जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यंदा देखील पर्यावरण पूरक होळीचे दहन आणि हवन करण्यात आले. काव्यरत्नावली चौकात पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले. होळीनंतर दिव्यांग बालकांनी पोलीस अधीक्षक आणि इतर पोलिसांना रंग लावत आनंद साजरा केला. काव्यारत्नावली चौकात उडानतर्फे दरवर्षीप्रमाणे पर्यावरण पूरक होळीचे दहन करण्यात आले. झाडांचा पालापाचोळा टाकून होळी दहन करण्यात आले. तसेच होम हवन करीत त्यात विविध प्रकारच्या आहुती, कापूर, अत्तर, धूप, लोभान आणि इतर साहित्य टाकून हवन करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले. प्रसंगी उडानच्या…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील व ग्रामीण भागातील होळीच्या सणाच्या दिवशी अवकाळी व वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यामध्ये शेतकऱ्यांचे गहू, मका पिकाचे सर्वच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बाभळे, गारखेडा, आनोरा, धानोरा, धरणगाव, शिवार, गंगापुरी, पष्टाने, वंजारी, खपाट, पथराड, बोरखेडा, विवरे, भवरखेडे, हिंगोणे, कल्याणेहोळ, पिंप्री तसेच सर्वच धरणगांव तालुक्याला या अवकाळी पाऊस व वादळाचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच कापसाचे भाव कमी असल्याने शेतकरी राजा नाराज होता. शेतकरी राजा हा दिवस – रात्र मेहनत करून आपल्या पिकाचे संगोपन करीत असतो रात्री – अपरात्री पाणी भरतो. थंडीच्या दिवसात आपल्या जीवाची परवा न करता त्या पिकाला लेकरासारखं वाढवतो. कापसाचे…
धरणगाव : प्रतिनिधी गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरीचे चांगलेच नुकसान केले होते. यावर तोडगा म्हणून जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र जी.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी थेट शेतकरीच्या शेतात जावून पाहणी केली आहे. तर जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघात तात्काळ पंचनामेचे आदेश जिल्हाधिकारीसह तहसीलदार यांना दिले आहे. धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी झालेल्या शेती पीक गहू , मका, बाजरी, दादर अन्य पिकांची नुकसानीची पाहणी करतांना जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्यामुळे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी तहसीलदार व कलेक्टर साहेबांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरातील एका मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासह मुलगी वास्तव्यास आहे. दि १४ फेब्रुवारी पासून ते ६ मार्च या दरम्यान या मुलीस अल्पवयीन मुलगा हा नेहमी मुलीचा पाठलाग करीत तिच्या सोबत मध्यरात्रीच्या सुमारास अश्लील चाटिंग करीत मेहरूण तलावाजवळ तसेच मुलीच्या घरी तिच्या सोबत चुकीचे वर्तन करीत तिला नेहमी लग्न कर नाही तर तुझ्या वडिलांना मारेल अशी धमकी देत असते. हा झालेला सर्व प्रकार मुलीने आपल्या वडिलांना सांगितल्या नंतर मुलीच्या वडिलांनी शनी पेठ पोलीस स्थानक गाठत अल्पवयीन मुलाविरोधात…
पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील मनसे नेते व नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी अज्ञातांनी मागितली होती. सोबतच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकीही दिली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. रुपेश मोरेला खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकी दिल्यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली दरम्यान या प्रकरणी मुंबईतून एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही जण असण्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान पोलिसांना आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत सद्रक्षणाय खलनिग्रहणाय…कानुन के हाथ बहुत लंबे होते है! धन्यवाद…भारती विद्यापीठ पोलीस, असं…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक प्रियकर आपल्या प्रेयसीच्या घरी कुणी नसल्यावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरी जात असता पण एका प्रियकराला हे घरी जाणे खूप महागात पडले आहे. त्याच्या मैत्रिणीला भेटायला गेला आणि त्याला ‘मोरल पोलीसिंग’च्या नावाखाली एका गटाने बेदम मारहाण केल्याने तो जखमी होऊन त्याचा रूग्णालयात मृत्यू झाल्याचा प्रकार केरळच्या त्रिशूरमध्ये घडला आहे. या प्रकरणात पोलीसांनी आठ जणांविराेधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी घटनेनंतर फरार झाले आहेत. केरळच्या त्रिशूरमध्ये एका आठ तरूणांच्या गटाने एका अविवाहीत तरूणाला तो त्याच्या विवाहित मैत्रिणीला मध्यरात्री भेटायला गेला असता बेदम चोप दिल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका मंदिराजवळ लागलेल्या कॅमेऱ्यात हा सर्व घटनाक्रम…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात असलेले विकास दुध नावाची टपरी फोडल्याची घटना दि ६ रोजी घडली आहे. या टपरीतून ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने या प्रकरणी अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील महादेव मंदिरासमोर असलेली विकास दुधाचे टपरी सोनम रविद्र पाटील(वय २६) यांच्या मालकीची आहे. दि ६ ते ७ मार्च दरम्यान अनोळखी चोरट्यांनी हि दुधाच्या टपरीचे कुलूप तोडून त्यातील ६ हजाराची रोख रक्कम, १ हजार ५०० रुपयांची चिल्लरसह बिस्कीट व कुरकुरे लंपास केले आहे. या प्रकरणी सोनम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका रेसिडेन्सी मधील रहिवाशीचे बंद घराचा दरवाजाचे तोडत घरफोडी केल्याची घटना दि ७ रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील भगवा चौकातील प्रभूरंग रेसिडेन्सी मधील २०४ नंबरमध्ये दीपक जगन्नाथ सूर्यवंशी (वय ४०) हे वास्तव्यास आहे. दि ७ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान त्यांचा घरात अनोळखी चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून प्रवेश करीत त्यांचे बेडरूममधील तसेच कपाटातील ५ तोळे २.५ ग्रामचे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम रुपये ३४ हजार रुपये असा एकूण १ लाख ५२ हजार ४५० रुपयाची रोकड लंपास झाल्याची घटना घडली…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात अगदी शुल्लक कारणाने कोण कुणाचा जीव घेईल हे आता कळूच शकत नाही. अशीच एक थरकाप उडवणारी घटना पुण्यात घडली आहे. चक्क एका मुलाने आपल्या प्रेयसीबद्दल वडिलांनी वाईट शब्द बोलल्याने वडिलाचा खून केल्याची घटना घडली आहे. या खुनामध्ये मुलाला आईसह भावाने मदत केली आहे. पुण्यातील पिपरी परिसरातील दिघी येथे वास्तव्यास असलेल्या एका मुलाला प्रेयसीबाबत वाईट शब्द उच्चारल्याच्या रागातून मुलानेच वडिलांचा गळा आवळून खून केला. दुसऱ्या मुलाने गळफास घेतल्याचा बनाव रचला तर मृताच्या पत्नीने पुरावा नष्ट केला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. अशोक रामदास जाधव (वय ४५, रा. दिघी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी अशोक यांचा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यांमध्ये सध्या जोरदार अवकाळी पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रात देखील सध्या अवकाळी पावसाचा जोरदार धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. मुंबईसह, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळला आहे. रब्बी पिकांची काढणी सुरु असल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवारी सकाळी पुढील ३-४ तासांत मुंबई, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांत वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवला होता. यासोबतच हवामान खात्याने लोकांना बाहेर पडताना खबरदारी घेण्यास सांगितले होते. IMD ने…

