मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज झालेल्या अर्थसंकल्पात शिंदे व फडणवीस सरकारचे मंत्री देवेद्र फडणवीस यांनी आज बजेट सादर केला यावेळी बजेटमध्ये शेतकरीसाठी हि विशेष तरतूद केलेली दिसून आली केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार. केंद्र सरकारचे 6 हजार रुपये आणि राज्याचे 6 हजार रुपये, याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज हवामानात बदल झाल्यामुळे अनेक समस्यांनी अन्नदाता शेतकऱ्याला ग्रासले आहे. अशा स्थितीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. कांदा उत्पादकांना आवश्यक ती…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था सध्या देशात लग्नाचा मोठा हंगाम सुरु आहे. अनेक लग्नाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर वेगवेगळ्या रीतीने व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नवरदेव पाहुण्यांसमोर नववधूला उचलून घेतो आणि चांगलीच फजिती करुन घेताना दिसत आहे. नवरदेव खाली कोसळल्यानंतर तिथे उपस्थित पाहुण्यांनाही हसू आवरत नाही. व्हिडीओत काय आहे? व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, नवरदेव आपल्या लग्नातील क्षण कायमचा आठवणीत राहावा यासाठी नववधूला हातात उचलून घेत पायऱ्या उतरताना दिसत आहे. पण पायरीवर उतरत असतानाच नवरदेवाचा पाय घसरतो आणि नववधूला घेऊन तो धाडकन खाली कोसळतो. यानंतर तिथे उपस्थित पाहुणे हसू लागतात. पण नवरदेव मात्र नववधूला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेहमीच आपल्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आले. सेलिब्रिटींची भांडणं, मैत्री, प्रेम…इत्यादी गोष्टी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. काही कलाकारांनी तर स्वतःच्या नावाचा ठसा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील नोंदवला आहे. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते कबीर बेदी. बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत काम केलेले अभिनेते कबीर बेदी त्यांच्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. कबीर बेदी यांनी चार लग्न केली, ज्यामुळे त्यांना अनेकदा टीकेचा देखील सामना करावा लागला. कबीर बेदी यांनी स्वत: त्यांच्या ‘स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द ऍक्टर’ या आत्मचरित्रातून त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले आहेत. कबीर बेदी यांच्या चौथ्या पत्नीबद्दल, त्यांची मुलगी पूजा…
धरणगाव : प्रतिनिधी भवरखेडे या गावाला शेती तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या होती. या बाबत गावाच्या नदीला धरणाचे पाणी सोडण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी गेल्या अनेक दिवसापासून पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्याकडे मागणी केली होती. अखेर गिरणा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून आहे.गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मान्य आहे. भवरखेडे ग्रामस्थांचा गिरणा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे याबाबत पालकमंत्री पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. ग्रामस्थांची मागणी तात्काळ समजून घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून भवरखेडे पर्यंत पाणी सोडण्यात यावे,अशा सूचना मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तीन दिवसा अगोदर…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात ४२ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष देत तसेच काही ही कारणाने पैसे घेवून फसवणूक करीत महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात ४२ वर्षीय महिला परिवारासोबत वास्तव्यास आहे. दि २३ मार्च २०१७ पासून ते दि ३० मे २०१९ पर्यत संशयित आरोपी श्रीकृष्ण तुकाराम मेगडे याने महिलेला लग्नाचे आमिष देत तब्बल तीन वर्ष शारीरिक संबध ठेवत तिच्याकडून काही ना काही कारणाने पैसे मागून फसवणूक केली आहे. या प्रकरणी महिलेने रामानंद नगर पोलीस स्थानक गाठत संशयित आरोपी श्रीकृष्ण तुकाराम मेगडे याच्या विरोधात गुन्हा…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील वाघ नगरातील रहिवासी असलेल्या पूनम प्रभाकर जाधव (वय ३८) या देवदर्शन घेऊन घराकडे निघालेल्या असतांना रस्त्यात अडवून एकाने काहीही कारण नसताना तिच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता रामानंदनगर घाटाजवळ घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वाघनगर येथील पूनम जाधव या सोमवारी सकाळी त्यांच्या दुचाकीने रामानंदनगरातील टाकीजवळील महादेव मंदिरामध्ये देवदर्शनासाठी आल्या होत्या. देवदर्शन घेऊन ११ वाजेच्या सुमारास त्या घराकडे निघाल्या. रामानंदनगर घाटाजवळ त्यांना एकाने थांबविले. काहीही कारण नसताना त्याने महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर दुकानातून लोखंडी रॉड काढून महिलेच्या डोक्यात मारला. यात महिला ही गंभीर…
मेष : मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. हितशत्रुकडून फसवणुकीची शक्यता आहे. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. काळजी घ्या. वृषभ: शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य, पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. लेखन, कला, कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. मानसन्मान मिळेल. मिथुन: नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. स्वतःच्या…
नाशिक : वृत्तसंस्था प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बच्चू कडू यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. सरकारी कामांत अडथळा आणल्या प्रकरणी त्यांना कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. बच्चू कडू यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरच्या कोर्टात अपीलाच्या कालावधी पर्यंत त्यांना जामीन मिळाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर बच्चू कडू यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. २०१७ ला एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी रकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बच्चू कडू यांना…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी धुलीवंदनच्या दिवशी चिंचखेडा खुर्द येथे शेतामध्ये वन्य प्राणी सायाळ याची शिकार करून त्याचे मास शेतमधील शेड मध्ये शिजतवत असताना वनविभागाने मंगळवारी कारवाई केली. या प्रकरणी चार जणांना त्याब्यात घेतले असून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम वन गुन्हा दाखल करण्यात आले आहे. धुलीवंदनच्या दिवशी 7 मार्च रोजी दुपारी वन विभागाला गुप्त माहिती मिळाली. की मौजा चिचखेडा येथील शेतकरी सुपळा रामचंद्र मेनकर रा. चिचखेडा खुर्द यांच्या शेतामध्ये वन्यप्राणी सायाळ ची शिकार करून कापत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लगेच घटनास्थळी सचिन ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी, वडोदा ल सोबत वन कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान शेतामध्ये रक्ताने माखलेली काठी, जमिनीवर…
नाशिक : वृत्तसंस्था आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. . या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ. तसेच, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे, अशी माहिती या निकालानंतर आमदार बच्चू कडू यांनी दिली. न्यायालयाच्या निकालानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि…

