नवी दिल्ली : वृत्तसंस्था बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, हे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजपचे हायकमांड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीव्र नाराज असल्याचे समजते. त्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना तसे स्पष्ट संकेत दिलेत. येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर वादग्रस्त वक्तव्ये टाळा, अशी सक्त ताकीद अमित शहांनी दिली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना हे वक्तव्य भोवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. आशिष शेलार काल दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था भाजपला अनुकूल वक्तव्ये करणाऱ्या शरद पवारांच्या खेळीमुळे अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्रीच ‘सिल्व्हर ओक’वर धाव घेतली. तिथे उद्धव, शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे व संजय राऊत या चौघांमध्ये सुमारे सव्वातास खलबते झाली. आता या विशेष भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला असला तरी चर्चेचा अजेंडा वादग्रस्त मुद्द्यांबाबतचाच असल्याची माहिती दोन्ही पक्षांतील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसचा सहभाग नव्हता. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलेले असताना संजय राऊत, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपापल्या…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील गोशाळेत असलेल्या १९ वर्षीय महिलेवर २१ वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात असलेल्या गोशाळेत चोपडा तालुक्यातील महिला कामास आहे. याठिकाणी दि ११ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी राकेश बारेला(वय २१) हा महिलेजवळ येत चुकीचे वर्तन केल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात महिलेने धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.गजानन महाजन हे करीत आहेत.
अमळनेर : प्रतिनिधी शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला असून, पिंपळकोठा येथील सराईत गुन्हेगाराला दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर शहरात ११ रोजी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, हेडकॉन्स्टेबल अरुण बागुल, योगेश पाटील, शेखर साळुंखे, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे हे दुचाकीने गस्त घालत असताना धुळे रोडवर बलराम हॉटेल जवळ कोपऱ्यात पाच ते सहा जण दुचाकीसह संशयास्पद बसलेले आढळून आले. पोलिसांना संशय येताच ते त्यांच्या दिशेने विचारपूस साठी जाऊ लागताच सर्वजण पळू लागले. पोलिसांनी जगदीश पुंडलिक पाटील (२१, पिंपळकोठा, ता. पारोळा) याला त्याच्या मोटारसायकलसह अटक केली. त्याच्या मोटारसायकलच्या नंबर प्लेटवर चिखल…
भुसावळ : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक महिलासह युवतींची सोशल मिडीयाच्या माध्यमातून फसवणूक होत आहे. अशीच एक घटना भुसावळ तालुक्यातील खडका येथील माधुरी मयूर पाटील (वय २२) या रेझिन आर्टचे काम करतात. त्यांना दोघांनी फ्रेमची ऑर्डर दिली. आणि पैसे देण्याच्या नावाखाली एक लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.६ रोडी माधुरी पाटील यांना त्यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप कॉल व मेसेज करून १५ फोटो फ्रेमची ऑर्डर देण्यात आली. माधुरी पाटील यांनी यासाठी २०,४९५ रुपयांची मागणी केली तुमच्याकडे आलेला क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. त्या कोडच्या माध्यमातून फिर्यादी यांना दुप्पट पैसे परत करण्याच्या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या मेहरुण तलाव परीसरात घरफोडीच्या उद्देशाने आलेल्या कुविख्यात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयीतांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण तलाव परीसरात वासुदेव महाजन यांच्या बंगल्याच्या समोर असलेल्या गल्लीत अंधाराचा फायदा घेत चोरी आणि घरपोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी सोमवार, 10 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता अटक केली. संशयित विशाल मुरलीधर दाभाडे, दीपक शांताराम रेणुके व गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी अशी अटकेतील तीन संशयित आरोपींची नावे आहेत. अटकेतील गुरुजीतसिंग बावरी यांच्या विरोधात आत्तापर्यंत वेगवेगळे 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील अनेक नेत्यांना धमकीचे फोन येत आहे. केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील धमकी आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मी एकनाथ शिंदेंना उडवणार आहे, असा धमकीचा फोन आल्यानंतर पुण्यात प्रचंड खळबळ उडाली . सोमवारी रात्री आरोपीने 112 या हेल्पलाईनवर कॉल करून धमकी दिली. मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे असे म्हणून त्यांनं फोन बंद केला. पोलिसांना युध्दपातळीवर तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. राजेश मारूती आगवने असे आरोपीचे नाव असून तो मुंबईतील धारावी परिसरात राहतो. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री 112 या पोलिसांच्या हेल्पलाईनवर कॉल आला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात अनेक घटना घडत असता ज्या वाचून तुम्हाला धक्काच बसत असतो अनेक लोक संपत्तीच्या वादातून परिवारातील सदस्यांना कशा प्रकारे त्रास दिला जात अशीच एक घटना समोर आली आहे. आग्रा येथे मृत्यू झालेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगठ्याच्या ठशावरून मृत्यूपत्र तयार करून घर आणि दुकान बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हि़डीओत एका कारमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी तिथे एक व्यक्ती येतो, जो त्या वृद्ध महिलेच्या अंगठ्याचा ठसा घेतो. सेवला जाट येथील रहिवासी जितेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आजी कमला देवी यांचे 08-05-2021…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांपासून देशातील नामवंत बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमक्यांचे फोन येत आहेत. आता पुन्हा एकदा सलमानला धमक्यांचे फोन आले आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीनं यावेळी थेट मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षेत फोन केला होता. सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानला धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीनं सलमानला 30 तारखेला मारणार असल्याचं देखील सांगितलं आहे. फोन करणारी व्यक्ती ही गौरक्षक जोधपूर राजस्थान येथील असून त्या व्यक्तीनं स्वत:ची ओळख रॉकीभाई असी करून दिली आहे. या फोनमुळे सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सलमान खानला…
मुंबई : वृत्तसंस्था भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते कि, बाबरी पाडली तेव्हा, एकही शिवसैनिक नव्हता, असे वक्तव्य करून पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, हा विषय गंभीर आहे. काल गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाच्या भरकटलेल्या भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी बाबरी प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून ही जबाबदारी झटकली होती. हे काम शिवसेनेचे असल्याचे म्हटले होते, याची आठवणही…

