलिस स्टेशनला मिळून त्याच्याविरुद्ध एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे व पो.नि. शंकर शेळके यांच्यासह सहायक फौजदार युनुस शेख, हे.कॉ. सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, इश्वर पाटील,…
औरंगाबाद : वृत्तसंस्था चोर हे कधीच ईच्छेने चोरी करत नाहीत त्यांच्यावर तशी वेळ येते म्हणून ते गुन्हे करतात. ठाणे शहरात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली ज्याने आपल्या वडिलांवर उपचार करण्यासाठी चोऱ्या केल्या. ही घटना विष्णुनगरातील आहे. एक न्यूज एजन्सीनुसार, गेल्या आठवड्यात एक व्यक्तीने तक्रार दाखल केली होती की, त्याच्या घरातून लाखो रूपयांचे दागिने चोरी गेले. व्यक्तीने चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत 92 लाख रूपये सांगितलं होती. पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली. पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले तेव्हा त्यात चोर येताना दिसला. लवकरच चोराची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. चोरी करणाऱ्या व्यक्तीची ओळख वैभव मुरबदे म्हणून पटली. तो मुरबाडचा…
अमळनेर : प्रतिनिधी ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक कार्यरत असून ११ वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना करत असुन याच मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने २७ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व संगणक परिचालक कामबंद ठेऊन बेमुदत संप करणार असून १ मार्च २०२३ रोजी अर्थ संकल्पीय अधिवेशनात मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे. त्यासंबंधीचे निवेदन अमळनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना दिले असून आजपासून…
मुंबई : वृत्तसंस्था छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरले जाणार असून, याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदेश काढले आहेत. छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी एक पत्र काढले आहेत. यासाठी 21 फेब्रुवारीपासून अर्ज मागवने सुरू झाले असून 29 मार्चला यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. तसेच 15 एप्रिलला अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जेही उमेदवार पोलीस पाटील भरती 2023 ची आतुरतेने वाट बघत आहेत ते या भरती करीता अर्ज करू शकता. छ. संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, छ. संभाजीनगर जिल्हयातील पोलीस पाटलांची 384 एवढी पदे रिक्त आहेत. एवढ्या…

